शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

इमारती कौलारू पण मार्केटमध्ये कवेलूच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:53 AM

काळ बदलला आहे. बदलत्या काळाच्या ओघात कौलारु इमारती कालबाह्य होत आहेत. सिमेंट, कांक्रीटच्या इमारतींचा जमाना आला आहे.

वानरांमुळे नुकसान : शाळा, शासकीय इमारती व कर्मचारी वसाहतींची दुरवस्था संतोष बुकावन । लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : काळ बदलला आहे. बदलत्या काळाच्या ओघात कौलारु इमारती कालबाह्य होत आहेत. सिमेंट, कांक्रीटच्या इमारतींचा जमाना आला आहे. आजही अनेक शासकीय इमारती कौलारु आहेत. दरवर्षी कवेलू फुटतात. गोरगरीब व सर्वसामान्य लोकही आता सिमेंट-कांक्रिटचा वापर करतात. त्यामुळे बाजारात कवेलूंना ग्राहकच नाहीत. शहरी व ग्रामीण भागातील कवेलूंचा व्यवसाय बंद झाला. शासकीय इमारतींची डागडुजी करायची कशी? ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पूर्वीच्या बहुतांश शासकीय इमारती कौलारु आहेत. त्याकाळी कौलारू इमारतीच असायच्या. आता कवेलूची जागा सिमेंट-कांक्रीटच्या स्लॅबने घेतली आहे. त्यामुळे आपसुकच बाजारातील कवेलूचा व्यवसाय पूर्णत: बंद झाला आहे. शासकीय इमारतींची कालमर्यादा पूर्ण झाली नसल्याने त्या पाडता येत नाही. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयांना कवेलू आच्छादित इमारतींचा स्वीकार करावाच लागतो. मात्र अडचणी अनेक आहेत. शासकीय इमारतींची डागडुजी वेळेवर होत नाही. मार्केटमध्ये मंगलोरी कवेलू मिळत नाही. खरेदीसाठी शासन पैसा देत नाही. स्वत: जवळून खर्च केला तरी वेळेवर देयक मिळत नाही. असे देयक काढण्यासाठीही पैसे मोजावे लागतात. कार्यालयात पाणी गळत असेल तर त्यासाठीही नियोक्ताच जबाबदार. कौलारू इमारती असलेल्या शासकीय अधिकाऱ्याने काय करावे,हा गंभीर प्रश्न आहे.बाजारात कवेलू उपलब्ध नसल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना गावात ज्यांनी कवेलूचे घर पाडून स्लॅब घातला अशा लोकांकडे कवेलूंसाठी हात पसरावे लागतात. ते कवेलूंचे जे दर ठरवतील त्या दराने कवेलू विकत घ्यावे लागतात. बहुतांशी गावात वानरांचा धुमाकूळ असतो. ते मोठ्या प्रमाणावर कवेलूंचे नुकसान करतात. कवेलूंचा व्यवसायच नसल्याने छतावर कवेलू आच्छादन करणारे मजूर मिळत नाही. हे काम करणारे जे पूर्वीचे मजूर होते ते जे दाम म्हणतील ते द्यावेच लागते. ते सुद्धा आता व्यवसाय नसल्याने दुसऱ्या कामांकडे वळले आहेत. अशा कठिण परिस्थितीत काय करावे असा प्रश्न नियोक्ताला पडतो. जबाबदारी असल्याने त्यांना काही ना काही तरी करुन पावसाळ्यापूर्वी शासकीय इमारतींवर कवेलू आच्छादित कराव्याच लागतात. अनेक इमारती धोकादायक एका नवीन शाळा वर्गखोलीच्या खर्चात अनेक खोल्यायुक्त इमारतींवर सिमेंट कांक्रीटचे स्लॅब अथवा प्लॅस्टीकचे पत्रे घातले जाऊ शकतात. मात्र यंत्रणा व राजकीय पुढाऱ्यांना याचे सोयरसूतक नसते. नवीन खोल्यांचे बांधकाम केल्याने टक्केवारी मिळते. यातून कार्यकर्त्यांचे समाधानही केले जाते. अशा या धोरणामुळे अनेक शासकीय इमारती धोकादायक ठरत आहेत.अनेक कार्यालयातील कर्मचारी वसाहतीतील इमारती कौलारु आहेत. खूप कमी वसाहतींमध्ये कर्मचारी वास्तव्यास आहेत तर अनेक वसाहती ओसाड आहेत. कर्मचारी कवेलू कुठून आणणार? यासाठीच कर्मचारी शासकीय वसाहतीत राहण्यास असमर्थता दाखवितात. शासन व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. छतांना प्लास्टिकचा आधारअर्जुनी मोरगाव येथील पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीच्या छतावर तर चक्क प्लास्टिक आच्छादन करण्यात आले. हा सारा प्रकार किती दिवस चालणार हे एक कोडेच आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासन दरवर्षी कितीतरी नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम करते मात्र जुन्या इमारतींची अवस्था तशीच आहे.