शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

विद्यार्थ्याचा परीक्षेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:18 IST

जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यानी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून दररोज शाळेच्या प्रांगणात धरणे देत आहेत.

ठळक मुद्देअभ्यासक्रम अर्धवट : मुख्याध्यापकाला हटविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यानी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून दररोज शाळेच्या प्रांगणात धरणे देत आहेत. मुख्याध्यापक आर. एन. डोहरे हटविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.दहावी नंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्याचा कल विज्ञान शाखेकडे असतो. ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथे ही स्वयं अर्थ सहायक तत्वावर मागील वर्षी विज्ञान शाखा उघडण्याची परवानगी जि.प.कडून घेऊन विज्ञान शाखा सुरु करण्यात आली. परिसरातील दहावी पास विद्यार्थ्याना उत्तम शिक्षण देण्याचे प्रलोभन देत प्रवेश घेण्यासाठी आकर्षित करण्यात आले.यंदा ११ वी आणि १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरु झाले. शिक्षकांची नियुक्ती करताना अडचणी येत असताना तासीका तत्वावर काही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. तर काही विषयासाठी माध्यमिक विभागातील शिक्षकांनी तासिका घेण्याची जवाबदारी घेतली. सर्व सुरळीतपणे सुरू असताना नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक आर.एन.डोहरे यांनी आपला मनमर्जी कारभार सुरू केल्याचा आरोप आहे. नियमित शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून हटवून त्यांना प्राथमिक विभागाच्या तासिका देण्यात आल्या. तर १२ वीची बोर्डाची परीक्षा अवघ्या तीन महिन्यावर येवून ठेपली असून सुध्दा त्यांच्या तासिका होत नाही. त्यामुळे ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यानी प्रथम सत्र परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. नियमित कनिष्ठ व्याख्याताची सोय करुन पूर्ण तासिका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तसेच मुख्याध्यापक व प्राचार्य पदावर असलेले आर.एन.डोहरे यांना हटविण्याची मागणीचे निवेदन जि.प.शिक्षणाधिकारीव व सालेकसा येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले आहे.तासिकेत वारंवार फेरबदलमागील मुख्याध्यापक घरडे हे सत्र सुरु होण्याच्या वेळीच सेवानिवृत्त झाले असून सेवा ज्येष्ठतानुसार कनिष्ठ व्याख्याता आर.एन.डोहरे यांना हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मिळून प्रभारी मुख्याध्यापक व प्राचार्य बनविण्यात आले. तेव्हा सुरुवातीला नेहमीप्रमाणे सर्व काही सुरळीत चालले. परंतु काही महिन्यावर त्यांना नियमित मुख्याध्यापकाचा आदेश जिल्हा परिषदेने दिले. वारंवार वेळापत्रक बदलण्याचे काम करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नियमित शिक्षकांनी आधी अनुदानीत तुकडीवर पूर्ण तासिका घ्याव्यात. तसेच विज्ञान शाखा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर असून त्यासाठी बाहेरुन तासिका पध्दतीवर शिक्षक नेमले जातील.विज्ञान शाखेत शिकवित असलेले नियमित शिक्षकांच्या तासिका बंद केल्या आहेत.विद्यार्थ्यांचे आरोप चुकीचे आहे.-आर.एन.डोहरे, मुख्याध्यापक,जि.प.हायस्कूल कावराबांध

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा