शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्यार्थ्याचा परीक्षेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:18 IST

जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यानी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून दररोज शाळेच्या प्रांगणात धरणे देत आहेत.

ठळक मुद्देअभ्यासक्रम अर्धवट : मुख्याध्यापकाला हटविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यानी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून दररोज शाळेच्या प्रांगणात धरणे देत आहेत. मुख्याध्यापक आर. एन. डोहरे हटविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.दहावी नंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्याचा कल विज्ञान शाखेकडे असतो. ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथे ही स्वयं अर्थ सहायक तत्वावर मागील वर्षी विज्ञान शाखा उघडण्याची परवानगी जि.प.कडून घेऊन विज्ञान शाखा सुरु करण्यात आली. परिसरातील दहावी पास विद्यार्थ्याना उत्तम शिक्षण देण्याचे प्रलोभन देत प्रवेश घेण्यासाठी आकर्षित करण्यात आले.यंदा ११ वी आणि १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरु झाले. शिक्षकांची नियुक्ती करताना अडचणी येत असताना तासीका तत्वावर काही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. तर काही विषयासाठी माध्यमिक विभागातील शिक्षकांनी तासिका घेण्याची जवाबदारी घेतली. सर्व सुरळीतपणे सुरू असताना नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक आर.एन.डोहरे यांनी आपला मनमर्जी कारभार सुरू केल्याचा आरोप आहे. नियमित शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून हटवून त्यांना प्राथमिक विभागाच्या तासिका देण्यात आल्या. तर १२ वीची बोर्डाची परीक्षा अवघ्या तीन महिन्यावर येवून ठेपली असून सुध्दा त्यांच्या तासिका होत नाही. त्यामुळे ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यानी प्रथम सत्र परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. नियमित कनिष्ठ व्याख्याताची सोय करुन पूर्ण तासिका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तसेच मुख्याध्यापक व प्राचार्य पदावर असलेले आर.एन.डोहरे यांना हटविण्याची मागणीचे निवेदन जि.प.शिक्षणाधिकारीव व सालेकसा येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले आहे.तासिकेत वारंवार फेरबदलमागील मुख्याध्यापक घरडे हे सत्र सुरु होण्याच्या वेळीच सेवानिवृत्त झाले असून सेवा ज्येष्ठतानुसार कनिष्ठ व्याख्याता आर.एन.डोहरे यांना हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मिळून प्रभारी मुख्याध्यापक व प्राचार्य बनविण्यात आले. तेव्हा सुरुवातीला नेहमीप्रमाणे सर्व काही सुरळीत चालले. परंतु काही महिन्यावर त्यांना नियमित मुख्याध्यापकाचा आदेश जिल्हा परिषदेने दिले. वारंवार वेळापत्रक बदलण्याचे काम करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नियमित शिक्षकांनी आधी अनुदानीत तुकडीवर पूर्ण तासिका घ्याव्यात. तसेच विज्ञान शाखा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर असून त्यासाठी बाहेरुन तासिका पध्दतीवर शिक्षक नेमले जातील.विज्ञान शाखेत शिकवित असलेले नियमित शिक्षकांच्या तासिका बंद केल्या आहेत.विद्यार्थ्यांचे आरोप चुकीचे आहे.-आर.एन.डोहरे, मुख्याध्यापक,जि.प.हायस्कूल कावराबांध

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा