शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:22 PM

ग्रामीण भागात प्रौढ कबड्डी स्पर्धेची धूम राहात होती. एकेकाळी या स्पर्धांची सर्वच वाट बघत होते. मात्र मागील काही वर्षांत या स्पर्धांचे आयोजन थांबले. परिणामी ग्रामीण भागातील खेळाडू या खेळांपासून वंचित राहू लागले. युवकांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याचे माझे सतत प्रयत्न असतात.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : कारंजा येथील आमदार चषक कबड्डी प्रौढ स्पर्धेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागात प्रौढ कबड्डी स्पर्धेची धूम राहात होती. एकेकाळी या स्पर्धांची सर्वच वाट बघत होते. मात्र मागील काही वर्षांत या स्पर्धांचे आयोजन थांबले. परिणामी ग्रामीण भागातील खेळाडू या खेळांपासून वंचित राहू लागले. युवकांना खेळासाठी प्रोत्साहित करण्याचे माझे सतत प्रयत्न असतात. खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते. तर पारंपरिक खेळातून युवकांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम कारंजा येथे आयोजित आमदार चषक प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार अग्रवाल यांच्या हस्ते देवी सरस्वती व हनुमानाची पूजा करून केला. तसेच ग्राम कारंजा येथील जय भोले व राणी अवंतीबाई क्लबमध्ये सामना घेऊन सुरूवात करण्यात आली. यात जय भोले क्लबने बाजी मारून या स्पर्धेला सुरूवात झाली.आमदार अग्रवाल म्हणाले, नोव्हेंबर-डिसेंबर हे महिने खेळांसाठी पोषक राहत असून जिल्ह्यात याच काळात कित्येक स्पर्धांचे आयोजन केले जाते. शिवाय, या काळात शाळांतील वार्षिकोत्सव असतात. अशात मात्र ग्रामीण भागातील कबड्डीला कोठेच स्थान मिळत नाही व त्यामुळे ग्रामीण युवा निराश राहतात. ग्रामीण भागातील पारंपारीक खेळाला वाव देण्यासाठीच आम्ही या आमदार चषक प्रौढ कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगीतले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांनी, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी खेळांचे अत्यधीक महत्व आहे. त्यात आनंदाची बाब अशी की, आमदार अग्रवाल यांनी या स्पर्धांच्या माध्यमातून युवा आपली प्रतिभा दाखविण्यासाठी मंच उपलब्ध करवून दिल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, योगराज उपराडे, स्नेहा गौतम, संजय बडोले, शुद्धोधन शहारे, अशोक लिचडे, अशोक इटानकर, दादू ठाकरे, सुनिता सवालाखे, मुकेश लिल्हारे, जीवन बंसोड, लिखीराम बन्नाटे, बालचंद ब्रम्हपुरे, वनमाला बडोले, रेवंता मडावी, गीता उके, भाविका रंगारी, सुनिता उईके, सुनिता नागपुरे, महादेव ताराम, गजानंद नागपुरे, महेंद्र सहारे, जयचंद पारधी, जीवन चव्हाण, मारोती भिमटे, गंगाराम बावनकर, श्याम कावरे, अभिजीत रामटेके यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.भविष्यात विविध स्पर्धांचे आयोजन१७ ते २५ तारखेपर्यंत सर्व १४ जिल्हा परिषद क्षेत्रात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद क्षेत्रांतील विजेता संघांत क्वार्टर फायनल, सेनी फायनल व फायनल सामने खेळले जाणार आहेत. विशेष म्हणजे, भविष्यात आखणीही स्पर्धांचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा आमदार अग्रवाल यांनी या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी केली.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल