शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जाळे ठरताहेत पक्ष्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: April 18, 2016 04:10 IST

येथील जलाशय हे देशी-विदेशी पक्ष्यांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. येथे विविध प्रकारच्या पानवनस्पतीदेखील

नवेगावबांध : येथील जलाशय हे देशी-विदेशी पक्ष्यांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. येथे विविध प्रकारच्या पानवनस्पतीदेखील आढळतात. येथील मासे अतिशय चवदार असतात असे अनेक खाद्यशौकिनांचे ठाम मत आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. परंतु मासेमारीसाठी निरूपयोगी असलेले जाळे तलाव परिसरात इतरत्र फेकण्यात येत असल्याकारणाने परिसरात वास्तव्यास असलेल्या पक्ष्यांसाठी व लहान-लहान प्राण्यांसाठी ते कर्दनकाळ ठरत आहे. सविस्तर असे की, नवेगावबांध जलाशय व त्याभोवतालचा परिसर देशी व विदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तलावाच्या परिसरात असलेल्या झुडपांत, गवतात व बेशरमच्या झाडांत काही पक्षी आपली वस्ती करतात. पाण्यात राहणारे पाणपक्षीदेखील तलावालगतच्या जमिनीवर येतात. म्हणजेच तलाव व ्याभोवतालचा परिसर पक्ष्यांना मुक्तपणे विहार करायला आदर्श ठिकाण आहे. एवढेच नव्हे तर या परिसरात ससा, साप, उंदीर, खार, सरडे इत्यादी प्राणी देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतात. परंतु माणसाच्या हलगर्जीपणामुळे या प्राणी आणि पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे. मासेमारबांधव तलावात मासेमारी करतात. यासाठी ते बारीक प्लास्टिकच्या धाग्यांनी तयार केलेले जाळे वापरतात. हे धागे सहजासहजी तुटक नाहीत. मासेमारीसाठी निरूपयोगी झालेले ते जाळे मात्र तलाव परिसरातच फेकून दिले जाते. हे फेकून दिलेले जाळे कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण तलावाच्या भोवताल दिसून येतात. पक्षी जेव्हा पाण्याबाहेर येतात तेव्हा ते या जाळ््यामंध्ये अडकतात. सुटकेसाठी धडपड करताच ते अधिक गुंतून जातात व त्यातच त्यांचा मृत्यू होतो. अशीच अवस्था लहान-लहान प्राण्यांची देखील होत असते. जे जाळे अनेकांच्या हातांना रोजगार देतात, अनेकांच्या जिव्हा तृप्त करण्यास हातभार लावतात तेच जाळे मात्र या मुक्या जीवांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याचे कुणालाच काही वाटत नाही. वास्तवीक हे प्लास्टिकचे जाळे एकत्र करून जाळले तर पाच मिनिटांत नष्ट होतील किंवा एखाद्या खड्ड्यात गाडून देता येतील. परंतु या साध्या बाबींकडे देखील दुर्लक्ष होताना दिसत आहे. तलाव परिसरातील फेकलेले संपूर्ण जाळे काढून परिसरातील प्राणी व पक्ष्यांना जीवदान देण्यात यावे अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. (वार्ताहर)वन्यजीव व पाटबंधारे विभागाची चिडीचूप४विशेष म्हणजे अगदी काही मीटर अंतरावरच वन्यजीव विभागाच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. दिमतीला अनेक कर्मचारीदेखील आहेत. परंतु त्यांचेही या प्रकाराकडे लक्ष नाही किंवा लक्ष असेलही परंतु कदाचित सोईस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या जलाशयात असणाऱ्या पाण्यावर आपला हक्क सांगणाऱ्या पाटबंधारे विभागाला या गोष्टींचे काही सोयरसुतक नाही. या प्राणी व पक्ष्यांची मासेमार, वन्यजीव विभाग व पाटबंधारे विभाग यापैकी कुणालाच काळजी नाही. याचेच मात्र नवल वाटते.