शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

२५ वर्षापासून रखडली बिजेपार उपसा सिंचन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देवन कायद्यात अडकले कालवे । निधी आला आणि परत गेला

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सिंचन प्रकल्प उपलब्ध असताना सुध्दा शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी बिजेपार उपसा सिंचन योजना मागील २५ वर्षापासून रखडली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले. नियोजनाप्रमाणे या परिसरात काही अंतरावर असलेल्या कालीसरार धरणातून उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची हमी दिली. यासाठी आधी ९० टक्के आदिवासी शेतकरी असणे गरजेचे होते. ती अट रद्द शिवणकर यांनी ५० टक्के करायला लावून बिजेपार उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा केला. या योजनेसाठी राज्य शासनाने जवळपास दोन कोटी रुपये खर्च केले आणि पाणी उपसा करण्यासाठी पंप सुद्धा बसविण्यात आले. कालव्याचे काम सुरु झाले पण लगेच वन कायद्यात कालव्याचे काम अडकले. वन कायद्याचा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न करुन मंजुरी आणण्याचे कामे करण्यात आली.परंतु नंतर यासाठी पुढे लागणारा निधी मिळाला नाही. १९९९ ला राज्यात सरकार बदलले आणि या योजनेकडे सपशेल दुर्लक्ष झाले. शेतकऱ्यांनी या योजनेला पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आमदार, खासदारांच्या घरी अनेकदा पायपीट केली तरी सुद्धा ही योजना आतापर्यंत सुरु झाली नाही. शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे २०१२ मध्ये या योजनेसाठी काही निधी संबंधित विभागाला मिळाला परंतु विभागाने योजनेचे काम सुरु केले नाही. शेवटी निधी परत गेला आणि उपसा सिंचन योजना तशीच अर्धवट पडून राहिली. २००५ ते २००९ दरम्यान भेरसिंह नागपुरे हे आमदार असताना त्यांनी या योजनेसाठी प्रयत्न चालविले व मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य शासनाने निधी मंजूर करुन सुद्धा योजना पूर्णत्वास आली नाही.३०० हेक्टरला सिंचनाची सोयबिजेपार उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास जवळपास ३०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे सुदूर क्षेत्रात राहणारे गरीब व मागास वर्गाचे शेतकरी आपल्या शेतात भरघोष पीक घेवून आर्थिक स्थिती सुधारु शकतात.गावाजळच कालीसरार धरण असून सुद्धा बिजेपार परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. बिजेपार उपसा सिंचन योजना पूर्ण करुन शासनाने शेतकऱ्यांचे हित साधण्याची गरज आहे.- चरणदास चंद्रिकापूरे,सामाजिक कार्यकर्ता बिजेपार

टॅग्स :Waterपाणी