शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षापासून रखडली बिजेपार उपसा सिंचन योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST

बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देवन कायद्यात अडकले कालवे । निधी आला आणि परत गेला

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : सिंचन प्रकल्प उपलब्ध असताना सुध्दा शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी बिजेपार उपसा सिंचन योजना मागील २५ वर्षापासून रखडली असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.बिजेपार परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला सिंचनाची सोय नाही. अनेक वर्षाच्या मागणीनंतर १९९५ मध्ये युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार महादेवराव शिवणकर हे पाटबंधारे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या परिसराला सिंचनाची सोय करुन देण्याचे आश्वासन दिले. नियोजनाप्रमाणे या परिसरात काही अंतरावर असलेल्या कालीसरार धरणातून उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची हमी दिली. यासाठी आधी ९० टक्के आदिवासी शेतकरी असणे गरजेचे होते. ती अट रद्द शिवणकर यांनी ५० टक्के करायला लावून बिजेपार उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा केला. या योजनेसाठी राज्य शासनाने जवळपास दोन कोटी रुपये खर्च केले आणि पाणी उपसा करण्यासाठी पंप सुद्धा बसविण्यात आले. कालव्याचे काम सुरु झाले पण लगेच वन कायद्यात कालव्याचे काम अडकले. वन कायद्याचा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न करुन मंजुरी आणण्याचे कामे करण्यात आली.परंतु नंतर यासाठी पुढे लागणारा निधी मिळाला नाही. १९९९ ला राज्यात सरकार बदलले आणि या योजनेकडे सपशेल दुर्लक्ष झाले. शेतकऱ्यांनी या योजनेला पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आमदार, खासदारांच्या घरी अनेकदा पायपीट केली तरी सुद्धा ही योजना आतापर्यंत सुरु झाली नाही. शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे २०१२ मध्ये या योजनेसाठी काही निधी संबंधित विभागाला मिळाला परंतु विभागाने योजनेचे काम सुरु केले नाही. शेवटी निधी परत गेला आणि उपसा सिंचन योजना तशीच अर्धवट पडून राहिली. २००५ ते २००९ दरम्यान भेरसिंह नागपुरे हे आमदार असताना त्यांनी या योजनेसाठी प्रयत्न चालविले व मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य शासनाने निधी मंजूर करुन सुद्धा योजना पूर्णत्वास आली नाही.३०० हेक्टरला सिंचनाची सोयबिजेपार उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास जवळपास ३०० हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे सुदूर क्षेत्रात राहणारे गरीब व मागास वर्गाचे शेतकरी आपल्या शेतात भरघोष पीक घेवून आर्थिक स्थिती सुधारु शकतात.गावाजळच कालीसरार धरण असून सुद्धा बिजेपार परिसरातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. बिजेपार उपसा सिंचन योजना पूर्ण करुन शासनाने शेतकऱ्यांचे हित साधण्याची गरज आहे.- चरणदास चंद्रिकापूरे,सामाजिक कार्यकर्ता बिजेपार

टॅग्स :Waterपाणी