शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिमा डागाळण्याआधी सावध व्हा!

By admin | Updated: December 27, 2016 02:15 IST

गेल्या बुधवारी गोंदियातल्या हॉटेल बिंदल प्लाझा व त्यातील ठाट-बाट या रेस्टॉरेंटला लागलेल्या आगीने सात

मनोज ताजने ल्ल गोंदिया गेल्या बुधवारी गोंदियातल्या हॉटेल बिंदल प्लाझा व त्यातील ठाट-बाट या रेस्टॉरेंटला लागलेल्या आगीने सात लोकांचा बळी घेतला. एवढ्या गंभीर घटनेनंतर सहावा दिवस उजाडला तरी या प्रकरणात पोलिसांनी कोणावरही ठपका ठेऊ नये, ही बाब सर्वांनाच आश्चर्यात टाकणारी आहे. विशेष म्हणजे एरवी एखाद्या छोट्यामोठ्या दुर्घटनेनंतर तावातावाने ‘संबंधित दोषींवर कडक कारवाई झालीच पाहीजे’ असे ठणकावून सांगणाऱ्या जिल्ह्यातील एखाद्या नेत्याचे मन या दुर्घटनेतील सात जणांच्या मृत्यूनेही हेलावू नये? म्हणजेच यात कुठेतरी पाणी मुरत आहे हे स्पष्ट आहे! सर्व विभागांकडून येत असलेल्या माहितीत या दुर्घटनेसाठी हॉटेल संचालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. हे हॉटेल भाजपच्या एका जुन्या पण मर्यादित विश्वात राहणाऱ्या पदाधिकाऱ्याचे व त्याच्या नातेवाईकाचे आहे. राजकारणाला व्यवसाय मानणाऱ्यांपैकी एक असलेल्या या नेत्याचा जनमानसाशी फारसा संबंध नाही. त्यामुळे अशा नेत्यापासून भाजपला काय फायदा आहे हा संशोधनाचा विषय असला तरी पक्षाचा उपयोग आपल्या फायद्यासाठी कसा करून घ्यायचा हे मात्र अशा नेत्यांना चांगले माहीत आहे. त्यामुळेच एवढी गंभीर घटना होऊनही आणि अनेक बाबतीत नियम डावलूनही हॉटेलच्या संचालकावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. हॉटेलच्या मुदतबाह्य परवान्यापासून तर बांधकाम आणि फायर आॅडिटपर्यंत अनेक गोष्टींची इमानदारीने तपासणी केल्यास हॉटेल संचालकावर कडक कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पत्रकारांना माहिती देताना या हॉटेलने अनेक नियम तोडल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी उघडपणे सांगत असताना पोलिसांपर्यंत मात्र त्यांचा आवाज गेल्या सहा दिवसातही पोहोचला नाही. पोलीस कारवाई करण्यास कचरत आहेत. तरीही कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी पुढे येऊन कारवाई करा, म्हणून ठणकावून बोलताना दिसत नाही. एवढी सर्वांची मने निष्ठूर झाली आहेत का? असा प्रश्न आता गोंदियावासियांना पडत आहे. पालकमंत्री बडोले यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करताना शहरातील सर्व व्यावसायिक इमारतींचे ‘फायर आॅडिट’ करण्याची सूचना केली. पण त्या सूचनेची तरी अंमलबजावणी गांभिर्याने होईल का, याबद्दलही शंका आहे. एवढी गंभीर घटना जर मुंबईसारख्या महानगरात घडली असती तर विरोधी पक्षवाल्यांनी राईचा पर्वत केला असता, पण गोंदियात वेगळीच परिस्थिती आहे. भाजप सरकार आपल्या एका (मास लिडर नसलेल्या) संघटनात्मक पदाधिकाऱ्याला वाचविण्यासाठी जर या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर ही बाब भाजपसाठीच घातक ठरणार आहे. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच एका पदाधिकाऱ्यावर कारवाई होणे भाजपला नुकसानकारक वाटत असावे, पण खरे म्हणजे कारवाई झाल्याने होणाऱ्या बदनामीपेक्षा कारवाई न केल्याने होत असलेली बदनामी लोकांच्या मनात जास्त शंका निर्माण करीत आहे. भाजप सरकारला आगीत बळी पडलेल्या ७ लोकांच्या जीवापेक्षा आपल्या पदाधिकाऱ्याचे महत्व जास्त वाटते, असा बाऊ उद्या विरोधक करतील. यातून भाजपची प्रतिमा जास्त डागाळल्या जाणार आहे. पक्षवाढीत काहीही योगदान नसणाऱ्या पदाधिकाऱ्याला वाचविण्यात खरे तर कोणताही शहाणपणा नाही. उलट निष्पक्षपणे कारवाई करून ‘चूक करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही सोडत नाही,’ असे छातीठोकपणे सांगण्याची संधी भाजप सरकारमधील पदाधिकाऱ्यांना आहे. ही संधी त्यांनी गमावू नये. नागरिकांना काही कळत नाही, चार दिवस लोक ओरडतील, मग माहौल शांत होईल आणि या प्रकरणावर पडदा पडेल, अशा भ्रमात कोणीही राहिले तर ती मोठी चूक ठरणार आहे. कारण या आगीची धग एवढ्या लवकर शांत होणारी नाही, हे वेळीच लक्षात घेणे गरजेचे आहे.