शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

तालुक्यातील मामा तलावांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 9:47 PM

तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे.

ठळक मुद्दे२० टक्के पाणी साठा : लघु पाटबंधारे तलावांची तीच स्थिती

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे. काही तलावानी तर तळ गाठणे ही सुरु केले आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्यास अजून महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत या तलावात पाणी साठा शिल्लक राहणार की नाही हे सांगणे मात्र अवघड आहे.विशेष म्हणजे यंदा तापमानात सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी तलावातील पाण्याचे लवकर बाष्पीभवन होवून पाणी साठा झपाट्याने घट होत आहे.तालुक्यात एकूण मामा तलावाची संख्या १६१ असून त्यांची एकंदरित पाणी साठवण क्षमता १४.३० दशलक्ष घनमिटर आहे. वर्तमान स्थितीत केवळ ३.५० दशलक्ष घन मिटर पाणी तलावात शिल्लक आहे.तालुक्यात प्रत्येक गाव शेजारी एक किंवा दोन मामा तलाव असून शेकडो गावाची जीवन दायीनी म्हणून मामा तलावाचा उपयोग पडतो. परंतु अनेक मामा तलावात आता ठणठणाट होण्याच्या मार्गावर असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.मामा तलावातील पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्याचे पाणी, जनावरे धुणे, कपडे धुणे यासह विविध बांधकाम आणि पिकांसाठी केला जातो. मात्र हे तलाव कोरडे पडल्यास पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होत असते.पाझर तलावाची स्थिती चांगलीतालुक्यात एकूण चार पाझर तलाव असून त्यांची सिंचन क्षमता ३९ हेक्टर आहे. तर पाणी साठवण क्षमता ०.३१ घनमिटर आहे. पाझर तलावातून मागील खरीप हंगामात २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले तरी वर्तमान स्थितीत ०.२० घन मिटर म्हणजे ६४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.डागडुजीच्या नावावर वारेमाप खर्चलघु पाटबंधारे अंतर्गत तालुक्यात एकूण २९ तलाव असून त्यांची एकूण प्रकल्पीय साठा क्षमता ४.८८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या स्थितीत या तलावात केवळ १ घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. बऱ्याच वर्षांपासून या तलावांची दुरूस्ती केली जात नसल्याने यात पाणी साचून राहण्याऐवजी सहज वाहून जात आहे. त्यामुळे तलावांचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.सिंचन विभागाकडून दरवर्षी डागडुजीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले सांगितले जाते. मात्र यानंतरही तलावांची तीच स्थिती कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दीड हजार हेक्टर शेतीचे सिंचनमागील खरीप हंगामात मामा तलाव आणि लघु पाटबंधारे (लपा) विभागाचे तलाव मिळून एकूण एक हजार ४२४ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. यामध्ये मामा तलावातून ११३० हेक्टरला लपा तलावातून २८.२ हेक्टरला आणि पाझर तलावातून २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. लपा तलावाची एकूण सिंचन क्षमता १६३०.५८ हेक्टर असून १७.३० टक्के पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यात आला. तर मामा तलावांची एकूण सिंचन क्षमता ३६३० हेक्टर असून ३१ टक्के पाण्याचा वापर करण्यात आला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई