शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

तालुक्यातील मामा तलावांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:48 IST

तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे.

ठळक मुद्दे२० टक्के पाणी साठा : लघु पाटबंधारे तलावांची तीच स्थिती

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे. काही तलावानी तर तळ गाठणे ही सुरु केले आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्यास अजून महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत या तलावात पाणी साठा शिल्लक राहणार की नाही हे सांगणे मात्र अवघड आहे.विशेष म्हणजे यंदा तापमानात सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी तलावातील पाण्याचे लवकर बाष्पीभवन होवून पाणी साठा झपाट्याने घट होत आहे.तालुक्यात एकूण मामा तलावाची संख्या १६१ असून त्यांची एकंदरित पाणी साठवण क्षमता १४.३० दशलक्ष घनमिटर आहे. वर्तमान स्थितीत केवळ ३.५० दशलक्ष घन मिटर पाणी तलावात शिल्लक आहे.तालुक्यात प्रत्येक गाव शेजारी एक किंवा दोन मामा तलाव असून शेकडो गावाची जीवन दायीनी म्हणून मामा तलावाचा उपयोग पडतो. परंतु अनेक मामा तलावात आता ठणठणाट होण्याच्या मार्गावर असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.मामा तलावातील पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्याचे पाणी, जनावरे धुणे, कपडे धुणे यासह विविध बांधकाम आणि पिकांसाठी केला जातो. मात्र हे तलाव कोरडे पडल्यास पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होत असते.पाझर तलावाची स्थिती चांगलीतालुक्यात एकूण चार पाझर तलाव असून त्यांची सिंचन क्षमता ३९ हेक्टर आहे. तर पाणी साठवण क्षमता ०.३१ घनमिटर आहे. पाझर तलावातून मागील खरीप हंगामात २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले तरी वर्तमान स्थितीत ०.२० घन मिटर म्हणजे ६४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.डागडुजीच्या नावावर वारेमाप खर्चलघु पाटबंधारे अंतर्गत तालुक्यात एकूण २९ तलाव असून त्यांची एकूण प्रकल्पीय साठा क्षमता ४.८८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या स्थितीत या तलावात केवळ १ घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. बऱ्याच वर्षांपासून या तलावांची दुरूस्ती केली जात नसल्याने यात पाणी साचून राहण्याऐवजी सहज वाहून जात आहे. त्यामुळे तलावांचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.सिंचन विभागाकडून दरवर्षी डागडुजीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले सांगितले जाते. मात्र यानंतरही तलावांची तीच स्थिती कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दीड हजार हेक्टर शेतीचे सिंचनमागील खरीप हंगामात मामा तलाव आणि लघु पाटबंधारे (लपा) विभागाचे तलाव मिळून एकूण एक हजार ४२४ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. यामध्ये मामा तलावातून ११३० हेक्टरला लपा तलावातून २८.२ हेक्टरला आणि पाझर तलावातून २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. लपा तलावाची एकूण सिंचन क्षमता १६३०.५८ हेक्टर असून १७.३० टक्के पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यात आला. तर मामा तलावांची एकूण सिंचन क्षमता ३६३० हेक्टर असून ३१ टक्के पाण्याचा वापर करण्यात आला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई