शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

तालुक्यातील मामा तलावांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:48 IST

तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे.

ठळक मुद्दे२० टक्के पाणी साठा : लघु पाटबंधारे तलावांची तीच स्थिती

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यात एकूण १६१ मामा तलाव असून यापैकी अनेक तलावातील पाणी वाढत्या तापमानामुळे आटत आहे. त्यामुळे हे तलाव सुध्दा पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता असून पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या स्थिती मामा तलावांमध्ये सरासरी २० टक्के पाणी शिल्लक आहे. काही तलावानी तर तळ गाठणे ही सुरु केले आहे. पावसाळ्याला सुरूवात होण्यास अजून महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत या तलावात पाणी साठा शिल्लक राहणार की नाही हे सांगणे मात्र अवघड आहे.विशेष म्हणजे यंदा तापमानात सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी तलावातील पाण्याचे लवकर बाष्पीभवन होवून पाणी साठा झपाट्याने घट होत आहे.तालुक्यात एकूण मामा तलावाची संख्या १६१ असून त्यांची एकंदरित पाणी साठवण क्षमता १४.३० दशलक्ष घनमिटर आहे. वर्तमान स्थितीत केवळ ३.५० दशलक्ष घन मिटर पाणी तलावात शिल्लक आहे.तालुक्यात प्रत्येक गाव शेजारी एक किंवा दोन मामा तलाव असून शेकडो गावाची जीवन दायीनी म्हणून मामा तलावाचा उपयोग पडतो. परंतु अनेक मामा तलावात आता ठणठणाट होण्याच्या मार्गावर असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.मामा तलावातील पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्याचे पाणी, जनावरे धुणे, कपडे धुणे यासह विविध बांधकाम आणि पिकांसाठी केला जातो. मात्र हे तलाव कोरडे पडल्यास पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होत असते.पाझर तलावाची स्थिती चांगलीतालुक्यात एकूण चार पाझर तलाव असून त्यांची सिंचन क्षमता ३९ हेक्टर आहे. तर पाणी साठवण क्षमता ०.३१ घनमिटर आहे. पाझर तलावातून मागील खरीप हंगामात २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले तरी वर्तमान स्थितीत ०.२० घन मिटर म्हणजे ६४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.डागडुजीच्या नावावर वारेमाप खर्चलघु पाटबंधारे अंतर्गत तालुक्यात एकूण २९ तलाव असून त्यांची एकूण प्रकल्पीय साठा क्षमता ४.८८ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या स्थितीत या तलावात केवळ १ घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. बऱ्याच वर्षांपासून या तलावांची दुरूस्ती केली जात नसल्याने यात पाणी साचून राहण्याऐवजी सहज वाहून जात आहे. त्यामुळे तलावांचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.सिंचन विभागाकडून दरवर्षी डागडुजीच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च केले सांगितले जाते. मात्र यानंतरही तलावांची तीच स्थिती कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दीड हजार हेक्टर शेतीचे सिंचनमागील खरीप हंगामात मामा तलाव आणि लघु पाटबंधारे (लपा) विभागाचे तलाव मिळून एकूण एक हजार ४२४ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. यामध्ये मामा तलावातून ११३० हेक्टरला लपा तलावातून २८.२ हेक्टरला आणि पाझर तलावातून २२ हेक्टर शेतीला सिंचन करण्यात आले. लपा तलावाची एकूण सिंचन क्षमता १६३०.५८ हेक्टर असून १७.३० टक्के पाण्याचा वापर सिंचनासाठी करण्यात आला. तर मामा तलावांची एकूण सिंचन क्षमता ३६३० हेक्टर असून ३१ टक्के पाण्याचा वापर करण्यात आला.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई