शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

बाप्पा चालले आपल्या गावाला....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:30 IST

गोंदिया : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. गोंदिया जिल्ह्यात १९ व २० सप्टेंबर या दोन ...

गोंदिया : महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. गोंदिया जिल्ह्यात १९ व २० सप्टेंबर या दोन दिवशी गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला जिल्ह्यातील ३५० गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत, तर २० सप्टेंबर रोजी २५० गणपती विसर्जन केले जाणार आहेत.

गणेशोत्सव शांततेत व भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. गणपती विसर्जनादरम्यान मिरवणूक काढण्यात येऊ नये, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी जिल्हा वाहतूक शाखेसमोरून मोटारसायकलवर रूट मार्च काढला. हा रूटमार्च गोंदिया शहराच्या विविध मार्गावरून भ्रमण करण्यात आला. गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, विजय राणे यांच्यासह पोलीस ठाण्यातील ४० पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटारसायकलवरून हा रूट मार्च काढला होता. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गोंदिया पोलिसांनी गणपती विसर्जनासाठी दोन दिवस देण्यात आले आहेत.

...................

विसर्जन करताना घ्यावी काळजी

गणेशोत्सव शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे बाप्पांची मूर्ती विसर्जन सुरू झाले आहे. बाप्पांचे विसर्जन करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. सद्य:स्थितीत धरण, जलाशय, तलाव, नदी-नाले आदी ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे. धरणाचे पाणी देखील सोडण्यात आले आहे. यादरम्यान कुणीही नागरिक, भक्तगण बाप्पांच्या मूर्तीला खोल पाण्यात घेऊन जाणे टाळावे. कुठल्याही अप्रिय घटनेला भाग पडू नये. शक्यतो घरगुती मूर्तींचे विसर्जन घरी किंवा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्येच करावे. यंदा सावध राहून गणेश विसर्जन करून कुठलीही अप्रिय घटना घडू देणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

..............

प्रदूषण कायद्यातील तरतुदींचे पालन करा

गणेश मंडळांना विनापरवाना वाद्य वाजविता येणार नाही. न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे व ध्वनिप्रदूषण कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून गणेशमूर्तीच्या विर्सजनाच्या वेळी एकाच मार्गाने एका मागे एक मिरवणूक काढण्यात यावी. कोणतेही गणेश मंडळ विरुद्ध दिशेने मिरवणूक काढणार नाही. फटाके ध्वनिक्षेपक याद्वारे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे पोलीस विभागाने कळविले आहे.