शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

बँक व्यवस्थापकाच्या अटी ग्राहकांसाठी ठरल्या डोकेदुखी

By admin | Updated: December 1, 2014 22:56 IST

येथील कोकण ग्रामीण बँक शाखेत केंद्र शासनाच्या जनधन योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून वेळोवेळी लादणाऱ्या जाचक अटींमुळे डोकेदुखी होत आहे.

रावणवाडी : येथील कोकण ग्रामीण बँक शाखेत केंद्र शासनाच्या जनधन योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून वेळोवेळी लादणाऱ्या जाचक अटींमुळे डोकेदुखी होत आहे. परंतु याबाबत नागरिकांनी तक्रार तरी कुठे करावी, अशी समस्या निर्माण झाली आहे.ग्राहकांच्या या समस्येचा फायदा घेत बँक व्यवस्थापक स्वयंनिर्णयाने विविध प्रकारच्या जाचक अटी लादत आहे. त्यामुळे जनधन योजनेचे बँक खाते उघडण्यास बहुतांश नागरिक उत्सुक नसल्याचे दिसून येते आहे. पंतप्रधानांनी केंद्र शासनाच्या वतीने देशातील सर्वच स्तराच्या नागरिकांचे बँक खाते असणे गरजेचे असल्याचे समजून जनधन योजनेतून विनामूल्य बँक खाते उघडण्याचे आवाहन केले. त्यानुसार बँकेने शासनाच्या बहुउद्देशिय लोकहिताच्या योजनेला मदत करणे बँकेचे दायित्व आहे. परंतु बँक व्यवस्थापकांच्या कामकाजाच्या कार्यप्रणालीमुळे सदर योजनेला खिळ बसत आहे.जनधन योजना सुरू झाल्यावेळी बँकेत खाते उघडण्यासाठी एकपानी एक साधा व सोपा अर्ज बँकेकडून पुरविण्यात येत होता. ते अर्ज भरणे सर्वच स्तरावरील नागरिकांना सुलभ जात होते. मात्र हा प्रकार काही दिवस सुरळीत चालून नंतर बंद करण्यात आला. पुन्हा तीच जुनी बँकेची पद्धत सुरू करण्यात आली. ही जुनी पद्धत किचकट व अवघड असून हे फॉर्म समजने व भरणे सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. ही जुनी पद्धत सदर बँकेच्या व्यवस्थापकाने सुरू केल्याने तो फॉर्म खरेदी करण्यासाठी नागरिकांना स्टेशनशीच्या दुकानात जावून १० रूपये मोजावे लागतात. त्यानंतर ते फॉर्म भरून घेण्यासाठी दलालांना ५० ते १०० रूपये द्यावे लागतात. तसेच खाते उघडण्यासाठी ५०० रूपये भरल्यावरच खाते उघडण्यात येतील, असे व्यवस्थापकांचे फर्मान असल्यामुळे मोफत खाते कसे उघडावे अशी समस्या गोरगरीब नागरिकांसमोर उपस्थित झाली आहे. सध्या या परिसरात कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीचे बँकेत खाते उघडण्यासाठी ६०० ते ७०० रूपयांचा खर्च येतो. आणि कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीमुळे बहुतांश नागरिक जनधन योजनेचे खाते उघडण्यास उत्सुकता दाखवित नसल्याचे चित्र दिसून येत आहे.आधीच या बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. दरदिवशी बँकेची कामे सतत सुरू असतात. जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या कामकाजाच्या शेवटपर्यंत ताटकळत रहावे लागते. खात्याच्या नोंदीसाठी आठ-आठ दिवस लागतात, तरी पासबुक हाती येत नाही. या प्रकारामुळे जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांची संख्या मंदावली आहे. यासाठी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणावी, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)