शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

बँक व्यवस्थापकाच्या अटी ग्राहकांसाठी ठरल्या डोकेदुखी

By admin | Updated: December 1, 2014 22:56 IST

येथील कोकण ग्रामीण बँक शाखेत केंद्र शासनाच्या जनधन योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून वेळोवेळी लादणाऱ्या जाचक अटींमुळे डोकेदुखी होत आहे.

रावणवाडी : येथील कोकण ग्रामीण बँक शाखेत केंद्र शासनाच्या जनधन योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून वेळोवेळी लादणाऱ्या जाचक अटींमुळे डोकेदुखी होत आहे. परंतु याबाबत नागरिकांनी तक्रार तरी कुठे करावी, अशी समस्या निर्माण झाली आहे.ग्राहकांच्या या समस्येचा फायदा घेत बँक व्यवस्थापक स्वयंनिर्णयाने विविध प्रकारच्या जाचक अटी लादत आहे. त्यामुळे जनधन योजनेचे बँक खाते उघडण्यास बहुतांश नागरिक उत्सुक नसल्याचे दिसून येते आहे. पंतप्रधानांनी केंद्र शासनाच्या वतीने देशातील सर्वच स्तराच्या नागरिकांचे बँक खाते असणे गरजेचे असल्याचे समजून जनधन योजनेतून विनामूल्य बँक खाते उघडण्याचे आवाहन केले. त्यानुसार बँकेने शासनाच्या बहुउद्देशिय लोकहिताच्या योजनेला मदत करणे बँकेचे दायित्व आहे. परंतु बँक व्यवस्थापकांच्या कामकाजाच्या कार्यप्रणालीमुळे सदर योजनेला खिळ बसत आहे.जनधन योजना सुरू झाल्यावेळी बँकेत खाते उघडण्यासाठी एकपानी एक साधा व सोपा अर्ज बँकेकडून पुरविण्यात येत होता. ते अर्ज भरणे सर्वच स्तरावरील नागरिकांना सुलभ जात होते. मात्र हा प्रकार काही दिवस सुरळीत चालून नंतर बंद करण्यात आला. पुन्हा तीच जुनी बँकेची पद्धत सुरू करण्यात आली. ही जुनी पद्धत किचकट व अवघड असून हे फॉर्म समजने व भरणे सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. ही जुनी पद्धत सदर बँकेच्या व्यवस्थापकाने सुरू केल्याने तो फॉर्म खरेदी करण्यासाठी नागरिकांना स्टेशनशीच्या दुकानात जावून १० रूपये मोजावे लागतात. त्यानंतर ते फॉर्म भरून घेण्यासाठी दलालांना ५० ते १०० रूपये द्यावे लागतात. तसेच खाते उघडण्यासाठी ५०० रूपये भरल्यावरच खाते उघडण्यात येतील, असे व्यवस्थापकांचे फर्मान असल्यामुळे मोफत खाते कसे उघडावे अशी समस्या गोरगरीब नागरिकांसमोर उपस्थित झाली आहे. सध्या या परिसरात कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीचे बँकेत खाते उघडण्यासाठी ६०० ते ७०० रूपयांचा खर्च येतो. आणि कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीमुळे बहुतांश नागरिक जनधन योजनेचे खाते उघडण्यास उत्सुकता दाखवित नसल्याचे चित्र दिसून येत आहे.आधीच या बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. दरदिवशी बँकेची कामे सतत सुरू असतात. जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या कामकाजाच्या शेवटपर्यंत ताटकळत रहावे लागते. खात्याच्या नोंदीसाठी आठ-आठ दिवस लागतात, तरी पासबुक हाती येत नाही. या प्रकारामुळे जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांची संख्या मंदावली आहे. यासाठी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणावी, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)