शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

बँक व्यवस्थापकाच्या अटी ग्राहकांसाठी ठरल्या डोकेदुखी

By admin | Updated: December 1, 2014 22:56 IST

येथील कोकण ग्रामीण बँक शाखेत केंद्र शासनाच्या जनधन योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून वेळोवेळी लादणाऱ्या जाचक अटींमुळे डोकेदुखी होत आहे.

रावणवाडी : येथील कोकण ग्रामीण बँक शाखेत केंद्र शासनाच्या जनधन योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना बँक व्यवस्थापनाकडून वेळोवेळी लादणाऱ्या जाचक अटींमुळे डोकेदुखी होत आहे. परंतु याबाबत नागरिकांनी तक्रार तरी कुठे करावी, अशी समस्या निर्माण झाली आहे.ग्राहकांच्या या समस्येचा फायदा घेत बँक व्यवस्थापक स्वयंनिर्णयाने विविध प्रकारच्या जाचक अटी लादत आहे. त्यामुळे जनधन योजनेचे बँक खाते उघडण्यास बहुतांश नागरिक उत्सुक नसल्याचे दिसून येते आहे. पंतप्रधानांनी केंद्र शासनाच्या वतीने देशातील सर्वच स्तराच्या नागरिकांचे बँक खाते असणे गरजेचे असल्याचे समजून जनधन योजनेतून विनामूल्य बँक खाते उघडण्याचे आवाहन केले. त्यानुसार बँकेने शासनाच्या बहुउद्देशिय लोकहिताच्या योजनेला मदत करणे बँकेचे दायित्व आहे. परंतु बँक व्यवस्थापकांच्या कामकाजाच्या कार्यप्रणालीमुळे सदर योजनेला खिळ बसत आहे.जनधन योजना सुरू झाल्यावेळी बँकेत खाते उघडण्यासाठी एकपानी एक साधा व सोपा अर्ज बँकेकडून पुरविण्यात येत होता. ते अर्ज भरणे सर्वच स्तरावरील नागरिकांना सुलभ जात होते. मात्र हा प्रकार काही दिवस सुरळीत चालून नंतर बंद करण्यात आला. पुन्हा तीच जुनी बँकेची पद्धत सुरू करण्यात आली. ही जुनी पद्धत किचकट व अवघड असून हे फॉर्म समजने व भरणे सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. ही जुनी पद्धत सदर बँकेच्या व्यवस्थापकाने सुरू केल्याने तो फॉर्म खरेदी करण्यासाठी नागरिकांना स्टेशनशीच्या दुकानात जावून १० रूपये मोजावे लागतात. त्यानंतर ते फॉर्म भरून घेण्यासाठी दलालांना ५० ते १०० रूपये द्यावे लागतात. तसेच खाते उघडण्यासाठी ५०० रूपये भरल्यावरच खाते उघडण्यात येतील, असे व्यवस्थापकांचे फर्मान असल्यामुळे मोफत खाते कसे उघडावे अशी समस्या गोरगरीब नागरिकांसमोर उपस्थित झाली आहे. सध्या या परिसरात कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. कुटुंबातील एका व्यक्तीचे बँकेत खाते उघडण्यासाठी ६०० ते ७०० रूपयांचा खर्च येतो. आणि कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीमुळे बहुतांश नागरिक जनधन योजनेचे खाते उघडण्यास उत्सुकता दाखवित नसल्याचे चित्र दिसून येत आहे.आधीच या बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. दरदिवशी बँकेची कामे सतत सुरू असतात. जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या कामकाजाच्या शेवटपर्यंत ताटकळत रहावे लागते. खात्याच्या नोंदीसाठी आठ-आठ दिवस लागतात, तरी पासबुक हाती येत नाही. या प्रकारामुळे जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांची संख्या मंदावली आहे. यासाठी संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणावी, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)