शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वनसेवा परीक्षा पात्र उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

राज्यात वर्ग १ व २ च्या अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र होण्यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेऊन परीक्षेत यश संपादन करतात. आज ना उद्या ही परीक्षा उत्तीर्ण केली की आपल्याला चांगली नोकरी मिळणार या अपेक्षेने ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील जिद्द व चिकाटीने अभ्यास करुन या परीक्षेत पात्र ठरतात.

ठळक मुद्देराज्यातील ५२ पात्र उमेदवार : वर्षभरापासून बघताहेत वाट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून (एमपीएससी) घेण्यात आलेली वनसेवा परीक्षा राज्यातील ५२ उमेदवारांनी उत्तीर्ण केली. परीक्षेचा निकाल २४ मे २०१९ रोजी जाहीर करण्यात आला असून आता वर्ष लोटले. मात्र पात्र उमेदवारांची नियुक्ती अद्याप करण्यात आली नसल्याने ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.राज्यात वर्ग १ व २ च्या अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र होण्यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेऊन परीक्षेत यश संपादन करतात. आज ना उद्या ही परीक्षा उत्तीर्ण केली की आपल्याला चांगली नोकरी मिळणार या अपेक्षेने ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील जिद्द व चिकाटीने अभ्यास करुन या परीक्षेत पात्र ठरतात. त्यानुरुप महाराष्ट्र राज्यातील एकूण ५२ उमेदवारांनी महाराष्ट्र वनसेवा परीक्षा पास केली. वनपरिक्षेत्र अधिकारी पदासाठी घेण्यात आलेली महाराष्ट्र वनसेवा परीक्षा वर्ग २ राजपत्रित अधिकारी या पदाकरिता होती. अनेकांनी मोठ्या कठीण परिस्थितीत जवळपास १० ते १५ तास अभ्यास करुन ती परीक्षा उत्तीर्ण केली.मात्र राज्य शासनाने पात्र ठरलेल्या त्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार कामावर रुजू केले नाही. त्यामुळे शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा कोठून आणावा व आर्थिक अडचण कशी पूर्ण करावी असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या संकटात देश सापडला असून या संकटाचा सामना करीत असताना सरकार या पात्र उमेदवारांना कामावर केव्हा रुजू करणार अशा विवंचनेत ते उमेदवार सापडले आहेत.त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत. ५२ पैकी बहुतांश पात्र उमेदवार हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात रोजगाराची समस्या अधिकच निर्माण झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने त्या पात्र उमेदवारांकडे लक्ष देवून त्यांची शासकीय सेवेत नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारी