शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

वनसेवा परीक्षा पात्र उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

राज्यात वर्ग १ व २ च्या अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र होण्यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेऊन परीक्षेत यश संपादन करतात. आज ना उद्या ही परीक्षा उत्तीर्ण केली की आपल्याला चांगली नोकरी मिळणार या अपेक्षेने ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील जिद्द व चिकाटीने अभ्यास करुन या परीक्षेत पात्र ठरतात.

ठळक मुद्देराज्यातील ५२ पात्र उमेदवार : वर्षभरापासून बघताहेत वाट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून (एमपीएससी) घेण्यात आलेली वनसेवा परीक्षा राज्यातील ५२ उमेदवारांनी उत्तीर्ण केली. परीक्षेचा निकाल २४ मे २०१९ रोजी जाहीर करण्यात आला असून आता वर्ष लोटले. मात्र पात्र उमेदवारांची नियुक्ती अद्याप करण्यात आली नसल्याने ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.राज्यात वर्ग १ व २ च्या अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एमपीएससी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पात्र होण्यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेऊन परीक्षेत यश संपादन करतात. आज ना उद्या ही परीक्षा उत्तीर्ण केली की आपल्याला चांगली नोकरी मिळणार या अपेक्षेने ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील जिद्द व चिकाटीने अभ्यास करुन या परीक्षेत पात्र ठरतात. त्यानुरुप महाराष्ट्र राज्यातील एकूण ५२ उमेदवारांनी महाराष्ट्र वनसेवा परीक्षा पास केली. वनपरिक्षेत्र अधिकारी पदासाठी घेण्यात आलेली महाराष्ट्र वनसेवा परीक्षा वर्ग २ राजपत्रित अधिकारी या पदाकरिता होती. अनेकांनी मोठ्या कठीण परिस्थितीत जवळपास १० ते १५ तास अभ्यास करुन ती परीक्षा उत्तीर्ण केली.मात्र राज्य शासनाने पात्र ठरलेल्या त्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार कामावर रुजू केले नाही. त्यामुळे शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा कोठून आणावा व आर्थिक अडचण कशी पूर्ण करावी असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या संकटात देश सापडला असून या संकटाचा सामना करीत असताना सरकार या पात्र उमेदवारांना कामावर केव्हा रुजू करणार अशा विवंचनेत ते उमेदवार सापडले आहेत.त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत. ५२ पैकी बहुतांश पात्र उमेदवार हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात रोजगाराची समस्या अधिकच निर्माण झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने त्या पात्र उमेदवारांकडे लक्ष देवून त्यांची शासकीय सेवेत नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Employeeकर्मचारी