शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

पूर्व विदर्भातील ३५ हजार शेतकरी धान विक्रीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 12:38 IST

यंदा शासनाने धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट लागू केली होती. यासाठी एकट्या गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

ठळक मुद्देमुदत संपली : खासगी व्यापाऱ्यांना अल्प दराने धान विक्रीची वेळ

गोंदिया : आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील धान विक्रीची मुदत केवळ ७ फेब्रुवारीपर्यंत होती. ही मुदत संपल्याने पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील ३५ हजारांवर शेतकरी धानाची विक्री करण्यापासून वंचित राहिल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते. यंदा शासनाने धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची अट लागू केली होती. यासाठी एकट्या गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, तर उर्वरित जिल्ह्यातील साडेचार लाखांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १०७ धान खरेदी केंद्रावरून ३५ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदी जिल्ह्यात ७ फेब्रुवारीपर्यंत केली. तर इतर जिल्ह्यात जवळपास १ कोटी क्विंटल धान खरेदी झाली. मात्र, धान विक्री करण्याची मुदत ७ फेब्रुवारीला संपल्याने पूर्व विदर्भातील ३५ हजार शेतकरी धान विक्री करण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता अत्यल्प दराने खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याची वेळ आली आहे.

दोन महिन्यांपासून ९०० कोटी रुपयांचे चुकारे थकले

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून चुकारे थकले आहेत. पूर्व विदर्भातील जवळपास ९०० कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांना सावकार आणि नातेवाइकांपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे.

बाेनसचाही पत्ता नाही

उत्पादन खर्चानुसार धानाला अपेक्षित हमीभाव नसल्याने मागील काही वर्षांपासून राज्यातील सरकार धान उत्पादकांना सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देतात. मागील वर्षी आघाडी सरकारने ५० क्विंटलच्या मर्यादित प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस शेतकऱ्यांना दिला होता. परंतु यावर्षी तशी घोषणा केली नाही. मुंबई येथील हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोनस ऐवजी धान उत्पादकांना थेट त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेद्वारे रक्कम जमा करण्याची घोषणा केली आहे. मात्र, या संबंधीचे कोणतेही परिपत्रक निघाले नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीGovernmentसरकारVidarbhaविदर्भ