शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

उपशिक्षणाधिकाऱ्यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनामुळे कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला असून, कित्येकांवर दोन वेळच्या जेवणाचे संकट उभे असतानाही शाळांकडून मात्र ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनामुळे कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला असून, कित्येकांवर दोन वेळच्या जेवणाचे संकट उभे असतानाही शाळांकडून मात्र माणुसकी न दाखविता फीवाढ व फीसाठी तगादा लावला जात आहे. मागील वर्षीही शाळांनी नाममात्र फी कमी करून पालकांकडून बाकीचे पैसे उकळून घेतले. तोच प्रकार यंदाही होत असून, पुस्तकांसाठी पालकांना फोन करणे सुरू झाले असून, काही दिवसांनी फीसाठी फोन करण्यास सुरुवात होईल. कोरोनाच्या कठीण समयीही शाळांकडून काहीच दयाभाव न दाखविता पैसे कमाविण्याचा कारभार सुरू आहेत. त्यात शिक्षण विभागातील २० पैकी १६ पदे रिक्त आहेत. अशात आता पालकांनी तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न पडला आहे.

--------------------------

उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारींची जबाबदारी

कोरोनाकाळात शिक्षण विभागाकडे पाच तक्रारी आल्या आहेत. त्यात तीन तक्रारी शिक्षण शुल्काबाबत असून दाेन तक्रारी शिक्षकांच्या वेतनाला घेऊन आहेत. या पाचही तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून, आता विभागाकडे एकही तक्रार पेंडिंग नाही.

--------------------------------

पालक म्हणतात, तक्रार करायची कोठे

कोरोनाकाळात शाळा बंद असून मुले एक दिवसही शाळेत गेले नाहीत. तरीही शाळांकडून फीसाठी तगादा लावला जातो. मागील वर्षी तसेच झाले व अखेर मोजकी सूट देऊन शाळांनी बाकीची फी वसूल केली. यंदाही तोच प्रकार घडणार आहे. यावर पक्की कारवाई होणार यासाठी तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न पडतो.

- माया शिवणकर (पालक)

--------------------

आज शिक्षण एवढे महागडे झाले आहे की, ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तरीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पालक काटकसर करीत आहेत. मात्र कोरोनामुळे पाल्य शाळेत गेले नसतानाही शाळांकडून फी घेतली जात आहे, हे चुकीचे आहे. मागील वर्षी तसेच झाले, आताही तसेच होणार आहे. मात्र तक्रार करायची कुणाकडे हेच समजत नाही.

छाया नागपूरे (पालक)

-----------------------------

संघटना पदाधिकारी कोट

जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभारच प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत आहे. अशात शिक्षकांच्या तक्रारी आम्ही प्रभारी अधिकाऱ्यांकडे मांडतो. मात्र ते आमच्या समस्यांचे पूर्ण ताकदीने निराकरण करीत नाहीत. यामुळे आमच्या कित्येक तक्रारी प्रलंबित पडून आहेत. कायम अधिकारी येत नाहीत तोपर्यंत यावर काहीच तोडगा नाही.

- एस. यू. वंजारी, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

-----------------------------

जिल्ह्यातील रिक्त पदांमुळे सर्व कारभार प्रभारींच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. यामुळे तक्रार करूनही त्यांच्याकडून वेळेवर काम होत नसल्याने तक्रारी प्रलंबित आहेत. कायम अधिकारी येत नाही तोपर्यंत हीच स्थिती राहणार असून, यासाठी पदभरती करणे गरजेचे आहे.

-किशोर बावनकर

तालुका सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

------------------------------

१) जिल्ह्यातील शाळा -११४१

शासकीय शाळा - १०६९

अनुदानित शाळा -६१

विनाअनुदानित शाळा - ११

२) शिक्षण विभागात रिक्त पदे वाढली

एकूण पदे रिक्त पदे

शिक्षणधिकारी - ०१ ०१

गट शिक्षणाधिकारी - ०८ ०७

उपशिक्षणाधिकारी - ०३ ०३

अधीक्षक (शालेय पोषण आहार) ०७ ०४

लेखाधिकारी ०१ ०१