शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

उपशिक्षणाधिकाऱ्यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

कपिल केकत गोंदिया : कोरोनामुळे कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला असून, कित्येकांवर दोन वेळच्या जेवणाचे संकट उभे असतानाही शाळांकडून मात्र ...

कपिल केकत

गोंदिया : कोरोनामुळे कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला असून, कित्येकांवर दोन वेळच्या जेवणाचे संकट उभे असतानाही शाळांकडून मात्र माणुसकी न दाखविता फीवाढ व फीसाठी तगादा लावला जात आहे. मागील वर्षीही शाळांनी नाममात्र फी कमी करून पालकांकडून बाकीचे पैसे उकळून घेतले. तोच प्रकार यंदाही होत असून, पुस्तकांसाठी पालकांना फोन करणे सुरू झाले असून, काही दिवसांनी फीसाठी फोन करण्यास सुरुवात होईल. कोरोनाच्या कठीण समयीही शाळांकडून काहीच दयाभाव न दाखविता पैसे कमाविण्याचा कारभार सुरू आहेत. त्यात शिक्षण विभागातील २० पैकी १६ पदे रिक्त आहेत. अशात आता पालकांनी तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न पडला आहे.

--------------------------

उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारींची जबाबदारी

कोरोनाकाळात शिक्षण विभागाकडे पाच तक्रारी आल्या आहेत. त्यात तीन तक्रारी शिक्षण शुल्काबाबत असून दाेन तक्रारी शिक्षकांच्या वेतनाला घेऊन आहेत. या पाचही तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून, आता विभागाकडे एकही तक्रार पेंडिंग नाही.

--------------------------------

पालक म्हणतात, तक्रार करायची कोठे

कोरोनाकाळात शाळा बंद असून मुले एक दिवसही शाळेत गेले नाहीत. तरीही शाळांकडून फीसाठी तगादा लावला जातो. मागील वर्षी तसेच झाले व अखेर मोजकी सूट देऊन शाळांनी बाकीची फी वसूल केली. यंदाही तोच प्रकार घडणार आहे. यावर पक्की कारवाई होणार यासाठी तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न पडतो.

- माया शिवणकर (पालक)

--------------------

आज शिक्षण एवढे महागडे झाले आहे की, ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तरीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पालक काटकसर करीत आहेत. मात्र कोरोनामुळे पाल्य शाळेत गेले नसतानाही शाळांकडून फी घेतली जात आहे, हे चुकीचे आहे. मागील वर्षी तसेच झाले, आताही तसेच होणार आहे. मात्र तक्रार करायची कुणाकडे हेच समजत नाही.

छाया नागपूरे (पालक)

-----------------------------

संघटना पदाधिकारी कोट

जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा कारभारच प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत आहे. अशात शिक्षकांच्या तक्रारी आम्ही प्रभारी अधिकाऱ्यांकडे मांडतो. मात्र ते आमच्या समस्यांचे पूर्ण ताकदीने निराकरण करीत नाहीत. यामुळे आमच्या कित्येक तक्रारी प्रलंबित पडून आहेत. कायम अधिकारी येत नाहीत तोपर्यंत यावर काहीच तोडगा नाही.

- एस. यू. वंजारी, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

-----------------------------

जिल्ह्यातील रिक्त पदांमुळे सर्व कारभार प्रभारींच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. यामुळे तक्रार करूनही त्यांच्याकडून वेळेवर काम होत नसल्याने तक्रारी प्रलंबित आहेत. कायम अधिकारी येत नाही तोपर्यंत हीच स्थिती राहणार असून, यासाठी पदभरती करणे गरजेचे आहे.

-किशोर बावनकर

तालुका सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

------------------------------

१) जिल्ह्यातील शाळा -११४१

शासकीय शाळा - १०६९

अनुदानित शाळा -६१

विनाअनुदानित शाळा - ११

२) शिक्षण विभागात रिक्त पदे वाढली

एकूण पदे रिक्त पदे

शिक्षणधिकारी - ०१ ०१

गट शिक्षणाधिकारी - ०८ ०७

उपशिक्षणाधिकारी - ०३ ०३

अधीक्षक (शालेय पोषण आहार) ०७ ०४

लेखाधिकारी ०१ ०१