शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 19:57 IST

पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

ठळक मुद्देमहादेव जानकर : लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियान

आॅनलाईन लोकमतदेवरी : पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वत:च्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानांतर्गत देवरी तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (दि.२४) घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच विद्या खोटेले होत्या. या वेळी पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. संजय गायगवळी, जि.प. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शहारे, जि.प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय कोळेकर, तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी हिरूळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जानकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत अनेक योजना आहेत. त्या योजनांचा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांनी लाभ घ्यावा. गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकºयाने जोडधंदा म्हणून माशांची शेती करावी. ग्रामीण भागातील नागरिकांनी कुक्कुटपालन व्यवसाय करावा. शेतकºयाचा मुलगा उद्योगपती कसा बनेल, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मुला-मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही. पशुसंवर्धन विभागातील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर कशा पध्दतीने भरता येतील, यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लाळ खुरकूत हा गाई-म्हशींमध्ये विषाणूमुळे होणारा सांसर्गिक रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. लसीकरणामुळे पशुधनाचा लाळ खुरकूत या सांसर्गिक रोगापासून बचाव होतो. त्यामुळे उत्पादनाचे सातत्य टिकून राहते व रोगमुक्त पशुजन्य उत्पादनांची निर्यात सुलभ होते. सर्व शेतकºयांनी एफएमडीसीपी अंतर्गत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. शहारे म्हणाले, जिल्ह्यातील संकलित दुधाकरिता मार्केटिंगची आवश्यकता आहे. या लसीकरण अभियानाचा सर्व गोपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकातून डॉ. वासनिक म्हणाले, जनावरांचे लाळ खुरकूत रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे वर्षातून दोन वेळा लसीकरण करावे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील सर्व जनावरांचे लसीकरण एकाच दिवशी केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. लसीकरण शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी उशीरा म्हणजेच थंड वातावरणात करावे. लाळ खुरकूत रोगप्रतिबंधक लसमात्रा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध आहेत. त्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहिणी साळवे, डॉ. सायली तगारे, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील आकांत, डॉ. वानखेडे, डॉ. चौधरी, डॉ. येडेवार, पशुधन पर्यवेक्षक डॉ. पदम, ग्रामपंचायत सदस्य गीता पंधरे, ग्रामसेवक एस.एस. सिरसाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम रहिले व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन डॉ. येडेकर यांनी केले. आभार पशुधन विकास अधिकारी डॉ. कोळेकर यांनी मानले.