शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

कृषी केंद्र संचालकांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:08 IST

परवानगी नसलेल्या कंपनीची कीटकनाशके फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतकºयांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरुन कृषी केंद्र संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७५० कृषी केंद्राचा समावेश : शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परवानगी नसलेल्या कंपनीची कीटकनाशके फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतकºयांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरुन कृषी केंद्र संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी गुरूवार (दि.२) पासून तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील सर्व ७५० कृषी केंद्र संचालकांनी सहभाग घेतला आहे.यवतमाळ जिल्ह्यात परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशकांची फवारणी केल्याने २० शेतकºयांचा बळी गेला. त्यानंतर विदर्भात इतर ठिकाणी कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याच्या घटना पुढे आल्या. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. शेतकºयांची यावर ओरड वाढल्यानंतर शासन आणि प्रशासनाने याची दखल घेत कृषी केंद्रावर धाडी टाकून कृषी केंद्र संचालकांवर मोक्का अंतर्गत फौजदारी कारवाई केली. यामुळे कृषी केंद्र संचालकाचे धाबे दणाणले आहे. कृषी विभागातर्फे कृषी केंद्र संचालकांना जबाबदार धरुन केली जात असलेली कारवाई अयोग्य आहे. ज्या कंपन्याच्या कीटकनाशकांना विक्रीची परवानगी नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून कृषी केंद्र संचालकांना बळीचा बकरा बनविल्या जात असल्याचा आरोप महाराष्टÑ फर्टिलाईजर्स संघटनेने केला. कृषी विभागाने खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच धाड सत्र राबवून कीटकनाशकांची तपासणी केली असती तर आज ही वेळ आली नसती. मात्र शासन आणि प्रशासन स्वत:च्या चुकीचे खापर कृषी केंद्र संचालकांवर फोडत असल्याचा आरोप कृषी केंद्र संचालकांनी केला आहे.कृषी केंद्र संचालकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेवून राज्यभरातील कृषी केंद्र संचालकांनी गुरूवार (दि.२) पासून सलग तीन दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण ९५० परवानाधारक कृषी केंद्र आहेत. यापैकी सध्या स्थितीत ७५० कृषी केंद्र सुरू असून या सर्वांनी संघटनेच्या आवाहनाला समर्थन देत कृषी केंद्र बंद ठेवली.यासंदर्भात संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजू परमाका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संघटनेच्या निर्णयानुसार सर्व कृषी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. संघटनेचा जो निर्णय होईल त्यानुसार पुढीेल कार्यक्रम ठरविला जाणार असल्याचे सांगितले.कृषी विभागाची बघ्याची भूमिकायंदा धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. अशा स्थितीत कीडरोग नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करायची याचे मार्गदर्शन शेतकºयांना करुन ती सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याचे काम कृषी विभागाचे आहे. मात्र हा विभाग केवळ प्रसिध्दपत्रक काढून आवाहन करण्यातच समाधान मानत असल्याचे चित्र आहे.शेतकरी अडचणीतकमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीटकनाशके खरेदी करुन कीडरोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. मात्र गुरूवार(दि.२)पासून कृषी केंद्र संचालकांनी तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कीटकनाशके खरेदीसाठी येणाºया शेतकºयांना आल्यापावलीच परत जावे लागत आहे.