शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

कृषी केंद्र संचालकांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:08 IST

परवानगी नसलेल्या कंपनीची कीटकनाशके फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतकºयांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरुन कृषी केंद्र संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७५० कृषी केंद्राचा समावेश : शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परवानगी नसलेल्या कंपनीची कीटकनाशके फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील २० शेतकºयांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरुन कृषी केंद्र संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी राज्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी गुरूवार (दि.२) पासून तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यातील सर्व ७५० कृषी केंद्र संचालकांनी सहभाग घेतला आहे.यवतमाळ जिल्ह्यात परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशकांची फवारणी केल्याने २० शेतकºयांचा बळी गेला. त्यानंतर विदर्भात इतर ठिकाणी कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याच्या घटना पुढे आल्या. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. शेतकºयांची यावर ओरड वाढल्यानंतर शासन आणि प्रशासनाने याची दखल घेत कृषी केंद्रावर धाडी टाकून कृषी केंद्र संचालकांवर मोक्का अंतर्गत फौजदारी कारवाई केली. यामुळे कृषी केंद्र संचालकाचे धाबे दणाणले आहे. कृषी विभागातर्फे कृषी केंद्र संचालकांना जबाबदार धरुन केली जात असलेली कारवाई अयोग्य आहे. ज्या कंपन्याच्या कीटकनाशकांना विक्रीची परवानगी नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून कृषी केंद्र संचालकांना बळीचा बकरा बनविल्या जात असल्याचा आरोप महाराष्टÑ फर्टिलाईजर्स संघटनेने केला. कृषी विभागाने खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच धाड सत्र राबवून कीटकनाशकांची तपासणी केली असती तर आज ही वेळ आली नसती. मात्र शासन आणि प्रशासन स्वत:च्या चुकीचे खापर कृषी केंद्र संचालकांवर फोडत असल्याचा आरोप कृषी केंद्र संचालकांनी केला आहे.कृषी केंद्र संचालकांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेवून राज्यभरातील कृषी केंद्र संचालकांनी गुरूवार (दि.२) पासून सलग तीन दिवस प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण ९५० परवानाधारक कृषी केंद्र आहेत. यापैकी सध्या स्थितीत ७५० कृषी केंद्र सुरू असून या सर्वांनी संघटनेच्या आवाहनाला समर्थन देत कृषी केंद्र बंद ठेवली.यासंदर्भात संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विजू परमाका यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संघटनेच्या निर्णयानुसार सर्व कृषी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. संघटनेचा जो निर्णय होईल त्यानुसार पुढीेल कार्यक्रम ठरविला जाणार असल्याचे सांगितले.कृषी विभागाची बघ्याची भूमिकायंदा धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. अशा स्थितीत कीडरोग नियंत्रणासाठी कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करायची याचे मार्गदर्शन शेतकºयांना करुन ती सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याचे काम कृषी विभागाचे आहे. मात्र हा विभाग केवळ प्रसिध्दपत्रक काढून आवाहन करण्यातच समाधान मानत असल्याचे चित्र आहे.शेतकरी अडचणीतकमी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीटकनाशके खरेदी करुन कीडरोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. मात्र गुरूवार(दि.२)पासून कृषी केंद्र संचालकांनी तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कीटकनाशके खरेदीसाठी येणाºया शेतकºयांना आल्यापावलीच परत जावे लागत आहे.