शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

११ व्या यादीनंतरही २५ हजार शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:12 PM

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देसाडेचार हजार शेतकऱ्यांचा समावेश : आतापर्यंत ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत मागील वर्षी कर्जमाफीची घोषणा केली. यात जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर नुकतीच बँकांना कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ४ हजार ४४६ शेतकऱ्यांची अकरावी ग्रीन यादी प्राप्त झाली आहे.यानंतरही कर्जमाफीस पात्र ठरलेले २५ हजार शेतकरी वेटिंंगवर आहेत. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या आॅनलाईन अर्जांची पडताळणी करुन त्याची येलो, ग्रीन आणि रेड अशा याद्या तयार करुन विभागणी केली जात आहेत. ग्रीन यादी ही अंतीम यादी असून यातील पात्र लाभार्थी शेतकºयांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जात आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ९० हजारावर शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी आत्तापर्यंत ६३ हजार ६०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यावर १५८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँका आत्तापर्यंत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना एकूण १० ग्रीन याद्या प्राप्त झाल्या आहेत. तर मंगळवारी (दि.२३) ४४४६ शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या शेतकऱ्यांची ११ वी ग्रीन यादी प्राप्त झाली. तसेच या शेतकºयांचे कर्ज खाते शून्य करण्यासाठी ११ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी सुध्दा जिल्हा बँकेला प्राप्त झाला आहे.लवकरच सदर रक्कम पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करुन त्यांचे कर्ज खाते शून्य करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.प्रतीक्षा कायमजिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण शेतकºयांपैकी आत्तापर्यंत ६३ हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तर अजून जवळपास २५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून दोन तीन ग्रीन याद्या महाआॅनलाईनकडून येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.१४ महिन्यानंतरही प्रक्रिया सुरूचशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास १४ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शासन आणि महाआॅनलाईनकडून रोज नवीन नवीन निकष लावले जात असल्याचे कर्जमाफीच्या प्रक्रियेस विलंब होत आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज