शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा गरजूंना लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:17 PM

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलांची नावे यादीत आहेत व ज्यांची नावे गॅस कनेक्शनसाठी नाहीत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : योजनेचा आढावा, एन्जसीसमोर फलक लावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलांची नावे यादीत आहेत व ज्यांची नावे गॅस कनेक्शनसाठी नाहीत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते.या वेळी आमदार संजय पुराम, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक व जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.बडोले म्हणाले, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत जिल्ह्याला १ लाख २० हजार ६३३ उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रत्येक तालुका स्तरावर शिबिरे घेण्यात यावी. यासाठी गॅस एजन्सीधारकाने सहकार्य करावे. येत्या सहा महिन्यांत सर्व पात्र लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात यावे. तसेच सर्व गॅस वितरक एजन्सीपुढे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीबाबत बॅनर लावण्यात यावे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.या वेळी त्यांनी गॅस एजन्सीधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकीला गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी जी.एम. तळपाडे, अर्जुनी-मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, देवरीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी साहेबराव राठोड तसेच सर्व गॅस वितरक एजन्सीधारक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.वनहक्क पट्ट्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढामागील काही वर्षांपासून वनहक्क जमिनीच्या पट्ट्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. संबंधित लाभार्थ्यांना या वनहक्क पट्ट्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. लोकांजवळ शेती नाही. त्यामुळे वनहक्क पट्ट्यांचे जुने दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय स्तरावर शिबिरे घेवून प्रलंबित प्रकरणे लवकराव लवकर निकाली काढण्यात यावे. उपविभागीय स्तरावर १७६३४ प्राप्त दावे असून अर्जुनी-मोरगाव ४३९२, तिरोडा ३०२, देवरी ३८० व गोंदिया निरंक, असे एकूण ५०७४ दावे प्रलंबित आहेत. अनेक वर्षांपासून लाभार्थी वनहक्क पट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे वनहक्क पट्ट्यांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने वैयक्तिक लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले