शहरं
Join us  
Trending Stories
1
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
2
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
3
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
4
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
5
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
6
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
7
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
8
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
9
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
10
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
11
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
12
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
13
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
14
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
15
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
16
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
17
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
18
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
19
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
20
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या हाताला मनरेगाची कामे देण्यास प्रशासनाचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागून करण्यात आली आहे. परिणामी उद्योगधंदे आणि रोजगाराची साधने सर्व ठप्प आहे. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसला आहे. मोठ्या शहरात आणि राज्यात रोजगारासाठी गेलेले मजूर आता त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने आपल्या स्वगृही परतत आहे.

ठळक मुद्देकेवळ ३२५८ कामे सुरू : २ लाख २० मजूर कामाच्या प्रतीक्षेत : ग्रामपंचायतींना नियमाचा अडसर

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतरण सुरू आहे. तर मागील दोन महिन्यापासून मजुरांच्या हाताला रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र शासनाने मनरेगातंर्गत कामे उपलब्ध करुन देण्याचा दावा केला असला तरी वास्तविकता वेगळीच आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या स्थितीत केवळ ३२५८ कामे सुरू असून त्यावर ३८ हजार ३५६ मजूर कार्यरत आहे. तर अजूनही २ लाख १० हजार जाब कार्डधारक मजूर रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे.त्यामुळे मजुरांच्या हाताला मनरेगाची कामे उपलब्ध करुन देण्यास प्रशासन खो देत असल्याचे चित्र आहे.मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागून करण्यात आली आहे. परिणामी उद्योगधंदे आणि रोजगाराची साधने सर्व ठप्प आहे. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसला आहे. मोठ्या शहरात आणि राज्यात रोजगारासाठी गेलेले मजूर आता त्यांच्या हाताला रोजगार नसल्याने आपल्या स्वगृही परतत आहे. मात्र स्वगृही परतल्यानंतरही त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराचा प्रश्न कायम आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कामे सुरू करण्याची आणि त्यासाठी भरीव तरतूद केल्याची घोषणा पॅकेजमध्ये केली. मात्र ग्रामीण भागातील चित्र फार बिकट आहे.त्यातच पावसाळ्याला सुरूवात होण्यास केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. पण जिल्ह्यात सुरू असलेल्या मनरेगाच्या कामाची स्थिती पाहता लाखो मजूर कामापासून वंचित आहेत. जिल्ह्यात एकूण २ लाख ५८ हजार जाब कार्डधारक मजूर आहेत. तर सध्या जिल्ह्यात एकूण ३२५८ कामे सुरू असून या कामांवर ३८ हजार ३५६ मजूर कार्यरत आहे. त्यामुळे २ लाख २० हजार जाब कार्डधारक मजूर रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच यात बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून परतलेल्या ४३ हजार मजुरांची संख्या जोडल्यास जवळपास २ लाख ६० हजारावर मजुरांच्या हाताला रोजगार नाही.तर जिल्ह्यातील यंत्रणांकडून अजून व्यापक स्वरुपात कामे सुरू करण्यात आली नाहीत. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीकडे भरपूर कामे असून ती कामे करण्यास ग्रामपंचायती तयार असताना त्यांना ५ लाख रुपये पर्यंतच्या कामाच्या मर्यादेची अडचण होत आहे. त्यामुळे ते कामे असून सुध्दा शासनाच्या धोरणामुळे कामे उपलब्ध करुन देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यातच ही कामे केवळ १५ जूनपर्यंत करण्याची मुदत असल्याने ऐवढ्या कमी कालावधीत मजुरांच्या हाताला कामे जिल्हा प्रशासन कसे उपलब्ध करुन देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे कुठलेही नियोजन असल्याचे चित्र नाही. त्यामुळे शासनाच्या पॅकेजचा लाभ मजुरांना मिळण्याची शक्यता फार कमीच आहे.परिस्थिती पाहून अट शिथिल करण्याची गरजकोरोनामुळे निर्माण झालेली लॉकडाऊन आणि संचारबंदीची स्थिती लक्षात घेवून आणि मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना ५ लाख रुपयापर्यंतची अट रद्द करुन किमान २५ लाख रुपयापर्यंत कामे करण्याची परवानगी देण्याची गरज आहे. ही अट शिथिल केल्यास मजुरांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात रोजगार मिळतो शक्यतो. मात्र युध्द स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या