शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

१५ शाळांत सुमारे ४८२ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:16 IST

नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देनगर परिषद शाळांची घरघर : प्राथमिक शाळा आहेत आॅक्सीजनवर

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यावरून नगर परिषद शाळांतील विद्यार्थी पटसंख्येची घसरण कायम असल्याचे दिसते.आजघडीला शहरातील खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ झाल्या आहेत. यात निकाल म्हणा की, पटसंख्या दोन्ही बाबतीत पालिकेच्या शाळा माघारलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची वेळ येत असताना मात्र पालिकेच्या शाळांत आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याची पाळी आली आहे. एकतर पालिकेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा, त्यात निकालांत पालिकेची एकही शाळा १०० टक्के निकाल देत नसल्याने पालकांचाही कल आता खाजगी शाळांकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरणाऱ्या पालिकेच्या शाळा आता ओस पडत आहेत.या नवीन शैक्षणिक सत्रात पालिकेच्या प्राथमिक शाळांत (वर्ग १ ते ४) फक्त ४८२ विद्यार्थ्यांची सध्या नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. असे असतानाही या नाममात्र विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १५ शाळा सुरू आहेत. एका खाजगी शाळेत हजारांवर विद्यार्थी असताना पालिकेच्या १५ शाळांत ४८२ विद्यार्थी असणे ही आश्चर्याची व तेवढीच चिंतनाची बाब आहे. घटत चाललेल्या पटसंख्येमुळे मात्र पालिकेच्या या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या शाळांना पटसंख्या गळतीचा हा रोग जडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. आता हे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून ही पक्की संख्या नसून अद्याप प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढणार असे अपेक्षीत आहे. मात्र त्यानंतरही पालिकेच्या शाळांची स्थिती खाजगी शाळांच्या तुलनेत गंभीरच राहणार आहे.बहुतांश शाळांत पटसंख्येची घसरणनगर परिषदेच्या बहुतांश शाळांत पटसंस्खेची घसरण मागील कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी विद्यार्थी नगर परिषदेच्या शाळा सोडून निघत असल्याने नगर परिषेला शाळा बंद करण्याची पाळी आली आहे. ही गंभीर व तेवढीच गांभीर्याने विचार करण्याजोगी बाब आहे. मात्र एवढ्यावरही नगर परिषद प्रशासन शाळांना घेऊन काही गंभीर झालेले दिसत नाही. हेच कारण आहे की, नगर परिषद शाळांना लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण काही सुटलेले नाही. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा