शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

१५ शाळांत सुमारे ४८२ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:16 IST

नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देनगर परिषद शाळांची घरघर : प्राथमिक शाळा आहेत आॅक्सीजनवर

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :नगर परिषदेच्या शाळांमागे लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण यंदाही काही सुटल्याचे दिसून येत नाही. कारण मागील वर्षी शाळांच्या सुरूवातीला प्राथमिक शाळांत असलेली ५३४ विद्यार्थी संख्या यंदा सुमारे ४८२ वर असल्याची आकडेवारी पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. यावरून नगर परिषद शाळांतील विद्यार्थी पटसंख्येची घसरण कायम असल्याचे दिसते.आजघडीला शहरातील खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ झाल्या आहेत. यात निकाल म्हणा की, पटसंख्या दोन्ही बाबतीत पालिकेच्या शाळा माघारलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची वेळ येत असताना मात्र पालिकेच्या शाळांत आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याची पाळी आली आहे. एकतर पालिकेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा, त्यात निकालांत पालिकेची एकही शाळा १०० टक्के निकाल देत नसल्याने पालकांचाही कल आता खाजगी शाळांकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरणाऱ्या पालिकेच्या शाळा आता ओस पडत आहेत.या नवीन शैक्षणिक सत्रात पालिकेच्या प्राथमिक शाळांत (वर्ग १ ते ४) फक्त ४८२ विद्यार्थ्यांची सध्या नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. असे असतानाही या नाममात्र विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १५ शाळा सुरू आहेत. एका खाजगी शाळेत हजारांवर विद्यार्थी असताना पालिकेच्या १५ शाळांत ४८२ विद्यार्थी असणे ही आश्चर्याची व तेवढीच चिंतनाची बाब आहे. घटत चाललेल्या पटसंख्येमुळे मात्र पालिकेच्या या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या शाळांना पटसंख्या गळतीचा हा रोग जडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. आता हे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून ही पक्की संख्या नसून अद्याप प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढणार असे अपेक्षीत आहे. मात्र त्यानंतरही पालिकेच्या शाळांची स्थिती खाजगी शाळांच्या तुलनेत गंभीरच राहणार आहे.बहुतांश शाळांत पटसंख्येची घसरणनगर परिषदेच्या बहुतांश शाळांत पटसंस्खेची घसरण मागील कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी विद्यार्थी नगर परिषदेच्या शाळा सोडून निघत असल्याने नगर परिषेला शाळा बंद करण्याची पाळी आली आहे. ही गंभीर व तेवढीच गांभीर्याने विचार करण्याजोगी बाब आहे. मात्र एवढ्यावरही नगर परिषद प्रशासन शाळांना घेऊन काही गंभीर झालेले दिसत नाही. हेच कारण आहे की, नगर परिषद शाळांना लागलेले पटसंख्या घसरणचे ग्रहण काही सुटलेले नाही. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा