शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

प्रतिकूल परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता असावी

By admin | Updated: March 8, 2015 01:16 IST

स्वप्न बघावे तर ते साकारही करावे, कारण स्वप्नपूर्तीसाठी अनेक प्रतिस्पर्धी सज्ज आहेत. त्यात आपला घात होण्याची शक्यता असते.

कालीमाटी : स्वप्न बघावे तर ते साकारही करावे, कारण स्वप्नपूर्तीसाठी अनेक प्रतिस्पर्धी सज्ज आहेत. त्यात आपला घात होण्याची शक्यता असते. म्हणून प्रतिकूल परस्थितीत उत्तम निर्णय घेण्याची क्षमता असावी असे प्रतिपादन देवरीच उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी केले. येथील केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत लोकमत लघु जाहिरात विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ गाव, स्वच्छ शाळा या विषयावरील चित्रकला स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ््यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार ए.के.कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून लघु जाहिरात विभागाचे जिल्हा प्रतिनिधी राजीव फुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश गेलानी, मुख्याध्यापक डी.टी.लाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष टेकचंद बोपचे, मंडळ अधिकारी डी.एम.मेश्राम, तलाठी आर.एच.मेश्राम, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी दहिवले, युवराज पटले, पुरूषोत्तम टेंभरे, दैवल मेंढे, पुष्पा खोब्रागडे, पुष्पा बहेकार, शामकला शेंडे, सुनिता पारधी उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी, मेहनत, जिद्द, दिशा, पूर्ण नियोजन व व्यापक दृष्टीकोन या गुणांचा अंगीकार करून यशाचे शिखर गाठणे सोयीस्कर होते. तसेच आई-वडील आपल्या गरजा दूर सारून आपल्या पाल्यांच्या गरजा पूर्ण करतात. म्हणून त्यांनी पाहिलेले चांगल्या भविष्याचे स्वप्न पूर्ण करताना आपण बेईमानी करू नये असे मत मांडले. कदम यांनी, विद्यार्थ्याला संस्काराच्या चौकटीत राहून बिनधास्त जीवन जगण्याचा सल्ला दिला. तर स्वच:ला कधीही कमी लेखू नये, कारण प्रत्येकात आगळावेगळा गुण लपून असते. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी शाळेपलीकडील ज्ञान आवश्यक असते असे सांगीतले. दरम्यान, चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटात प्रथम पवन जैपाल गिऱ्हेपुंजे, द्वितीय तृप्ती भिकराज चव्हाण, तृतीय सोहम झिंकटराव रहांगडाले तर प्राथमिक गटात प्रथम दामिनी भोजराज गिऱ्हेपुंजे, द्वितीय कोमल राजेश उके तर तृतीय क्रमांक सुनंगा गोपाल उके यांनी पटकाविला. तसेच प्रोत्साहन पुरस्कार दिक्षा फुंडे, योगेश्वरी कुकडीबुरे, प्राची फुंडे, मोहिनी कापसे, स्नेहा शेंडे, सागर बिसेन, प्राण वासनीक, जितेंद्र साठवणे, आचल भांडारकर, संगीता फुंडे, धारा रहांगडाले, साक्षी अशोक खोब्रागडे, रोहीत गिऱ्हेपुंजे, भागवत चौधरी यांनी पटकाविला असून त्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. प्रास्तावीक येळे मांडले. संचालन बी.पी. चव्हाण यांनी केले. आभार वाय.आर. पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.आर.चौधरी, बी.के. मेंढे, जे.व्ही.बुद्धेवार, एम.जी. कांबळे, जी.डी. भाकरे, सी.डी. तुरकर, एस.यु. पोचलवार, छाया तरोणे, ग्राम सचिव ओ.जी. बिसेन, रोशन बोहरे, संजय दोनेडे व आकृती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)