शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

आरती बचत गटाने दिला लताच्या जीवनाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:35 IST

पतीच्या तुटपुंज्या कमाईतून कसेतरी कुटुंब चालत होते. लघुउद्योग करण्यासाठी जवळ पैसा नव्हता.

ठळक मुद्देशेळीपालनातून उन्नती : पतीलाही लावून दिला सुतार उद्योगआम्ही स्वयंसिद्धा-५

आॅनलाईन लोकमतगोंदिया : पतीच्या तुटपुंज्या कमाईतून कसेतरी कुटुंब चालत होते. लघुउद्योग करण्यासाठी जवळ पैसा नव्हता. अत्यंत हलाखीच्या जीवनात तिरोडा तालुक्याच्या जमुनिया येथील लता मेश्राम यांनी सहयोगीनींच्या सहकार्याने आरती स्वयंसहायता महिला बचत गट तयार केला. गटातून कर्ज घेवून शेळीपालनाच्या व्यवसायातून त्यांनी कुटुंबाच्या मिळकतीत हातभार लावलाच, शिवाय पतीलाही सुतार कामाचे उद्योग थाटून दिल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणली.३८ वर्षीय लता मेश्राम यांच्या कुटुंबात १२ वर्षाचा मुलगा, १० वर्षाची मुलगी, पती व त्या स्वत: अशा चार जणांचा परिवार. आठवड्यातून चार ते पाच दिवस पती मजुरीने फर्निचरचे काम करीत. १५० ते २०० रूपये त्यांना रोजी मिळत होती. मात्र काम नसले तर घरीच रहावे लागत होते. अशा परिस्थितीत पतीपत्नी दोघांना काय करावे व काय नाही, कळत नव्हते. लघुउद्योगासाठी पैसा नव्हता. कुणी कर्ज देत नव्हते. कसे तरी संसार चालत होते.दरम्यान गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बचत गटाची स्थापना करण्यात आली. लता यांनी सचिव म्हणून काम सांभाळले. गटाला सहा महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर आयसीआयसीआयकडून ४० हजार रूपयांचे गटाला कर्ज मिळाले. त्यापैकी लता यांनी चार हजार ५०० रूपये कर्ज घेतले व त्या पैशाने एक शेळी विकत घेतली. त्यांनी १२ महिन्यांच्या आत सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली. परंतु दुर्दैवाने घरी आजारपण आल्याने व पैशाच्या अडचणीमुळे ती शेळी व दोन पिल्लू सहा हजार ५०० रूपयांत विकावे लागले.पुन्हा दुसºयांदा मे २०१६ मध्ये आयसीआयसीआयकडून एक लाख ३२ हजार रूपयांचे कर्ज गटाला मिळाले. त्यातून २५ हजार रूपयांचे कर्ज लता यांनी घेतले. त्यातून तीन शेळा व एक बोकड खरेदी केले. आधी त्या दुसऱ्यांच्या घरी कामाला जात होते. पर आता त्यांनी ते बंद करून स्वत:च्या शेळ्यांना चारायला नेणे व त्यांच्या देखभालीकडे लक्ष देणे सुरू केले. शेळ्यांची वेळोवेळी देखरेख व मार्गदर्शनासाठी पशुसखी येत होत्या. आता त्यांच्याकडे ९ शेळ्या आहेत. अडचणीच्या वेळी त्यातील एक-दोन विकून त्या आपली गरज भागवून घेतात.गावात संजिवनी ग्रामसंस्था असून आता लता त्या संस्थेच्या कोषाध्यक्ष आहेत. ही ग्रामसंस्था म्हणजे महिलांची एक मिनी बॅँकच आहे. या संस्थेला तीन लाखांचा निधी मिळाला. त्यातील ६० हजार रूपयांचा कर्ज आरती बचत गटाने घेतला. त्यातून लता यांनी ३० हजार रूपयांचे कर्ज घेवून आपल्या पतीसाठी छोटेखानी सुतार कामाचा उद्योग सुरू करून दिला. आता त्यांचा कुटुंब आनंदात असून हे सर्व महिला बचत गटाने दिलेल्या आधारामुळे व माविमच्या सहकार्यामुळे घडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.अशी झाली गटाची स्थापनाएप्रिल २०१४ मध्ये लता मेश्राम यांच्या गावात (जमुनिया) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माविमने बचत गट स्थापनेची मोहीम सुरू केली. तेथील सहयोगीनी त्यांच्या घरी गटस्थापनेसाठी गृहभेटीकरिता आल्या. तेव्हा लता यांनी संकोच न करता आपल्या आर्थिक परिस्थितीची त्यांना माहिती दिली. तेव्हा सहयोगीनीने त्यांना बचत गटाचे महत्व पटवून दिले. यावर लता यांनी मोहल्ल्यातील १२ महिलांना जमा केले. नंतर सहयोगीनीस घरी बोलावून १२ महिलांसह बैठक झाली. बचत गटाची माहिती देवून २ जुलै २०१४ रोजी आरती स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना झाली. सर्वांच्या सहमतीने लता यांना गटाच्या सचिव म्हणून निवडण्यात आले. त्यावेळी त्यांना गटाविषयी काहीही समजत नव्हते. मात्र सहयोगीनींने वारंवार प्रशिक्षण दिल्यामुळे गटाचे व्यवहार व रेकार्ड कसे भरावे, ते समजू लागले.