शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

अदानी वीज प्रकल्पातील कामगाराचा मृत्यू, कारण अस्पष्ट; गावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 18:15 IST

हरिणखेडे यांच्या मृत्यूची बातमी कळताच प्रकल्पात कार्यरत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार उद्भवू नये म्हणून प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त

गोंदिया : तिरोडा जवळील अदानी वीज प्रकल्पात कार्यरत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळी घडली. अशोक जीवन हरिणखेडे (४६, रा. चिखली) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेने प्रकल्प व मृताच्या गावात वातावरण चांगलेच तापले असून गावात तणावसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अदानी वीज प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कामगारांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

गुरुवारी अशोक हरिणखेडे हे सामान्य पाळीत वीज प्रकल्पात कामावर होते. भोजन करण्याच्या कालावधीत त्यांनी जेवण घेतले. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांच्या सहकारी कामगारांनी वीज प्रकल्पात कार्यरत डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून अशोक हरिणखेडे यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच प्रकल्पात कार्यरत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार उद्भवू नये म्हणून प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

शुक्रवारी (दि. २८) जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, मृतदेह गावात पोहोचताच जोपर्यंत मृताच्या कुटुंबाला अदानी वीज व्यवस्थापन २० लाखांची आर्थिक मदत देत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतल्याने गावात तणाव निर्माण झाला. अदानी वीज प्रकल्पाचे कोणतेही जबाबदार अधिकारी चिखली गावात पोहोचले नव्हते. घटनेचे गांभीर्य पाहून गावातही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुलींचे पितृछत्र हरपले

अशोक हरिणखेडे हे कुटुंबात एकमेव कमावते व्यक्ती होते. ते अदानी वीज प्रकल्पाच्या अक्वा कंपनीत गत ८ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अपर्णा (४३), मुलगी रूपाली (१५) व त्रिवेणी (१३) असा परिवार आहे. रूपाली व त्रिवेणीचे पितृछत्र हरविल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू