शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

अदानी वीज प्रकल्पातील कामगाराचा मृत्यू, कारण अस्पष्ट; गावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 18:15 IST

हरिणखेडे यांच्या मृत्यूची बातमी कळताच प्रकल्पात कार्यरत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार उद्भवू नये म्हणून प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

ठळक मुद्देपोलिसांचा चोख बंदोबस्त

गोंदिया : तिरोडा जवळील अदानी वीज प्रकल्पात कार्यरत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळी घडली. अशोक जीवन हरिणखेडे (४६, रा. चिखली) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेने प्रकल्प व मृताच्या गावात वातावरण चांगलेच तापले असून गावात तणावसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अदानी वीज प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कामगारांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

गुरुवारी अशोक हरिणखेडे हे सामान्य पाळीत वीज प्रकल्पात कामावर होते. भोजन करण्याच्या कालावधीत त्यांनी जेवण घेतले. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांच्या सहकारी कामगारांनी वीज प्रकल्पात कार्यरत डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून अशोक हरिणखेडे यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच प्रकल्पात कार्यरत कामगारांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कोणताही अनुचित प्रकार उद्भवू नये म्हणून प्रकल्पस्थळी व चिखली गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

शुक्रवारी (दि. २८) जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मात्र, मृतदेह गावात पोहोचताच जोपर्यंत मृताच्या कुटुंबाला अदानी वीज व्यवस्थापन २० लाखांची आर्थिक मदत देत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा कुटुंबीय व ग्रामस्थांनी घेतल्याने गावात तणाव निर्माण झाला. अदानी वीज प्रकल्पाचे कोणतेही जबाबदार अधिकारी चिखली गावात पोहोचले नव्हते. घटनेचे गांभीर्य पाहून गावातही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुलींचे पितृछत्र हरपले

अशोक हरिणखेडे हे कुटुंबात एकमेव कमावते व्यक्ती होते. ते अदानी वीज प्रकल्पाच्या अक्वा कंपनीत गत ८ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अपर्णा (४३), मुलगी रूपाली (१५) व त्रिवेणी (१३) असा परिवार आहे. रूपाली व त्रिवेणीचे पितृछत्र हरविल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू