शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

दगडातून देव साकारणारा समाज उपेक्षित; हातातली कला भूक भागवण्यास असक्षम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:20 IST

Gondia : शासन योजनेचा लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मनगटाच्या जोरावर हातोडा अन् छन्नीच्या मदतीने दगडावर घाव घालून देव साकारणारा पाथरवट समाज स्वतंत्र भारतातही उपेक्षित जीवन जगत आहे. या समाजातील बहुतांश कारागीर हे नाममात्र साक्षर आहेत. मात्र, कोणत्याही विद्यापीठाची पदवी त्यांच्याकडे नाही. व्यावहारिकदृष्ट्या ते कोणत्याही नोकरीसाठी पात्र नसले तरी त्यांच्या हातात अंगभूत कौशल्य मात्र आहे. दगडाला आकार देऊन देव साकारण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यांनी साकारलेल्या देवाची घरोघरी पूजा केली जाते. मात्र, तो देव साकारणाऱ्या हातांची मात्र उपेक्षा सुरू आहे. या कारागिरांच्या मूर्ती मूर्तिमंत कलेचा नमुना आहे. रानावनात धरणीमायच्या विशाल उदरात दडून बसलेल्या दगडाचा हे कारागीर शोध घेतात. आपल्या कलेद्वारे या दगडाचा देव करतात.

या कलाकारांच्या घामातूनच या देवांना पहिला अभिषेक घडतो. या कारागिरांनीच साकारलेले देव श्रीमंत मंदिरांमध्ये विराजमान आहेत. मात्र दगडाला देवपण देणाऱ्या या समाजाची दैना सुरू आहे. पवनसूत मारुतीरायासह नंदी, पिंड, शंकर यासह नानाविध मूर्ती हे कारागीर घडवितात. घराघरांतील स्वयंपाकघरात उपयोगी असलेली पारंपरिक जाते, पाटे, वरवंटे, खलबत्ता आदी वस्तूही हे कारागीर घडवतात. या वस्तूंच्या माध्यमातून नागरिकांच्या घरातील स्वयंपाक रुचकर बनतो. मात्र, या वस्तू घडविणाऱ्या कारागिरांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा जीवघेणा प्रवास पिढ्यान् पिढ्या असाच सुरू आहे. आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. अवघे जग माणसाच्या मुठीत सामावले आहे. परंतु या कारागिरांच्या कलेला अजूनही पर्याय नाही. तरीही त्यांच्या कलेची मात्र किंमत केली जात नाही. आज या समाजाचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर राबराब राबून रक्त आटविणारे हे कारागीर इतरांच्या बंगल्याचा पाया मजबूत करतात. मात्र त्यांना स्वतःला राहण्यासाठी निवारा नाही. शासनाने या कष्टकरी उपेक्षित समाजाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्थैर्याची गरज मूर्ती घडविणारे हे कारागीर सतत भटकंती करीत असतात. रोजगारासाठी गावोगावी भटकण्याविना त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे त्यांची पुढची पिढीही शिक्षणापासून वंचित राहत आहे. या समाजाला स्थैर्य आवश्यक आहे. शासनासह सामाजिक जाणिवेच्या नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया