शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 10:10 PM

नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.

ठळक मुद्देएक वर्षाच्या आतील ६९३ बालके : बालमृत्यू थांबता थांबेना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षलग्रस्त व आदिवासी गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूला नियंत्रणात आणण्यात गोंदिया जिल्ह्याचा आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मागील दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ७५५ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील ६९३ बालके ही वर्षभराच्या आतच मृत्यू पावली आहेत.शासन मातामृत्यू व बालमृत्यूची संख्या शुन्यावर आणण्यासाठी विविध योजना अमंलात आणत आहे. परंतु या योजनांच्या अमंलबजावणीत कुचराही होत असल्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे तांडव सुरूच आहे. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील जनता आरोग्यासंदर्भात अत्यंत उदासिन आहे. गर्भवती किंवा बाळंतीन यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा बालमृत्यूचा आकड्यात दरवर्षी वाढ होत आहे.मागील दोन वर्षातील बालमृत्यूचा आढावा घेतला असता सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ०-१ वर्षातील ३९५ बालके तर १ ते ५ वर्षातील १९ अशा ४१४ बालकांचा मृत्यू झाला आहे. सन २०१८-१९ या वर्षातील बालमृत्यूची आकडेवारी कमी झाली आहे. वर्षात ०-१ वर्षातील २९८ बालके तर १ ते ५ वर्षातील ४३ अश्या ३४१ बालकांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन वर्षात ७५५ बालकांचा मृत्यू झाला आहे. उपकेंद्रापासून जिल्हा रूग्णालयापर्यंत रूग्णांच्या सेवेसाठी यंत्रणा जरी असली तरी याच यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. महिला गर्भवती झाल्यापासून तिच्या प्रसूती होऊन पाच वर्षापार्यंत बाळाची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाबरोबर इतरही यंत्रणा असल्या तरी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होणे ही बाब गंभीर आहे. बालमृत्यूची आकडेवारी फुगने ही बाब आरोग्य विभागासाठी मंथन करायला लावणारी आहे.गर्भवतींकडे व नवजात बालकांच्या संगोपणाकडे होणारे दुर्लक्ष हे बालमृत्यूचे आकडे फुगवत आहेत.उमलण्यापूर्वीच १५७ कळ्या कोमेजल्यामहिलांची गर्भावस्थेत कुटुंबातील लोक पाहिजे तशी विशेष काळजी घेत नसल्यामुळे हे जग पाहण्याच्या पूर्वीच १५७ कोवळ्या कळ्या कोमेजल्या आहेत. सन २०१७-१८ या वर्षात १५१ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. तर सन २०१८-१९ या वर्षात १०६ बालके आईच्या गर्भातच किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावली. अत्यल्प कमी वजनाची जन्माला आलेली बालके कुपोषणामुळे मृत्यूच्या दाढेत जात आहेत. परंतु महिला व बालकल्याण विभाग या मृत्यूला कुपोषणाने मृत्यू झाल्याचे दाखवित नाहीत.गर्भातच वाढतेय कुपोषणगर्भवती महिलांना गर्भावस्थेत संतुलीत आहार देणे आवश्यक असतांना महिलांच्या दररोजच्या जेवणातून वरण हद्दपार झाला असतो. कडी, आळण किंवा वांग्याची भाजी यावरच त्यांचे दररोजचे जेवण असल्यामुळे बाळाला पोषण मिळत नाही. त्यातच गर्भावस्थेतही ग्रामीण भागात राहणारी महिला खूप कष्ट करते आणि पोटाला संतुलीत आहारही मिळत नाही. त्यामुळे पोटातच तिच्या बाळाची वाढ होत नाही. वाढ झाली तरी ती अत्यल्प प्रमाणात असते.असंतुलीत आहारामुळे कमी वजनाची बालके जन्माला येतात. त्यामुळे कमी वजनाच्या बालकांचा पोटातच किंवा जन्म घेतांना मृत्यू होतो. असंतुलीत आहारामुळे गर्भाची वाढ होत नाही त्यात व्यंगता येते परिणामी अर्भक मृत्यूदर वाढतो.