शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

जिल्ह्यातील ६४५ मामा तलाव मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:39 IST

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता तत्कालीन गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची देखभाल दुरूस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. असा अहवाल महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.

ठळक मुद्दे५६३ मामा तलावांना संजीवनी : ३९७ तलावांच्या दुरूस्तीसाठी २७ रुपयांची कोटी गरज

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता तत्कालीन गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची देखभाल दुरूस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. असा अहवाल महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.या मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी तीन वर्षात जिल्ह्यातील ११८८ मामा तलावांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यापैकी ५६३ तलावांच्या पुनरूज्जीवनाचे काम केले. परंतु ६४५ मामा तलाव आजही मृतावस्थेत आहेत.सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात ५६२ तलावांचे काम हाती घेण्यात आले. त्यातील ५४२ तलावांचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ६ हजार १७२ हेक्टर शेतीचे सिंचन होत असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यातील १४२१ मामा तलावांपैकी ११८८ मामा तलाव नादुरूस्त असल्यामुळे या तलावांची सर्वकष दुरूस्ती करण्यासाठी तीन वर्षात विशेष दुरूस्ती करण्याचा उपक्रम शासनाने सुरू केला. यासाठी सन २०१६-१७ या वर्षात ४१७ तलाव निवडण्यात आले. सन २०१७-१८ या वर्षात १४५ तलाव निवडण्यात आले. परंतु ५६३ मामा तलावांचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रीक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्या सर्व मामा तलावांचे काम करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले. यापैकी ५५२ तलावांचे काम सुरू करण्यात आले असून ५४२ तलावांची कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी २८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. यातून ६ हजार १७२ हेक्टर शेतीला सिंचन होईल एवढा पाणीसाठी त्या तलावांमध्ये जमा झाला असल्याचे लघु पाटबंधारे विभाग सांगत आहे.१९६० नंतर शासनाने ताब्यात घेतलेल्या या मामा तलावांची झालेली दुरवस्था आता सुधारण्यासाठी शासनाने पुनरूज्जीवन कार्यक्रम सुरू केला आहे. सन २०१८-१९ या वर्षात ३९७ तलाव निवडण्यात आले. यासाठी २७ कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगण्यात येते.जिल्ह्यातील मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने २६ कोटी रूपये जिल्ह्याला दिले आहेत. या पुनरूज्जीवीत झालेल्या तलावामुळे शेती सिंचीत होईल.त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.११८८ तलावांच्या दुरूस्तीचे उद्दिष्टजिल्ह्यातील ११८८ माल गुजारी तालवांची दुरूस्ती झाल्यास हजारो हेक्टर शेत जमिनीला सिंचनाची सुविधा होईल. यामुळे मत्स्य पालनाला वाव मिळेल, पीक क्षेत्र वाढणार आहे. दुरूस्तीपूर्वी ६३७५ हेक्टर क्षेत्रात पीक घेतले जात होते. आता हजारो हेक्टर पीकक्षेत्र वाढले आहे. मत्स्यव्यवसायात रोजगार उपलब्ध होऊन दरडोई उत्पन्न वाढेल. लोकसहभाग वाढेल, परिणामी तलावांना जलवैभव प्राप्त होईल. तलावांसाठी निस्तार हक्क धारक पाणी वापर संस्था स्थापन होतील.भग्नावस्थेत असलेल्या मामा तलावात पाण्याचा ठणठणाट होता. परंतु शासनाने मामा तलावांचे पुनरूज्जीवन कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे तलावांची सर्वकष दुरूस्ती झाली.त्यामुळे सिंचन क्षमता वाढेल व त्यांच्या उत्पन्नात निश्चीतच वाढ होईल.- संजय विश्वकर्माकार्यकारी अभियंता ल.पा.विभाग जि.प.गोंदिया.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई