शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

जिल्ह्यातील ६४५ मामा तलाव मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:39 IST

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता तत्कालीन गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची देखभाल दुरूस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. असा अहवाल महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.

ठळक मुद्दे५६३ मामा तलावांना संजीवनी : ३९७ तलावांच्या दुरूस्तीसाठी २७ रुपयांची कोटी गरज

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता तत्कालीन गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची देखभाल दुरूस्ती अभावी दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. असा अहवाल महाराष्ट्र शासनाला देण्यात आला.या मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी तीन वर्षात जिल्ह्यातील ११८८ मामा तलावांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यापैकी ५६३ तलावांच्या पुनरूज्जीवनाचे काम केले. परंतु ६४५ मामा तलाव आजही मृतावस्थेत आहेत.सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात ५६२ तलावांचे काम हाती घेण्यात आले. त्यातील ५४२ तलावांचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ६ हजार १७२ हेक्टर शेतीचे सिंचन होत असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यातील १४२१ मामा तलावांपैकी ११८८ मामा तलाव नादुरूस्त असल्यामुळे या तलावांची सर्वकष दुरूस्ती करण्यासाठी तीन वर्षात विशेष दुरूस्ती करण्याचा उपक्रम शासनाने सुरू केला. यासाठी सन २०१६-१७ या वर्षात ४१७ तलाव निवडण्यात आले. सन २०१७-१८ या वर्षात १४५ तलाव निवडण्यात आले. परंतु ५६३ मामा तलावांचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रीक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्या सर्व मामा तलावांचे काम करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले. यापैकी ५५२ तलावांचे काम सुरू करण्यात आले असून ५४२ तलावांची कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी २८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. यातून ६ हजार १७२ हेक्टर शेतीला सिंचन होईल एवढा पाणीसाठी त्या तलावांमध्ये जमा झाला असल्याचे लघु पाटबंधारे विभाग सांगत आहे.१९६० नंतर शासनाने ताब्यात घेतलेल्या या मामा तलावांची झालेली दुरवस्था आता सुधारण्यासाठी शासनाने पुनरूज्जीवन कार्यक्रम सुरू केला आहे. सन २०१८-१९ या वर्षात ३९७ तलाव निवडण्यात आले. यासाठी २७ कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगण्यात येते.जिल्ह्यातील मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने २६ कोटी रूपये जिल्ह्याला दिले आहेत. या पुनरूज्जीवीत झालेल्या तलावामुळे शेती सिंचीत होईल.त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल.११८८ तलावांच्या दुरूस्तीचे उद्दिष्टजिल्ह्यातील ११८८ माल गुजारी तालवांची दुरूस्ती झाल्यास हजारो हेक्टर शेत जमिनीला सिंचनाची सुविधा होईल. यामुळे मत्स्य पालनाला वाव मिळेल, पीक क्षेत्र वाढणार आहे. दुरूस्तीपूर्वी ६३७५ हेक्टर क्षेत्रात पीक घेतले जात होते. आता हजारो हेक्टर पीकक्षेत्र वाढले आहे. मत्स्यव्यवसायात रोजगार उपलब्ध होऊन दरडोई उत्पन्न वाढेल. लोकसहभाग वाढेल, परिणामी तलावांना जलवैभव प्राप्त होईल. तलावांसाठी निस्तार हक्क धारक पाणी वापर संस्था स्थापन होतील.भग्नावस्थेत असलेल्या मामा तलावात पाण्याचा ठणठणाट होता. परंतु शासनाने मामा तलावांचे पुनरूज्जीवन कार्यक्रम हाती घेतला. त्यामुळे तलावांची सर्वकष दुरूस्ती झाली.त्यामुळे सिंचन क्षमता वाढेल व त्यांच्या उत्पन्नात निश्चीतच वाढ होईल.- संजय विश्वकर्माकार्यकारी अभियंता ल.पा.विभाग जि.प.गोंदिया.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई