शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

वाळू घ्यायची 600 रुपये ब्रासने अन् विकायची सहा हजाराने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

कोरोना काळात तर १० हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळूची विक्री करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूूण २३ वाळू घाट असून, पर्यावरण मंत्रालयाने लिलावासाठी परवानगी न दिल्याने दोन वर्षे रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे वाळू तस्करांना मोकळे रान मिळाले होते. वाळू तस्कारांनी वाळू घाट अक्षरश: पोखरून टाकले. यामुळे जिल्हा प्रशासनाचा जवळपास २५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर वाळू तस्कर गब्बर झाले. यात काही राजकारण्यांचासुद्धा सहभाग आहे. 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाळू घाटाचे लिलाव करून वाळूचे प्रति ब्रास दर शासनाकडून ठरवून दिले जातात. मात्र, ठरवून दिलेल्या दराने संबंधित वाळू घाटाचे कंत्राटदार विक्रीच करीत नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे. वाळू घाटाचा लिलाव करताना ६०० प्रती ब्रासने त्याचा लिलाव केला जातो; मात्र संबंधित ठेकेदार त्याची दहापट अधिक दराने विक्री करतात. कोरोना काळात तर १० हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळूची विक्री करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूूण २३ वाळू घाट असून, पर्यावरण मंत्रालयाने लिलावासाठी परवानगी न दिल्याने दोन वर्षे रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे वाळू तस्करांना मोकळे रान मिळाले होते. वाळू तस्कारांनी वाळू घाट अक्षरश: पोखरून टाकले. यामुळे जिल्हा प्रशासनाचा जवळपास २५ कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर वाळू तस्कर गब्बर झाले. यात काही राजकारण्यांचासुद्धा सहभाग आहे. वाळू तस्करीच्या भरवशावर त्यांनी जिल्ह्यात आपले साम्राज्य निर्माण केले आहे. वाळू तस्करांच्या मनमानी धोरणाचा सर्वाधिक फटका घरकुल लाभार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसला. गरजेपोटी त्यांना ८ ते १० हजार रुपये एक ट्रॅक्टर वाळू घ्यावी लागली. 

२० वाळू घाटांचा लिलाव- पर्यावरण मंडळाने जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला तब्बल दोन वर्षांनंतर परवानगी दिली. त्यामुळे या वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला १७ कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.

०३  वाळू घाटांचा  लिलाव बाकी- जिल्ह्यात एकूण २३ वाळू घाट असून, यापैकी २० वाळू घाटांच्या लिलावाला पर्यावरण मंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या २० घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे, तर तीन वाळू घाटांच्या लिलावाला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या घाटांचा लिलाव उशिरा होणार आहे. 

२० टक्के अनामत रक्कम करावी लागते जमा

वाळू घाटांच्या लिलावासाठी बोली लावून ते खरेदी केल्यानंतर त्या वाळू घाटाच्या एकूण रकमेच्या २० टक्के रक्कम ही संबंधित कंत्राटदाराला शासनाकडे अनामत म्हणून जमा करावी लागत आहे.  

वाळू कंत्राटदारांची भरमसाट कमाई मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पर्यावरण मंडळाने वाळू घाटांच्या लिलावासाठी हिरवी झेंडी न दिल्याने वाळू तस्कारांनी चांगली कमाई केली, तर शासनाने किती ब्रास दराने वाळूची विक्री करावी हे ठरवून दिले आहे. मात्र, कोणताच कंत्राटदार ठरवून दिलेल्या दराने वाळूची विक्री करीत नसून मनमर्जीनुसार दर आकारून भरमसाट कमी कमाई करीत आहे. 

लिलाव न होता उपसा जोरात वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरी वाळू तस्करांनी जिल्ह्यातील रेतीघाट पोखरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करणे सुरूच ठेवले आहे. 

भाव कधी बदलेल याचा नेम नाही 

कोरोना काळात आणि त्यानंतर वाळू दर आकाशाला भिडले होते. वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरी वाळू तस्कर चोरटी वाहतूक करून आपल्या मनमर्जीनुसार कधी सहा, तर कधी १० हजार, तर कधी १५ हजार रुपये प्रती ट्रॅक्टर दर आकारून वाळूची विक्री करीत होते. बांधकाम करणाऱ्यांची झालेली कोंडी लक्षात घेऊन अधिक दराने वाळूची विक्री करतात. 

 

टॅग्स :sandवाळू