शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिंचन प्रकल्पात ५६.८९ टक्के पाणीसाठा; रब्बीसाठी दिले जातेय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:14 IST

Gondia : गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरी ११४ टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होता. सिंचनानंतर, खरीप पिकांचा साठा ७३.४० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. रब्बी पिकांच्या सिंचनासाठी विविध प्रकल्पांमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सध्या स्थितीत सिंचन प्रकल्पात ५६.८९ टक्के जलसाठा आहे.

तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये यावर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला. जून ते सप्टेंबर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात ११ टक्क्यांनी जलसाठ्याची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या मध्यम, लघु आणि मामा तलावांपैकी ९८ तलाव भरले आहेत. या प्रकल्पांमधून खरीप आणि रब्बी पिकांना सिंचन दिल्यानंतर, तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांमध्ये सध्याची स्थिती ५६.८९ टक्के आहे. गेल्या वर्षी याच तारखेला या प्रकल्पांमध्ये फक्त ५४.३५ टक्के पाणीसाठा होता. 

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठाप्रकल्प            टक्केवारीबोदलकसा      ७९.२४ टक्केचोरखमारा       ८१.२४ टक्केचुलबंद            ५१.९५ टक्केखैरबंधा           ३८.२१ टक्केमानागड          ७४.३८ टक्केरेंगेपार            ५७.९८ टक्केसंग्रामपूर         ५५.२० टक्केकटंगी             ५१.६० टक्के

रब्बी पिकांना सिंचनसध्या ५५.५३ टक्के साठा हा २३ लहान प्रकल्पांमध्ये आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ते ५१.१० टक्के पाण्याचा साठा होता. ३८ मामा तलावांचा विचार करता या तलावांमध्ये ३९.५५ टक्के पाणीसाठा आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या वरील तीन प्रकारच्या ७० प्रकल्पांमध्ये एकूण साठवण क्षमता ११७.९३३ दशलक्ष घनमीटर आहे. त्याची टक्केवारी ५६.८९ आहे. या प्रकल्पांद्वारे रब्बी पिकांना सिंचन केले जात आहे. 

गेल्या वर्षी तालुकानिहाय पडलेला पाऊसतालुका            पडलेला पाऊसगोंदिया               १०८.६ मिमीआमगाव             ८५.८० मिमीतिरोडा               ९५.८० मिमीगोरेगाव               १३०.७ मिमीसालेकसा            १०८.१ मिमीदेवरी                  १२५.९ मिमीअर्जुनी मोरगाव     १२०.८ मिमीसडक अर्जुनी       १०१.८ मिमीएकूण                  ११४.३ मिमी

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater transportजलवाहतूक