शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

55 हजार शेतकऱ्यांचे 328 कोटी रुपयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रावरून १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची विक्री केली. विक्री केलेल्या धानाची एकूण किमत ६७० कोटी ६० लाख ९१ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत ३४१ कोटी ६२ लाख ७७ हजार ५८४ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, तर ३२८ कोटी ९९ लाख रुपयांचे चुकारे थकीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील धानाची विक्री करणाऱ्या ५५ हजार शेतकऱ्यांचे ३२८ कोटी रुपयांचे धानाचे चुकारे मागील दोन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रावरून १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची विक्री केली. विक्री केलेल्या धानाची एकूण किमत ६७० कोटी ६० लाख ९१ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत ३४१ कोटी ६२ लाख ७७ हजार ५८४ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, तर ३२८ कोटी ९९ लाख रुपयांचे चुकारे थकीत आहे. चुकाऱ्यांसाठी शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. धानाची विक्री करून शेतकरी उधार उसणवारी व कर्जाची परतफेड करतात. मात्र चुकारे न मिळाल्याने त्यांना आपली गरज भागविण्यासाठी नातेवाईक आणि सावकारांपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक संकटामुळे आधीच शेतकरी त्रस्त असताना त्यांना कृत्रिम संकटांना सुध्दा तोंड द्यावे लागत आहे. 

१६ हजारांवर शेतकरी राहिले वंचित - शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अट शासनाने यावर्षीपासून लागू केली. ७ फेब्रुवारीपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार १९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी आतापर्यंत १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. मात्र धान विक्री करण्याची मुदत संपल्याने १६ हजारांवर शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची वेळ आली आहे.

१८ लाख क्विंटल धान उघड्यावर - जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप हंगामात ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. यापैकी आतापर्यंत राईस मिसर्लने १९ लाख क्विंटल धानाची उचल केली आहे तर उर्वरित १८ लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर तसाच उघड्यावर पडला आहे. त्यामुळे या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भरडाई व उचल संथगतीने - जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून तांदूळ शासनाकडे जमा केला जातो; पण शासनाने अद्यापही राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा काढला नसल्याने त्यांनी धानाची उचल करणे थांबविली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ ०.५५ टक्केच धानाची भरडाई झाली आहे तर उर्वरित धान तसाच केंद्रावर पडला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड