शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

55 हजार शेतकऱ्यांचे 328 कोटी रुपयांचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रावरून १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची विक्री केली. विक्री केलेल्या धानाची एकूण किमत ६७० कोटी ६० लाख ९१ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत ३४१ कोटी ६२ लाख ७७ हजार ५८४ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, तर ३२८ कोटी ९९ लाख रुपयांचे चुकारे थकीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामातील धानाची विक्री करणाऱ्या ५५ हजार शेतकऱ्यांचे ३२८ कोटी रुपयांचे धानाचे चुकारे मागील दोन महिन्यांपासून थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. मार्केटिंग फेडरेशनने यंदा १०७ धान खरेदी केंद्रावरून १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची विक्री केली. विक्री केलेल्या धानाची एकूण किमत ६७० कोटी ६० लाख ९१ हजार रुपये असून यापैकी आतापर्यंत ३४१ कोटी ६२ लाख ७७ हजार ५८४ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, तर ३२८ कोटी ९९ लाख रुपयांचे चुकारे थकीत आहे. चुकाऱ्यांसाठी शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. धानाची विक्री करून शेतकरी उधार उसणवारी व कर्जाची परतफेड करतात. मात्र चुकारे न मिळाल्याने त्यांना आपली गरज भागविण्यासाठी नातेवाईक आणि सावकारांपुढे हात पसरण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक संकटामुळे आधीच शेतकरी त्रस्त असताना त्यांना कृत्रिम संकटांना सुध्दा तोंड द्यावे लागत आहे. 

१६ हजारांवर शेतकरी राहिले वंचित - शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अट शासनाने यावर्षीपासून लागू केली. ७ फेब्रुवारीपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार १९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी आतापर्यंत १ लाख १७ हजार २६७ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. मात्र धान विक्री करण्याची मुदत संपल्याने १६ हजारांवर शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची वेळ आली आहे.

१८ लाख क्विंटल धान उघड्यावर - जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप हंगामात ३४ लाख ५६ हजार ७४८ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. यापैकी आतापर्यंत राईस मिसर्लने १९ लाख क्विंटल धानाची उचल केली आहे तर उर्वरित १८ लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर तसाच उघड्यावर पडला आहे. त्यामुळे या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भरडाई व उचल संथगतीने - जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून तांदूळ शासनाकडे जमा केला जातो; पण शासनाने अद्यापही राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा काढला नसल्याने त्यांनी धानाची उचल करणे थांबविली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ ०.५५ टक्केच धानाची भरडाई झाली आहे तर उर्वरित धान तसाच केंद्रावर पडला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड