शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

१२ पोलीस ठाण्यांतर्गत ४५ बालकांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:34 AM

बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देचार पोलीस ठाणे शांत : मिळालेल्या बालकांना करणार पालकांच्या स्वाधीन

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान अभियान राबविणे सुरू केले आहे. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत न मिळालेल्या ४५ बालकांचा शोध पोलीस घेणार आहेत. यात ६ मुले व ३९ मुली अशा एकूण ४५ बालकांच्या शोधासाठी ६ वे आॅपरेशन मुस्कान गोंदिया जिल्हा पोलीस राबवित आहेत.मुलांकडून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते.१८ वर्षाखालील बेपत्ता व अपहरणाचे प्रमाण पाहून राज्य शासन या बालकांना शोधून त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ही मोहीम राबवित आहे. या आॅपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक व सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाºया मुलांशी संपर्क केला जातो. त्या बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी राबविलेल्या पाच आॅपरेशनची फलश्रृती पाहता महाराष्टÑ शासनाने पुन्हा डिसेंबर महिनाभर ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.गोंदिया पोलीस दलाच्या अभिलेखावरील ४५ बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची चमू तयार झाली आहे.बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या ४५ बालकांत गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीतील १२ बालके, गोंदिया ग्रामीण ३, रावणवाडी ३, दवनीवाडा १, आमगाव ३, सालेकसा १, देवरी ४, अर्जुनी-मोरगाव ४, केशोरी १, तिरोडा ३, गोरेगाव ९, रामनगर १ अश्या ४५ बालकांपैकी ३९ मुली व ६ मुलांचा समावेश आहे.सामाजिक संघटना उदासीनया बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला सर्वांनी तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करणे, आई-वडील नसल्यास बाल कल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलीस करतात. समितीने त्या बालकांना बाल सुधारगृहात पाठविण्यास सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना नेऊन सोडून देतात. त्यानंतर त्या बालकांकडे दुर्लक्ष केले जाते. या बालकांचे शिक्षण व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु गोंदियातील कोणत्याही सामाजिक संघटना यापूर्वी पुढे आलेल्या नाहीत.त्यांचे जीवन फुलायला हवेबेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने आॅपरेशन मुस्कान प्रकल्पात पकडलेल्या अनेक बालकांचे जीवन आजही ‘जैसे थे’ आहे. आईवडील नसलेल्या बालकांना नागपूर येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात येते व त्यांची स्थिती या अभियानानंतरही जशीच्या तशीच राहते.आॅपरेशन मुस्कानमध्ये काम करणारे पोलीस कर्मचारी स्वत:च्या अपहरण झालेल्या पाल्यांचा शोध घेण्यासाठी जेवढी मेहनत घेतील तेवढीच मेहनत सामान्य, गरीबांच्या मुला-मुलींना शोधण्यासाठी घेतील अशी अपेक्षा आहे.हरिष बैजलपोलीस अधीक्षक गोंदिया.