शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

३८ हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचन अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:03 IST

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार करविलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देलघु पाटबंधारे खात्याचे प्रकल्प नादुरूस्त : सिंचनाअभावी शेतकरी अडचणीत

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार करविलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. मामा तलाव, लपा तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे व उपसा सिंचनांची दुरवस्था असल्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्रातील सिंचन अडले आहे.गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १ हजार ४२१ आहे. या तलावांमुळे २८ हजार ७३० हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील १ हजार १८८ तलाव नादुरूस्त असल्यामुळे फक्त १६ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत आहे. हे तलाव नादुरूस्त असल्यामुळे १२ हजार ३५५ हेक्टरचे सिंचन होऊ शकत नाही. लघु पाटबंधारे प्रकल्पांची संख्या १९० आहे. या प्रकल्पांमुळे १० हजार ८४२ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील १०४ प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त ३ हजार ७७९ हेक्टर सिंचन होत आहे. हे प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे ७ हजार ६३ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकत नाही.जिल्ह्यात २६ पाझर तलाव असून यापासून २३१ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ३ तलाव नादुरूस्त असल्यामुळे फक्त ८९ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून १४२ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ अडले आहे. जिल्हयात २९४ कोल्हापूरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमुळे १० हजार ७४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकते. मात्र ९३ बंधारे नादुरूस्त असल्यामुळे फक्त ३ हजार १५ हेक्टर सिंचन होत असून ७ हजार ५९ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकत नाही.तसेच १ हजार ४१५ साठवण बंधारे असून यापासून १२ हजार ८१६ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ६० बंधारे नादुरूस्त असल्यामुळे फक्त ६ हजार १३१ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ६ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचीत आहे. याशिवाय १२ उपसा सिंचन प्रकल्प आहेत. या उपसा सिंचन प्रकल्पांमुळे १ हजार १४ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ९ उपसा सिंचन प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त १४३ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ८७१ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकत नाही.जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत असलेल्या प्रकल्पांची संख्या ३ हजार ३५८ आहे. या प्रकल्पांची सिंचन क्षमता ६३ हजार ७०७ हेक्टर आहे. परंतु १ हजार ४५७ प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त २९ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्राचे सिंचन अडून पडले आहे. आता सिंचनाची सोयच नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.दुरूस्तीसाठी १०८ कोटींची गरजमामा तलाव, लपा तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे व उपसा सिंचन प्रकल्पांची दुरवस्था झाल्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्र सिंचीत होऊ शकत नाही. या सर्व प्रकल्पांच्या दुस्तीसाठी १०८ कोटी ४७ लाख रूपये लागणार आहेत. यात, मामा तलावांना ८१ कोटी ८६ लाख, लपा तलावांना १५ कोटी ३६ लाख, पाझर तलावांना १६ लाख, कोल्हापुरी बंधाऱ्यांना ६ कोटी ४१ लाख, साठवण बंधाºयांना २ कोटी ८३ लाख तर उपसा सिंचन प्रकल्पांना १ कोटी ८५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे.