शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

३८ हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचन अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:03 IST

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार करविलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देलघु पाटबंधारे खात्याचे प्रकल्प नादुरूस्त : सिंचनाअभावी शेतकरी अडचणीत

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार करविलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. मामा तलाव, लपा तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे व उपसा सिंचनांची दुरवस्था असल्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्रातील सिंचन अडले आहे.गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १ हजार ४२१ आहे. या तलावांमुळे २८ हजार ७३० हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील १ हजार १८८ तलाव नादुरूस्त असल्यामुळे फक्त १६ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत आहे. हे तलाव नादुरूस्त असल्यामुळे १२ हजार ३५५ हेक्टरचे सिंचन होऊ शकत नाही. लघु पाटबंधारे प्रकल्पांची संख्या १९० आहे. या प्रकल्पांमुळे १० हजार ८४२ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील १०४ प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त ३ हजार ७७९ हेक्टर सिंचन होत आहे. हे प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे ७ हजार ६३ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकत नाही.जिल्ह्यात २६ पाझर तलाव असून यापासून २३१ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ३ तलाव नादुरूस्त असल्यामुळे फक्त ८९ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून १४२ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ अडले आहे. जिल्हयात २९४ कोल्हापूरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमुळे १० हजार ७४ हेक्टर क्षेत्राचे सिंचन होऊ शकते. मात्र ९३ बंधारे नादुरूस्त असल्यामुळे फक्त ३ हजार १५ हेक्टर सिंचन होत असून ७ हजार ५९ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकत नाही.तसेच १ हजार ४१५ साठवण बंधारे असून यापासून १२ हजार ८१६ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ६० बंधारे नादुरूस्त असल्यामुळे फक्त ६ हजार १३१ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ६ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचीत आहे. याशिवाय १२ उपसा सिंचन प्रकल्प आहेत. या उपसा सिंचन प्रकल्पांमुळे १ हजार १४ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ९ उपसा सिंचन प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त १४३ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ८७१ हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकत नाही.जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत असलेल्या प्रकल्पांची संख्या ३ हजार ३५८ आहे. या प्रकल्पांची सिंचन क्षमता ६३ हजार ७०७ हेक्टर आहे. परंतु १ हजार ४५७ प्रकल्प नादुरूस्त असल्यामुळे फक्त २९ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रालाच सिंचन होत असून ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्राचे सिंचन अडून पडले आहे. आता सिंचनाची सोयच नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.दुरूस्तीसाठी १०८ कोटींची गरजमामा तलाव, लपा तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे व उपसा सिंचन प्रकल्पांची दुरवस्था झाल्यामुळे जिल्ह्यातील ३८ हजार १७५ हेक्टर क्षेत्र सिंचीत होऊ शकत नाही. या सर्व प्रकल्पांच्या दुस्तीसाठी १०८ कोटी ४७ लाख रूपये लागणार आहेत. यात, मामा तलावांना ८१ कोटी ८६ लाख, लपा तलावांना १५ कोटी ३६ लाख, पाझर तलावांना १६ लाख, कोल्हापुरी बंधाऱ्यांना ६ कोटी ४१ लाख, साठवण बंधाºयांना २ कोटी ८३ लाख तर उपसा सिंचन प्रकल्पांना १ कोटी ८५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे.