शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

1634 जागांसाठी 3278 जणांनी अर्ज दाखल केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने मागील पाच दिवसात केवळ ७४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने याची दखल घेत मंगळवारपासून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज स्विकारले.

ठळक मुद्देअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी केली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होवू घातली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता. एकूण १६३४ जागांसाठी बुधवारी (दि.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तहसील कार्यालय आणि आपले सेवा केंद्रावर एकच गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३२७८ एकूण उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या असल्याने आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने मागील पाच दिवसात केवळ ७४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने याची दखल घेत मंगळवारपासून ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज स्विकारले. त्यामुळे तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे प्रशासनाची सुध्दा काही काळ धावपळ उडाली होती. अर्जातील संपत्तीचा तपशिल भरण्यासाठी उमेदवारांना बरीच अडचण जात असल्याचे चित्र होते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपंत्री जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची धावपळ झाली. रात्री ९ वाजतापर्यंत २५३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 

रात्री उशीरापर्यंत स्विकारले उमेदवारी अर्ज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस असल्याने सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झालेल्या सर्वच उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यात आले. त्यामुळे रात्री १० वाजेपर्यंत काही तालुक्यात उमेदवारी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरुच होती. त्यामुळे तहसील कार्यालय सुध्दा रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याचे चित्र होते. 

१८ जानेवारी रोजी फैसलाजिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतच्या १६३४ जागांसाठी जिल्ह्यातील ३२७८ उमेदवारी अर्ज दाखल केले. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून यानंतर नेमके किती उमेदवार रिंगणात आहेत हे चित्र स्पष्ट होईल. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्यानंतर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक