शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जिल्ह्यातील 327 मामा तलाव गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या रेकॉर्डनुसार आधी १७४८ होती. आता त्याच रेकार्डनुसार जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १४२१ आहे. म्हणजेच ३२७ मामा तलाव चोरीला गेले आहेत. ज्या लोकांच्या शेतात हे तलाव होते. त्यांनी त्या तलावांचे सपाटीकरण करून तलावांची जागा शेती घेतली आहे. यातील ११७ मामा तलावांची दैनावस्था आहे.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना निसर्गावरच अवलंबून रहावे लागते. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता गोंडराजाने जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची दुरवस्था झाली आहे. मामा तलाव, लपा तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, साठवण बंधारे व उपसा सिंचनांची दुरवस्था असल्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील सिंचन अडले आहे. जिल्ह्यातील ३२७ माल गुजारी तलाव चोरीला गेल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्यात मामा तलावांची संख्या जि. प. लघु पाटबंधारे विभागाच्या रेकॉर्डनुसार आधी १७४८ होती. आता त्याच रेकार्डनुसार जिल्ह्यात मामा तलावांची संख्या १४२१ आहे. म्हणजेच ३२७ मामा तलाव चोरीला गेले आहेत. ज्या लोकांच्या शेतात हे तलाव होते. त्यांनी त्या तलावांचे सपाटीकरण करून तलावांची जागा शेती घेतली आहे. यातील ११७ मामा तलावांची दैनावस्था आहे. जिल्ह्यातील सद्यस्थितीत असलेल्या १४२१ मामा तलावांमधून जिल्ह्यातील २८ हजार ७३० हेक्टर क्षेत्राला सिंचन होऊ शकते. मात्र यातील ११७ तलाव नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त मामा तलावांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी ९६ लाख ४१ हजार रुपयांची गरज असल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील मामा तलाव हे शेती सिंचनासाठी अत्यंत उपयोगी पडणारे होते. परंतु शेतीची जागा अकृषक करून त्यावर प्लाटींग तयार करण्यात येत आहे. तलावांचे सपाटीकरण करून तलावांची जागा शेती घेऊन लागली आहे. त्यामुळे तलावांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. तलावांचे सपाटीकरण करता येत नाही. परंतु जे तलाव बुजविण्यात आले त्याला जबाबदार कोण? याकडे प्रशासन लक्ष का घालत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील ३२७ मामा तलाव गायब होऊनही एकावरही कारवाई नाही हा चिंतनाचा विषय आहे.

लघु पाटबंधारे विभागाला हवीत केवळ नवीन कामे- मामा तलावांमधून योग्य सिंचन क्षमता होते किंवा नाही. लघु पाटबंधारे विभागामार्फत असलेले सर्व प्रकल्पांच्या देखरेखीचे काम त्या विभागाचे आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाला नवीन काम करण्यासाठी निधी असला तरच ते काम करतात. अन्यथा आपल्या मालकीचे तलाव कुठे गायब होतात याकडे त्यांचे लक्ष नाही.

मामा तलावांची दुरुस्ती जि.प.कडे; परंतु हस्तांतरित केलेच नाही- स्वातंत्रपूर्व काळात तयार करण्यात आलेल्या मालगुजारी तलावांची दुरुस्ती करण्याचे अधिकारी शासनाने जिल्हा परिषदेकडे दिले आहे. १०० हेक्टरातील प्रकल्पाचे काम जि.प.कडे देण्यात आले. परंतु स्वातंत्र्यानंतर या मामा तलावांच्या सातबाऱ्यावर सरकार असेच नमूद आहे. ते तलाव जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झाले नाही.महसूल विभागाची केवळ बघ्याची भुमिका - कोणत्या तालुक्यातील किती मामा तलावांचे सपाटीकरण झाले. कोणत्या तलावात शेती तयार झाली. कोणत्या तलावाचे प्लाटिंग झाले, त्यात घरे तयार झालीत, याची शहनिशा महसूल विभागाने करणे आवश्यक आहे. ना ग्रामपंचायत, ना महसूल विभाग या तलावांकडे लक्ष देत असल्यामुळे ही मामा तलावांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मागील सात ते आठ वर्षात तलावांची संख्या कमी होत असताना याबाबत महसूल व पाटबंधारे विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प