शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

३० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

अनेक अधिकारी आले नि बदलून गेले मात्र तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांंच्या या (ऑऊटलेट) पाईप दुरुस्तीच्या मागणीला कुणीही भीक घातली नाही.यावरून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी गडेलठ्ठ वेतन घेणारे एवढे निष्ठुर कसे असू शकतात यांचे ज्वलंत उदाहरण येथे बघावयास मिळते. हे सर्व शेतकरी धानाची शेती करतात.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून संघर्ष। इटियाडोह पाटबंधारे विभागाचा प्रताप, शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : पाटबंधारे विभागाची दप्तर दिरंगाई आणि कर्तव्याबद्दलची उदासीनता यामुळे ३० हेक्टर शेती मागील १५ वर्षांपासून सिंचनापासून वंचित आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.शेती कोरडवाहू असो की सिंचनाची, कोणताही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. संत्रा, कापूस, सोयाबीन, गहू, तूर की धान उत्पादक शेतकरी असो प्रत्येकाच्या समस्या आहेत.उच्च प्रतीचे पीक घेऊनही ते घरी खायचे सौभाग्य यांच्या नशिबात नाही.कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट यांच्या पाचवीलाच पुजला आहे. आता बघा ना, इटियाडोह धरण क्षेत्राच्या मोरगाव कालव्यालगत तीस हेक्टर शेतीला गेल्या १५ वर्षांपासून सिंचनच होत नसल्याची गंभीर तेवढीच संतापजनक बाब पुढे आली आहे. या शेतीला कालव्याच्या पूर्वेकडील मोरगाव तलावातून सिंचन सुविधा पुर्वापार काळापासून उपलब्ध होती. तलाव आणि सदर शेतीच्या मधातून हा कालवा गेला आहे. त्यामुळे तलावातील पाणी कालव्यावरून (ऑऊटलेट) पाईपद्वारे शेतात सोडण्याची सोय करण्यात आली. सिंचन व्यविस्थत सुरू होते. पंधरा वर्षापूर्वी सदर (ऑऊटलेट) पाईपलाईन तुटली व कालव्यात कोसळली, याची तक्रार विभागाला देण्यात आली. अनेक अधिकारी आले नि बदलून गेले मात्र तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांंच्या या (ऑऊटलेट) पाईप दुरुस्तीच्या मागणीला कुणीही भीक घातली नाही.यावरून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी गडेलठ्ठ वेतन घेणारे एवढे निष्ठुर कसे असू शकतात यांचे ज्वलंत उदाहरण येथे बघावयास मिळते. हे सर्व शेतकरी धानाची शेती करतात. धानाला भरपुर पाणी लागते. पावसाळ्यात जर पावसाने दगा दिला तर अनेकदा एका पाण्यासाठी हातात असलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती असते.या स्थितीत पीक वाचिवण्यासाठी शेतकऱ्यास दोन हजार रुपये खर्च करून दुसऱ्याकडून पाण्याची सोय करावी लागते. हा अधिकचा भार सोसावा लागतो.पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर शेती कशीतरी होऊन जाते.मात्र रब्बीची हंगाम पाण्याअभावी होत नाही. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न या कुटुंबासमोर असतो. पंधरा वर्षांचा वनवास हे शेतकरी भोगत आहेत.हे शेतकरी पाईपलाईन दुरु स्ती करून पाणी मिळवण्यासाठी वारंवार बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजवून थकले, याच कालावधीत माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार, खासदार या सर्वांनाच निवेदने दिलीत.मात्र पदरात काहीच पडले नसल्याने या चाळीस शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा वाली कोण? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निधी नसल्याचे अधिकारी सांगतात. याबाबतीत आम्ही जेव्हा जेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले त्या प्रत्येकाने आम्हाला निधी उपलब्ध नसल्याची माहिती देऊन दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित शेतकरी आनंदराव शहारे यांनी केला आहे.कालव्याच्या सफाईकडे दुर्लक्षकालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात झाडांचे जंगल तयार झाले आहे. त्यामुळे पात्रच दिसत नाही.गाळ काढण्याचे काम अनेक वर्षांपासून झाले नसल्याने पात्र उथळ झाले आहेत. कित्येक ठिकाणी कालव्याची पाळ खचून पात्र रु ंदावले असल्याने कुठल्याही प्रकारची दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.मुख्य कालव्यात गाळ साचल्याने सिंचनासाठी धरणातून निर्धारित पाणी सोडलेच जात नाही.कालव्याची कालमर्यादा संपलेली आहे. कालव्यातून निर्धारित पाणी सोडले तरी जीर्ण ठिकाणी कालवे फुटतात. परिणामत: शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्धच होत नाही.कालव्यात वाढलेली मोठमोठी झाडे पाणी शोषण करतात हे सुद्धा एक कारण आहे. कालव्याच्या नुतनीकरणाकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प