शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

३० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

अनेक अधिकारी आले नि बदलून गेले मात्र तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांंच्या या (ऑऊटलेट) पाईप दुरुस्तीच्या मागणीला कुणीही भीक घातली नाही.यावरून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी गडेलठ्ठ वेतन घेणारे एवढे निष्ठुर कसे असू शकतात यांचे ज्वलंत उदाहरण येथे बघावयास मिळते. हे सर्व शेतकरी धानाची शेती करतात.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून संघर्ष। इटियाडोह पाटबंधारे विभागाचा प्रताप, शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : पाटबंधारे विभागाची दप्तर दिरंगाई आणि कर्तव्याबद्दलची उदासीनता यामुळे ३० हेक्टर शेती मागील १५ वर्षांपासून सिंचनापासून वंचित आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.शेती कोरडवाहू असो की सिंचनाची, कोणताही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. संत्रा, कापूस, सोयाबीन, गहू, तूर की धान उत्पादक शेतकरी असो प्रत्येकाच्या समस्या आहेत.उच्च प्रतीचे पीक घेऊनही ते घरी खायचे सौभाग्य यांच्या नशिबात नाही.कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट यांच्या पाचवीलाच पुजला आहे. आता बघा ना, इटियाडोह धरण क्षेत्राच्या मोरगाव कालव्यालगत तीस हेक्टर शेतीला गेल्या १५ वर्षांपासून सिंचनच होत नसल्याची गंभीर तेवढीच संतापजनक बाब पुढे आली आहे. या शेतीला कालव्याच्या पूर्वेकडील मोरगाव तलावातून सिंचन सुविधा पुर्वापार काळापासून उपलब्ध होती. तलाव आणि सदर शेतीच्या मधातून हा कालवा गेला आहे. त्यामुळे तलावातील पाणी कालव्यावरून (ऑऊटलेट) पाईपद्वारे शेतात सोडण्याची सोय करण्यात आली. सिंचन व्यविस्थत सुरू होते. पंधरा वर्षापूर्वी सदर (ऑऊटलेट) पाईपलाईन तुटली व कालव्यात कोसळली, याची तक्रार विभागाला देण्यात आली. अनेक अधिकारी आले नि बदलून गेले मात्र तेव्हापासून आजतागायत शेतकऱ्यांंच्या या (ऑऊटलेट) पाईप दुरुस्तीच्या मागणीला कुणीही भीक घातली नाही.यावरून पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी गडेलठ्ठ वेतन घेणारे एवढे निष्ठुर कसे असू शकतात यांचे ज्वलंत उदाहरण येथे बघावयास मिळते. हे सर्व शेतकरी धानाची शेती करतात. धानाला भरपुर पाणी लागते. पावसाळ्यात जर पावसाने दगा दिला तर अनेकदा एका पाण्यासाठी हातात असलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती असते.या स्थितीत पीक वाचिवण्यासाठी शेतकऱ्यास दोन हजार रुपये खर्च करून दुसऱ्याकडून पाण्याची सोय करावी लागते. हा अधिकचा भार सोसावा लागतो.पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर शेती कशीतरी होऊन जाते.मात्र रब्बीची हंगाम पाण्याअभावी होत नाही. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न या कुटुंबासमोर असतो. पंधरा वर्षांचा वनवास हे शेतकरी भोगत आहेत.हे शेतकरी पाईपलाईन दुरु स्ती करून पाणी मिळवण्यासाठी वारंवार बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजवून थकले, याच कालावधीत माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार, खासदार या सर्वांनाच निवेदने दिलीत.मात्र पदरात काहीच पडले नसल्याने या चाळीस शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा वाली कोण? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. निधी नसल्याचे अधिकारी सांगतात. याबाबतीत आम्ही जेव्हा जेव्हा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले त्या प्रत्येकाने आम्हाला निधी उपलब्ध नसल्याची माहिती देऊन दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित शेतकरी आनंदराव शहारे यांनी केला आहे.कालव्याच्या सफाईकडे दुर्लक्षकालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणात झाडांचे जंगल तयार झाले आहे. त्यामुळे पात्रच दिसत नाही.गाळ काढण्याचे काम अनेक वर्षांपासून झाले नसल्याने पात्र उथळ झाले आहेत. कित्येक ठिकाणी कालव्याची पाळ खचून पात्र रु ंदावले असल्याने कुठल्याही प्रकारची दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.मुख्य कालव्यात गाळ साचल्याने सिंचनासाठी धरणातून निर्धारित पाणी सोडलेच जात नाही.कालव्याची कालमर्यादा संपलेली आहे. कालव्यातून निर्धारित पाणी सोडले तरी जीर्ण ठिकाणी कालवे फुटतात. परिणामत: शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्धच होत नाही.कालव्यात वाढलेली मोठमोठी झाडे पाणी शोषण करतात हे सुद्धा एक कारण आहे. कालव्याच्या नुतनीकरणाकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प