शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘एक दिन सायकल के नाम’ उपक्रमाचे २०० आठवडे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 13:04 IST

सन २०१७ पासून ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम गोंदिया शहरातून सुरू करण्यात आला. प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी जीवन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे २०१७ पासून अविरत सुरू : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा केला सत्कार

गोंदिया : दिवसेंदिवस वातावरणात बदल घडून येत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत मिळत आहेत. यासाठी विविध प्रकारचे प्रदूषण कारणीभूत आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवून, उत्तम आरोग्य व निरोगी जीवन, इंधन बचत तसेच सायकल चालवून आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवू शकतो असा संदेश देण्यासाठी येथील युवकांनी ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम सन २०१७ पासून सुरू केला. रविवारी (दि.१६) या उपक्रमाला २०० आठवडे झाले आहेत.

सन २०१७ पासून जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरम यांच्या संयुक्तवतीने ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम शहरातून सुरू करण्यात आला. प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी जीवन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. याच उपक्रमातील दोन युवक अमन व शांती हे प्रदूषणमुक्त भारताचा संदेश घेऊन तब्बल हजारो किलोमीटरचा प्रवास करून बाघा बॉर्डर-जम्मू काश्मीर पर्यंत पोहचले. या अभियानाचे महत्व बघून उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

याच उपक्रमातील अशोक मेश्राम हे २५०० किलोमीटर सायकल चालवून मुंबईला गेले होते. त्यांचाही यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या उपक्रमात ७४ वर्षीय धावक मुन्नालाल यादव देखील जुळले असून त्याचा देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ' एक दिन सायकल के नाम ' चे सदस्य व सायकलिस्ट कार्यक्रमाला उपस्थित होते.

आता जॉबला सायकलने जाते

‘एक दिन सायकल के नाम’ या उपक्रमात २४ नोव्हेंबर २०१९पासून जोडली गेल्यावर मी प्रत्येक रविवारी सायकलिंग करत आहे. या आधी मी जॉबला गाडीने जायची. मात्र, आता मागील एक वर्षापासून सायकलने जॉबला जात आहे. कारण यामुळे मला दोन फायदे होत आहेत. पहिला फायदा म्हणजे माझा फिटनेस राखला जात आहे व दुसरा फायदा म्हणजे मला आता गाडीत पेट्रोल भरण्याचे पैसेही लागत नाहीत. म्हणून सगळ्यांनी सायकल चालवावी, हाच संदेश मी देत आहे.

- कल्याणी गाडेकर, सायकलिस्ट

टॅग्स :SocialसामाजिकCyclingसायकलिंग