शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

२० हजार शेतकरी सावकारांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:29 IST

जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी आहे.

ठळक मुद्देयादी न आल्याने समस्या : शेतकऱ्यांचा हंगाम संकटात, बँकेचे कर्मचारी तणावात, प्रशासनाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाखांवर शेतकरी आॅनलाईन अर्ज केले होते. अर्जाच्या पडताळणीनंतर जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. त्यापैकी जुलै अखेर ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यावर १४५ कोटी रुपये जमा करण्यात आले. मात्र उर्वरित शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना प्राप्त झाली नाही.परिणामी मागील सहा महिन्यापासून २० हजार शेतकरी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाच्या पायऱ्या झिजवित आहेत.शेतकरी कर्जमाफीची यादी आली का म्हणून दररोज बँकाच्या पायऱ्या झिजवित आहे. तर बँका शेतकऱ्यांना महाआॅनलाईनकडून ग्रीन यादी आली नसल्याचे सांगत आहे. तर सध्या रोवणीची कामे जोमात सुरु असून शेतकऱ्यांना खते आणि मजुरीचा खर्च देण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना नातेवाईक आणि सावकारांकडून कर्ज घेण्याची पाळी आली आहे.जुने माफ होईना नवीन मिळेनाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे निश्चित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जर कर्जाची रक्कम भरली तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर दुसरीकडे जोपर्यंत त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होवून त्यांचे खाते शून्य होत नाही, तोपर्यंत त्यांना नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे जुने माफ होईना आणि नवीन पीक कर्ज मिळेना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.व्याजाचा दर वाढलासध्या खरीप हंगाम सुरू असून रोवणीची कामे सुरु आहे. वेळेवर रोवणी झाली नाही तर शेतकºयांना हंगामाला मुकावे लागेल. त्यामुळे वर्षभर कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. हंगाम हातून जावू नये यासाठी शेतकरी सावकारांच्या दारात जात आहे. मात्र सावकार शेतकऱ्यांच्या झालेल्या कोडींचा फायदा घेत असून दहा ते बारा टक्के व्याजाची आकारणी करीत असल्याची माहिती आहे.वर्षपूर्तीनंतरही तिढा कायमराज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला नुकताच वर्षभराचा कालावधी पूर्ण झाला मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्णपणे लाभ मिळालेला नाही. तर कर्जमाफीच्या ग्रीेन याद्यांवरुन दिवसेंदिवस तिढा वाढत असल्याचे चित्र आहे.महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंबकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी होवून अंतीम ग्रीन शासनाने नियुक्त केलेल्या महाआॅनलाईनकडून बँकांना पाठविली जात आहे. त्यानंतर बँका शेतकऱ्यांच्या बँकाखात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करुन त्यांचे खाते शून्य करीत आहे. मात्र महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांची कोंडी होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता बँक कर्मचाऱ्यांची दमच्छाक होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज