शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

२० हजार शेतकरी सावकारांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:29 IST

जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी आहे.

ठळक मुद्देयादी न आल्याने समस्या : शेतकऱ्यांचा हंगाम संकटात, बँकेचे कर्मचारी तणावात, प्रशासनाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाखांवर शेतकरी आॅनलाईन अर्ज केले होते. अर्जाच्या पडताळणीनंतर जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. त्यापैकी जुलै अखेर ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यावर १४५ कोटी रुपये जमा करण्यात आले. मात्र उर्वरित शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना प्राप्त झाली नाही.परिणामी मागील सहा महिन्यापासून २० हजार शेतकरी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाच्या पायऱ्या झिजवित आहेत.शेतकरी कर्जमाफीची यादी आली का म्हणून दररोज बँकाच्या पायऱ्या झिजवित आहे. तर बँका शेतकऱ्यांना महाआॅनलाईनकडून ग्रीन यादी आली नसल्याचे सांगत आहे. तर सध्या रोवणीची कामे जोमात सुरु असून शेतकऱ्यांना खते आणि मजुरीचा खर्च देण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना नातेवाईक आणि सावकारांकडून कर्ज घेण्याची पाळी आली आहे.जुने माफ होईना नवीन मिळेनाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे निश्चित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जर कर्जाची रक्कम भरली तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर दुसरीकडे जोपर्यंत त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होवून त्यांचे खाते शून्य होत नाही, तोपर्यंत त्यांना नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे जुने माफ होईना आणि नवीन पीक कर्ज मिळेना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.व्याजाचा दर वाढलासध्या खरीप हंगाम सुरू असून रोवणीची कामे सुरु आहे. वेळेवर रोवणी झाली नाही तर शेतकºयांना हंगामाला मुकावे लागेल. त्यामुळे वर्षभर कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. हंगाम हातून जावू नये यासाठी शेतकरी सावकारांच्या दारात जात आहे. मात्र सावकार शेतकऱ्यांच्या झालेल्या कोडींचा फायदा घेत असून दहा ते बारा टक्के व्याजाची आकारणी करीत असल्याची माहिती आहे.वर्षपूर्तीनंतरही तिढा कायमराज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला नुकताच वर्षभराचा कालावधी पूर्ण झाला मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्णपणे लाभ मिळालेला नाही. तर कर्जमाफीच्या ग्रीेन याद्यांवरुन दिवसेंदिवस तिढा वाढत असल्याचे चित्र आहे.महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंबकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी होवून अंतीम ग्रीन शासनाने नियुक्त केलेल्या महाआॅनलाईनकडून बँकांना पाठविली जात आहे. त्यानंतर बँका शेतकऱ्यांच्या बँकाखात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करुन त्यांचे खाते शून्य करीत आहे. मात्र महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांची कोंडी होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता बँक कर्मचाऱ्यांची दमच्छाक होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज