शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जन्मापूर्वीच १८२ बाळांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 9:42 PM

आरोग्य विभाग व प्रशासनातर्फे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यानंतरही बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले नाही.

ठळक मुद्देबालमृत्यू रोखण्यात प्रशासन अपयशी : अभियान ठरले नाममात्र, उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आरोग्य विभाग व प्रशासनातर्फे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यानंतरही बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले नाही. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत प्रसूतीदरम्यान महिलांच्या गर्भातच बाळांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे.गोंदिया जिल्ह्यात माता व बालमृत्यूच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. आरोग्य विभाग व प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेत माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागात जनजागृती केली जात आहे.महिलांना गर्भावस्थेत कोणती काळजी घ्यायची, कोणता पोषक आहार घ्यायचा याविषयी मार्गदर्शन व नियमित तपासणी केली जाते. मात्र यानंतरही माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. मागील वर्षभरात पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या १८२ महिलांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. सन २०१७ एप्रिल महिन्यात १०, मे १५, जून १५, जुलै २०, आॅगस्ट १९, सप्टेबर १७, आॅक्टोबर २०, नोव्हेबर १३, डिसेंबर १६, जानेवारी ११, फेब्रुवारी १२, मार्च महिन्यात १४ अशा एकूण १८२ बाळांचा जन्मापूर्वीच महिलांच्या गर्भातच मृत्यू झाला आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गर्भातच बाळाचा मृत्यू होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात औषधांची कमतरता, रक्ताची कमतरता, अशक्तपणा, संसर्ग, सिकलसेल आदी कारणे असू शकतात.महिलांनी गर्भावस्थेत योग्य काळजी घेण्याची गरज आहे मात्र बरेचदा ते याकडे दुर्लक्ष करतात. गर्भावस्थेदरम्यान नियमित तपासणी करीत नाही. या सर्व कारणांमुळे गर्भातच बाळाचा मृत्यू होतो.- डॉ.सायस केंद्रेप्रभारी वैद्यकीय अधीक्षक, बाई गंगाबाई महिला रुग्णालय.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल