शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१८,६०३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; दहावीच्या परीक्षेचा रणसंग्राम

By कपिल केकत | Updated: February 29, 2024 20:49 IST

पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त.

कपिल केकत, गोंदिया : इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असतानाच आता शुक्रवारपासून (दि.१) इयत्ता दहावीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला १८ हजार ६०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेला घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून बारावीच्या परीक्षेनुसारच दहावीच्या परीक्षेवरही पूर्ण नजर ठेवली जाणार आहे. परीक्षेत अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांना शांततेत पेपर सोडविता यावे, या उद्देशाने शिक्षण विभागाने नियोजन केले असून, प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परिक्षा केंद्र परिसरात १०० मिटर अंतरात प्रवेशबंदीही राहणार आहे. जिल्हयात ९८ केंद्रांवर दहावीची परिक्षा घेतली जाणार असल्याची माहिती माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनी दिली आहे.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. कॉपीबहाद्दरांची कसलीही गय करण्यात येणार नाही. यात केंद्रांवर होणारे गैरप्रकारावरही नियंत्रण मिळविण्यात येणार असून, बारावी सोबतच दहावीच्या इंग्रजी आणि गणिताच्या पेपरचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.भरारी पथकात जिल्हाधिकारी, सीईओ आणि एस.पी.

- परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय बैठे पथकही असणार आहे. त्याशिवाय दोन भरारी पथकही राहणार आहेत. एका पथकात जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, डाएट प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यासह महिला अधिकारी. तसेच दुसऱ्या पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जि.प. विभाग प्रमुख असतील.

दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी- १८,६०३

दहावीच्या परीक्षेसाठी केंद्र - ९८

टॅग्स :ssc examदहावीEducationशिक्षण