शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

१८,६०३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा; दहावीच्या परीक्षेचा रणसंग्राम

By कपिल केकत | Updated: February 29, 2024 20:49 IST

पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त.

कपिल केकत, गोंदिया : इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असतानाच आता शुक्रवारपासून (दि.१) इयत्ता दहावीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला १८ हजार ६०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेला घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून बारावीच्या परीक्षेनुसारच दहावीच्या परीक्षेवरही पूर्ण नजर ठेवली जाणार आहे. परीक्षेत अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांना शांततेत पेपर सोडविता यावे, या उद्देशाने शिक्षण विभागाने नियोजन केले असून, प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परिक्षा केंद्र परिसरात १०० मिटर अंतरात प्रवेशबंदीही राहणार आहे. जिल्हयात ९८ केंद्रांवर दहावीची परिक्षा घेतली जाणार असल्याची माहिती माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनी दिली आहे.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. कॉपीबहाद्दरांची कसलीही गय करण्यात येणार नाही. यात केंद्रांवर होणारे गैरप्रकारावरही नियंत्रण मिळविण्यात येणार असून, बारावी सोबतच दहावीच्या इंग्रजी आणि गणिताच्या पेपरचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.भरारी पथकात जिल्हाधिकारी, सीईओ आणि एस.पी.

- परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय बैठे पथकही असणार आहे. त्याशिवाय दोन भरारी पथकही राहणार आहेत. एका पथकात जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, डाएट प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यासह महिला अधिकारी. तसेच दुसऱ्या पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जि.प. विभाग प्रमुख असतील.

दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी- १८,६०३

दहावीच्या परीक्षेसाठी केंद्र - ९८

टॅग्स :ssc examदहावीEducationशिक्षण