शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्यातील १७०० तलाठ्यांची पदे भरली जाणार; डिसेंबरअखेरीस भरती प्रक्रिया होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:16 IST

रिक्त पदांमुळे येत होत्या अडचणी : तलाठी संघटनेने सुद्धा वेधले होते भरतीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याच्या महसूल विभागातील तलाठ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. सध्या तलाठ्यांच्या संख्येपेक्षा कामाचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. त्यामुळे नागरिकांना कागदपत्रांची कामे वेळेत मिळत नाहीत. मात्र, डिसेंबरअखेरीस राज्यातील तलाठ्यांच्या १७०० पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भरती झाल्यानंतर तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, तसेच नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागतील. ही भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठीही मोठा दिलासा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा

महसूल विभागातील पात्र सेवकांसाठीही राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना याचा लाभहोणार आहे.

डिसेंबरअखेरीस तलाठ्यांची १७०० पदे भरणार

राज्यातील तलाठ्यांच्या १७०० रिक्त पदांची भरती डिसेंबरअखेरीस सुरू होण्याबाबत चर्चा सुरू आहे. पदभरतीमुळे कामाचा ताण कमी होईल आणि तलाठ्यांवर नागरिकांच्या कामाचा प्रेशर कमी होईल.

'पेसा' क्षेत्रात कंत्राटी नियुक्ती

'पेसा' क्षेत्रातील गावांमध्ये कामकाज सुरळीत करण्यासाठी कंत्राटी तलाठ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने सुविधा मिळतील.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना दिलासा

मागील अनेक दिवसांपासून तलाठी भरती होत नसल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण भरतीची प्रतीक्षा करीत आहेत. आता तलाठ्याच्या जागा निघाल्या तर त्यांना दिलासा मिळणार आहे.

तलाठ्यांची पदे रिक्त

जिल्ह्यातही तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एका तलाठ्याकडे दोन सज्जाचा कारभार दिला आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यास जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.

नागरिकांची कामे वेगाने मार्गी लागणार

तलाठ्याकडे नेहमीच शेतकरी, नागरिकांचे कामे पडत असतात. मात्र, एका तलाठ्याकडे दोन ते तीन सज्जे असल्याने ते दररोज येऊ शकत नाही. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, जागा भरल्याने जमीन, महसूल, कागदपत्रे आणि इतर सरकारी कामे आता वेगाने पूर्ण होतील. 

एका तलाठ्याकडे तीन तीन सज्जे

सध्या एका तलाठ्याकडे दोन ते तीन सज्जांची जबाबदारी दिली आहे. परिणामी, तलाठ्यांना कर्तव्य बजावताना मोठी दमछाक होत आहे. नवीन भरतीमुळे प्रत्येक तलाठ्याचे काम हलके होईल. 

"मागील बऱ्याच दिवसांपासून आज ना उद्या जागा निघतील, या आशेवर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहोत. तलाठ्यांच्या जागा निघतील अशी चर्चा आहे. पण प्रत्यक्षात जाहिरात निघून प्रामाणिक भरती होईल तेव्हाच खरे. आमचे प्रयत्न सुरू आहेत."- सुभाष थेर, युवक

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Fill 1700 Talathi Posts; Recruitment Starts December End

Web Summary : Maharashtra's Revenue Department will begin recruiting for over 1700 Talathi positions by December end. This recruitment will ease the burden on current Talathis and expedite citizens' work. Reserved positions are available for revenue servants. This provides relief to young people preparing for competitive examinations.
टॅग्स :GovernmentसरकारjobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र