शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

१७०० बालमजूर मुख्य प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:35 PM

शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत भीक मागणाऱ्या, मांग-गारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने बालसंक्रमण शाळा सुरू केल्या.

ठळक मुद्देजिल्ह्यात १६ विशेष प्रशिक्षण केंद्र : तीन बालमजूर झाले इंजिनियर

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणे, नदीतील रेतीतून सोने शोधणाऱ्या, रेल्वेत भीक मागणाऱ्या, मांग-गारूडी, पेंढारी व शाळाबाह्य बालमजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने बालसंक्रमण शाळा सुरू केल्या. सन २००६ ते २०१८ या कालावधीत जिल्ह्यात १७०० बाल कामगारांना मुख्यप्रवाहात आणले आहे. त्यांना शिक्षणांसाठी नियमित जि.प. शाळेत दाखल करण्यात आले. यात १० वी १२ वी होणारी शेकडो मुले आहेत.बाल कामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बाल कामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न गोंदिया जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यात पाच ते १० हजाराच्या घरात बालमजूर असले तरी शासनाकडे त्यांची नोंद आतापर्यंत एकूण १७०० करण्यात आली आहे.या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या यादव चौकात, मुर्री, गोंडीटोला, गौतमनगर, कुडवा, सुंदरनगर, गड्डाटोली, छोटा गोंदिया, अदासी, तिरोडा, काचेवानी, एकोडी (नवरगाव), मुंडीकोटा,भीमनगर (घोगरा), सालेकसाच्या बाबाटोली व मुरकुटडोह दंडारी येथे शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्या बाल मजुरांना त्यांचा मूलभूत हक्क मिळावा. यासाठी शासन तत्परता दाखवून बाल कामगारांच्या उत्थानासाठी कार्य करीत आहेत.यात १० वी व १२ होणारे शेकडो बालकामगार जिल्ह्यात आहेत. शिक्षण घेताना मृत पावलेल्या दोन बाल कामगारांच्या पालकांना प्रत्येकी १५ हजार रूपये असे ३० हजार रूपये मदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. आजघडीला ४५४ बालमजूर शिक्षण घेत आहेत.त्यांची पावले वळू लागली उच्च शिक्षणाकडेबालकामगारांनी १० वी १२ वी शिक्षण घेतले तर ते पुरे आहे. परंतु गोंदियात पकडलेल्या बालमजुरांनी उच्च शिक्षणाचा ध्यास घेतल्याने आता त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास अडचण नाही. कामगार कार्यालयाने पकडलेल्या बाल कामगारांना पायभूत शिक्षण दिले आहे. शेकडो बालके १० वी व १२ वी झाले. भीमनगर (मुंडीकोटा) येथील प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेतलेला मुनेश शेंडे या विद्यार्थ्यांने डीएड पूर्ण केले आहे. सदर प्रकल्पांतर्गत शिक्षक निर्देशक या पदावर सद्या कार्यरत आहे. कुडवा येथील संजय कांबळे हा विद्यार्थी सध्या भंडारा येथे इलेक्ट्रीक इंजिनियर म्हणून पदवी घेतली आहे. आणखी दोन मुले इंजिनियरींग करीत आहेत.संगोपन करते शासनबालसंक्रमण शाळेत शिकणाºया बालकांना दर महिन्याला ४०० रूपये निर्वाहभत्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. त्यांची नोंदणी शाळेत झाल्यावर त्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके देऊन त्यांच्यासाठी मध्यान्ह भोजनाची सोय देखील करण्यात आली आहे. या संगोपनामुळे त्यांना मुख्य प्रवाहात येण्यास मोलाची मदत होत आहे.