शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

११ महिन्यांत जिल्ह्यात रस्ते अपघातात १५६ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:52 IST

अतिवेग ठरतोय अपघातास कारणीभूत: वाहतुकीचे नियम पाळण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अतिवेग, वाहतुकीचे नियम पाळण्याकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत झालेल्या ३०१ रस्ते अपघातात तब्बल १५६ जण ठार, तर २३३ जण गंभीर जखमी झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला वाहतूक नियंत्रण पोलिस विभागाकडून दिला जात आहे.

वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाते. वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे व वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे काही प्रमाणात अपघाताची संख्या कमी करण्यास यश आले होते. पण, काही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एकूण ३०१ अपघात झाले आहेत. यात १५६ जण ठार झाले, तर २३३ जण गंभीर झाले आहे, तर ४८ जण किरकोळ जखमी झाले. अपघातामुळे काही जणांना अपंगत्वसुद्धा आले आहे. त्यामुळे वाहन चालविताना सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, तसेच वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघाताचे प्रमाण कमी करण्यास निश्चित मदत होईल, असा वाहतूक नियंत्रण विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. 

सर्वाधिक मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्यानेवाहतूक नियंत्रण विभागाकडे नोंद असलेल्या अपघातातील मृतांची संख्या व अपघाताचे कारण पाहिल्यास त्यात दुचाकी चालक वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करीत नाही. यातच अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेटचा वापर जरूर करावा. यामुळे जीवितहानी टाळण्यास निश्चित मदत होईल.

जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत झालेले अपघात महिना                      अपघात                मृत्यू जानेवारी                       १७                         ०८ फेब्रुवारी                        १८                         १२ मार्च                             ३०                         १७ एप्रिल                           ३३                         १७ मे                                ३४                          १५ जून                              ३५                         १८ जुलै                             २९                          १३ ऑगस्ट                         २७                          १३ सप्टेंबर                          २१                          ११ ऑक्टोबर                      २५                         ०९ नोव्हेंबर                        ३२                          २३ एकूण                          ३०१                         १५६

"वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा, तर दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. यामुळे अपघात व जीवितहानी टाळण्यास निश्चित मदत होईल."- नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघातgondiya-acगोंदिया