शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

११ महिन्यांत जिल्ह्यात रस्ते अपघातात १५६ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:52 IST

अतिवेग ठरतोय अपघातास कारणीभूत: वाहतुकीचे नियम पाळण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अतिवेग, वाहतुकीचे नियम पाळण्याकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत झालेल्या ३०१ रस्ते अपघातात तब्बल १५६ जण ठार, तर २३३ जण गंभीर जखमी झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला वाहतूक नियंत्रण पोलिस विभागाकडून दिला जात आहे.

वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जाते. वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे व वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे काही प्रमाणात अपघाताची संख्या कमी करण्यास यश आले होते. पण, काही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत एकूण ३०१ अपघात झाले आहेत. यात १५६ जण ठार झाले, तर २३३ जण गंभीर झाले आहे, तर ४८ जण किरकोळ जखमी झाले. अपघातामुळे काही जणांना अपंगत्वसुद्धा आले आहे. त्यामुळे वाहन चालविताना सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, तसेच वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघाताचे प्रमाण कमी करण्यास निश्चित मदत होईल, असा वाहतूक नियंत्रण विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. 

सर्वाधिक मृत्यू हे हेल्मेटचा वापर न केल्यानेवाहतूक नियंत्रण विभागाकडे नोंद असलेल्या अपघातातील मृतांची संख्या व अपघाताचे कारण पाहिल्यास त्यात दुचाकी चालक वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करीत नाही. यातच अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेटचा वापर जरूर करावा. यामुळे जीवितहानी टाळण्यास निश्चित मदत होईल.

जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत झालेले अपघात महिना                      अपघात                मृत्यू जानेवारी                       १७                         ०८ फेब्रुवारी                        १८                         १२ मार्च                             ३०                         १७ एप्रिल                           ३३                         १७ मे                                ३४                          १५ जून                              ३५                         १८ जुलै                             २९                          १३ ऑगस्ट                         २७                          १३ सप्टेंबर                          २१                          ११ ऑक्टोबर                      २५                         ०९ नोव्हेंबर                        ३२                          २३ एकूण                          ३०१                         १५६

"वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा, तर दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. यामुळे अपघात व जीवितहानी टाळण्यास निश्चित मदत होईल."- नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघातgondiya-acगोंदिया