शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 05:00 IST

तालुक्यात वर्ग १ ली ते १२ पर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण १५० शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १०५ शाळांचा समावेश आहे. २ जि.प.माध्यमिक शाळा खासगी अनुदानित आहे. ६ स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळा असून यामध्ये विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय जास्त आहेत. २ शासकीय आणि २ खासगी अनुदानित माध्यमिक शाळा आहेत. ४ प्राथमिक शाळा खासगी अनुदानित आहेत.

गृहभेटी दरम्यान अनेक समस्या : तालुक्यात ऑनलाईन शिक्षणाला अपयशलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कोवीड-१९ च्या संसर्गाच्या भीतीपोटी मार्च महिन्यापासून बंद पाडण्यात आलेले शाळा-महाविद्यालय अद्यापही विद्यार्थ्यांसाठी उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रावर पडला आहे. सालेकसा सारख्या आदिवासी व मागासलेल्या तालुक्यात ऑनलाईन सह इतर कोणत्याही पर्यायांना अध्यापन कार्यात यश मिळत नसल्याने तालुक्यातील १५ हजार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्ग लागण्याची प्रतीक्षा आहे. एखाद्या शिक्षकाला कोणताही विद्यार्थी समोर भेटला की सर शाळा केव्हा सुरु होणार? हा एकच प्रश्न विचारला जात आहे.नवीन शैक्षणिक सत्राला ३ महिने झाले असून यापुढेही शाळा केव्हा सुरु होतील याबद्दल नेमके कोणीच सांगू शकत नाही. दरम्यान या ३ महिन्यांत शासनाने ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ ही संकल्पना मांडत मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे ठरविले. शाळा आणि संस्थांनी यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबत ऑनलाईन जोडण्याचे सर्वतोपरी उपाय केले. परंतु तालुक्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला १० टक्केही यश आले नाही. एक तर विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची सोय त्यानंतर नेटवर्क आणि रिचार्ज मारण्याची समस्या सतत पाठलाग करीत आहे. त्यामुळे बालक-पालक-शिक्षक आणि चालक सगळेच हतबल झालेले आहेत. अशात शाळेत प्रत्यक्ष वर्ग भरवून सुरळीत शिक्षण देण्याशिवाय मार्ग सापडत नाही.तालुक्यात वर्ग १ ली ते १२ पर्यंत शिक्षण देणाऱ्या एकूण १५० शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १०५ शाळांचा समावेश आहे. २ जि.प.माध्यमिक शाळा खासगी अनुदानित आहे. ६ स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळा असून यामध्ये विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय जास्त आहेत. २ शासकीय आणि २ खासगी अनुदानित माध्यमिक शाळा आहेत. ४ प्राथमिक शाळा खासगी अनुदानित आहेत. तसेच ८ इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळा आहेत. जि.प.च्या प्राथमिक शाळांमध्ये तालुक्यातील ६ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.९४६ विद्यार्थी जि.प.च्या माध्यमिक शाळांमध्ये असून खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये एकूण ४७९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्वतंत्र अस्तीत्वात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात ७५० च्या जवळपास विद्यार्थी समाविष्ट आहेत. खासगी प्राथमिक शाळेत ३०० आणि कॉन्व्हेंटमध्ये १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.परंतु यासर्व विद्यार्थ्यांचे अध्यापन कार्य रखडले असून पालक मुलांच्या शिक्षणाबाबत चिंतेत पडले आहे. जि.प.च्या शाळांमध्ये शिकणारे ९० ते ९५ टक्के बालके गरीब मजूर वर्गातील घरची असून त्यांना अ‍ॅँड्रॉईड मोबाइल फोन हाताळणे शक्य नाही. ५ टक्के बालकांनी मोबाइलची सोय केली तरी या तालुक्यात नेटवर्कची मोठी समस्या असून नेटवर्कसह अनेक आवाहने उभी ठाकली आहे.दरम्यान माध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी गृहभेटीतून अध्यापन कार्य चालविण्याचा उपक्रम सुरु केला. परंतु या उपक्रमाला ही वांछीत यश मिळताना दिसत नाही. कारण की प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जावून शिक्षणाचे धडे देणे एवढे सोपे नाही. त्यातच गावातील एकूण विद्यार्थ्यांना एकाच स्थळी बोलावणे सुद्धा अशक्य व धोक्याचे सुध्दा आहे. अशात शिक्षकांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्याना गृहभेटीतू अध्यापनाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रयत्न करुन बोर्डाच्या परीक्षेसाठी मानसिकरित्या सज्ज ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु यामध्ये दररोज प्रत्येक विषयाचे अध्यापन देणे प्रत्येक मुलापर्यंत पोहचणे त्यांना दररोज गृहकार्य देणे व ते तपासणे यात सातत्य ठेवण्यात मोठया अडचणी येत आहेत. आश्रम शाळांच्या शिक्षकांना तर गृहभेट उपक्रम आणखी मोठया अडचणीचे आहेत.कारण की या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी वेगवेगळ््या गावचे आहेत. तसेच डोंगराळ भागात राहणारे व जंगलातील गावातले असून शिक्षकांना गृहभेट ही करणे शक्य नसते. या सर्वात १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांना तर प्रत्यक्ष वर्गाशिवाय इतर कोणतेच उपाय करता येत नाही. अशात आपले सरकार ऑनलाईन शिक्षण महाराष्ट्रात सुरळित असल्याचा गवगवा करीत असला तरी तालुक्यात मात्र त्याचा दावा सपशेल फोल ठरताना दिसत आहे.‘शाळेतील जेमतेम १० टक्के विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनची व्यवस्था केली असली तरी पालक हा मोलमजुरी करणारा असून आॅनलाइन अभ्यास करण्यासाठी नेट पॅक मारत राहणे अशक्य असते. अशात ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक समस्या उद्भवत असतात.मनोहर कटरे, मुख्याध्यापक, जि.प.डिजीटल शाळा, बोदलबोडीकोरोना काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी शिक्षणापासून पूर्ण वंचित राहू नये म्हणून शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात काही शिक्षक स्वयंस्फूर्त गृहभेटीतून अध्यापनाचे सातत्य कायम ठेवण्याचे प्रयत्न करीत आहे. हे फार मोलाचे ठरत आहे.एस.जी.वाघमारे, गटशिक्षणाधिकारी,पं.स.सालेकसा

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण