शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
2
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
3
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
4
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
5
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
6
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
7
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
8
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
9
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
10
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
11
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
12
वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या लेकीचा अंत; बाथरूममधील 'त्या' एका चुकीने घात केला
13
अनेक बचत खात्यांचा सापळा; जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो?
14
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
15
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
16
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
17
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
18
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
19
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
20
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
Daily Top 2Weekly Top 5

विविध ठिकाणी अडकले जिल्ह्यातील १५ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतरीत मजूर आणि नागरिकांसाठी ई-पास सेवा सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र यावर नोंदणी केल्यानंतरही अनेकांचे अर्ज रद्द केले जात आहे. तर अनेक मजुरांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांना या सुविधेचा कुठलाच लाभ होत नसून उलट त्यांची डोखेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देस्वगृही परतण्यासाठी धडपड : ई-पासची सुविधा ठरत आहे नाममात्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊन, संचारबंदीमुळे विविध राज्य आणि जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या स्वगृही सोडण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विशेष रेल्वे गाड्या आणि बसेसची व्यवस्था केली आहे. तर प्रशासनाने स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या स्वगृही पोहचण्यासाठी ई-पासेसची व्यवस्था करुन दिली आहे. मात्र यानंतरही गोंदिया जिल्ह्यातील १५ हजारावर रोजगारासाठी गेलेले मजूर विविध राज्य आणि जिल्ह्यात अजूनही अडकले असल्याची माहिती आहे.दरवर्षी जिल्ह्यातील हजारो मजूर रोजगारासाठी मुंबई, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलगंणा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे रोजगारासाठी जातात. मात्र यंदा मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने उद्योगधंदे ठप्प पडले असल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.हाताला काम नसल्याने रिकाम्या हाताने किती दिवस इतर राज्यात राहायचे, कोणती मदत लागली तर परराज्यात आपल्याला ती मदत कोण करणार असा प्रश्न त्यांना भेडसावित आहे. त्यामुळे येथे राहण्यापेक्षा आपल्या स्वगृही जावून राहणे कधीही सुरक्षित म्हणून त्यांची आपल्या जिल्ह्यात परतण्यासाठी धडपड सुरू आहे.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी आपल्या जिल्ह्यातील किती मजूर विविध ठिकाणी अडकले आहेत. यासाठी एक लिंक तयार केली होती. या लिंकवर केवळ मजुरांना क्लिक करायचे होते. त्यावर १५ हजारावर मजुरांनी नोंदणी केली. ही यादी लोकप्रतिनिधीनी महाराष्टÑ शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केली.आता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या मजुरांची माहिती घेवून त्यांना आपल्या जिल्ह्यात परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे.शासनाने स्थलांतरीत मजूर आणि नागरिक यांना त्यांच्या स्वगृही पाठविण्यासाठी रेल्वे गाड्या आणि बसेसची व्यवस्था केली असली तरी याची माहिती बऱ्याच मजुरांना नसल्याने ते आपल्या सोयीनुसार परतण्यासाठी वाहनाची व्यवस्था करुन घेत असल्याचे चित्र आहे.मजुरांचा पायी प्रवास सुरुचबºयाच स्थलांतरीत मजुरांपर्यंत विशेष रेल्वे गाड्या आणि बसेस सोडले जात असल्याची माहिती पोहचलेली नाही. त्यामुळे अजूनही जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील मजूर पायीच आपल्या गावाकडे परतत असल्याचे चित्र आहे. दररोज शेकडो मजूर पायी व मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे जाण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे.ई-पास ठरतेय मजुरांसाठी डोकेदुखीजिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतरीत मजूर आणि नागरिकांसाठी ई-पास सेवा सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र यावर नोंदणी केल्यानंतरही अनेकांचे अर्ज रद्द केले जात आहे. तर अनेक मजुरांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांना या सुविधेचा कुठलाच लाभ होत नसून उलट त्यांची डोखेदुखी वाढल्याचे चित्र आहे.मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न कायमजिल्ह्यात २ लाख ५६ हजार जॉब कार्डधारक मजूर आहेत. मात्र सध्या स्थितीत जिल्ह्यातील केवळ ८ हजार मजुरांना मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर २ लाख ४८ हजार मजूर अजूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. तर बाहेर जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले हजारो मजूर अद्याप जिल्ह्यात परत यायचे आहे. त्यामुळे ते परतल्यानंतर या संख्येत पुन्हा भर पडणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या