शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

१५ वर्षांपासून धरणग्रस्त ११४ शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:43 IST

शेतकऱ्यांनी मांडली व्यथा : शासनाकडे होतेय दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यातील देवछाया उपसा जलसिंचन योजनेकरिता २००९ मध्ये कोटरा येथील ११४ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या घटनेला १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला; परंतु अद्याप शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली.

सालेकसा हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त तालुका आहे. या तालुक्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के शेतकरीशेतीवर अवलंबून आहेत. कोटरा, कोसोटोला, हलबीटोला, पुजारीटोला धरण हे प्रसिद्ध आहेत. अशातच देवछाया उपसा जलसिंचन योजनेकरिता १७ ऑगस्ट २००९ मध्ये कोटरा येथील ११४ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. जमिनीचा मोबदला आज, उद्या मिळेल. या आशेवर शेतकरी होते. परंतु आश्वासनापलीकडे त्यांना काहीही मिळाले नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधीदेखील उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. या शेतकऱ्यांनी आमदार, खासदार यांच्यासह पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मंत्रालयाचे सचिव, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जलसंधारण कार्यालय, जिल्हा भूसंपादन विभाग यांना अनेकदा पत्रव्यवहार केले. शासकीय कार्यालयाच्या चकरा मारल्या. मात्र जमिनीच्या मोबदल्याबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत. १५ वर्षांत कित्येक अधिकारी बदलून गेले असतील, परंतु फाइल बदलत नाही. किंवा बदलून गेलेले अधिकारीसुद्धा फाइलसोबत नेत नाही, अशी खंत व्यक्त करीत शेतकऱ्यांनी कार्यरत अधिकारीसुद्धा तेवढेच जबाबदार असल्याचाही आरोप केला. तथापि, जमिनीचा मोबदला लवकरात लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आत्माराम भांडारकर, हरिश्चंद्र डोये, किशोर मडावी, रमेश भुते, छबीलाल धुर्वे, प्रल्हाद मडावी, अशोक मडावी, टेमलाल मडावी, राधेशाम मडावी यांनी दिला आहे. 

लोकप्रतिनिधी घेणार का दखल नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात सालेकसा तालुक्यातील विविध प्रलंबित विषय स्थानिक लोकप्रतिनिधी मांडतील. कोटरा येथील ११४ शेतकऱ्यांच्याही व्यथा मांडून त्यांना मोबदला मिळवून देतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgondiya-acगोंदियाfarmingशेती