शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपासून धरणग्रस्त ११४ शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:43 IST

शेतकऱ्यांनी मांडली व्यथा : शासनाकडे होतेय दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यातील देवछाया उपसा जलसिंचन योजनेकरिता २००९ मध्ये कोटरा येथील ११४ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या घटनेला १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला; परंतु अद्याप शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली.

सालेकसा हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त तालुका आहे. या तालुक्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के शेतकरीशेतीवर अवलंबून आहेत. कोटरा, कोसोटोला, हलबीटोला, पुजारीटोला धरण हे प्रसिद्ध आहेत. अशातच देवछाया उपसा जलसिंचन योजनेकरिता १७ ऑगस्ट २००९ मध्ये कोटरा येथील ११४ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. जमिनीचा मोबदला आज, उद्या मिळेल. या आशेवर शेतकरी होते. परंतु आश्वासनापलीकडे त्यांना काहीही मिळाले नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधीदेखील उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. या शेतकऱ्यांनी आमदार, खासदार यांच्यासह पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मंत्रालयाचे सचिव, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जलसंधारण कार्यालय, जिल्हा भूसंपादन विभाग यांना अनेकदा पत्रव्यवहार केले. शासकीय कार्यालयाच्या चकरा मारल्या. मात्र जमिनीच्या मोबदल्याबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत. १५ वर्षांत कित्येक अधिकारी बदलून गेले असतील, परंतु फाइल बदलत नाही. किंवा बदलून गेलेले अधिकारीसुद्धा फाइलसोबत नेत नाही, अशी खंत व्यक्त करीत शेतकऱ्यांनी कार्यरत अधिकारीसुद्धा तेवढेच जबाबदार असल्याचाही आरोप केला. तथापि, जमिनीचा मोबदला लवकरात लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आत्माराम भांडारकर, हरिश्चंद्र डोये, किशोर मडावी, रमेश भुते, छबीलाल धुर्वे, प्रल्हाद मडावी, अशोक मडावी, टेमलाल मडावी, राधेशाम मडावी यांनी दिला आहे. 

लोकप्रतिनिधी घेणार का दखल नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात सालेकसा तालुक्यातील विविध प्रलंबित विषय स्थानिक लोकप्रतिनिधी मांडतील. कोटरा येथील ११४ शेतकऱ्यांच्याही व्यथा मांडून त्यांना मोबदला मिळवून देतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgondiya-acगोंदियाfarmingशेती