शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दाम दुप्पटच्या नावाखाली फसवणूक; बालाघाट जिल्ह्यातून १० जण अटकेत, हादरे मात्र गोंदियात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2022 16:40 IST

बालाघाट पोलिसांनी १६ मे रोजी लांजी येथे धाड टाकून १० जणांना अटक केली. ही कारवाई होताच जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना याचे हादरे बसले आहेत.

ठळक मुद्देरक्कम दुप्पट करून देण्याचा व्यवसाय, अनेक व्यापाऱ्यांनी केली गुंतवणूकलांजी येथील १० जणांना अटक

गोंदिया : सहा महिन्यात रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या नावाखाली मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथे मागील सहा वर्षांपासून हा व्यवसाय सुरू होता. मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातील अनेकजणांनी यात गुंतवणूक केली होती. गोंदिया जिल्ह्यातील काही व्यापारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी यात लाखो रुपये गुंतविल्याची माहिती आहे. दरम्यान, बालाघाट पोलिसांनी १६ मे रोजी लांजी येथे धाड टाकून १० जणांना अटक केली. ही कारवाई होताच जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना याचे हादरे बसले आहेत.

बालाघाट पोलिसांनी कारवाई दरम्यान १० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १६ मोबाईल व गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे. या प्रकरणात बोलेगाव लांजी येथील हेमराज आंबेडारे, रमेश मंसुरे, राकेश मंसुरे, प्रदीप कंकरायने, ललिता वैष्णव, राहुल बापुरे, रामचंद्र कालबले, अजय तिडके, शिवजित चिले, मनोज सोनेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील व्यापारी आणि अन्य गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती आहे.

सहा महिन्यात रक्कम दुप्पट

बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर येथे मागील सहा वर्षांपासून सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्याचा व्यवसाय सुरू आहे. ज्यांनी यात गुंतवणूक केली होती, त्यांना सहा महिन्याचा कालावधी होताच दुप्पट रक्कमदेखील परत करण्यात आली. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांवर विश्वास अधिक दृढ झाल्याने अनेकजण गुंतवणूक करण्यासाठी लांजी व किरणापूर येथे पोहोचत होते.

चार तालुक्यांतील गुंतवणूकदारांनी केली सर्वाधिक गुंतवणूक

सहा महिन्यात रक्कम दामदुप्पट होत असल्याने गोंदिया, सालेकसा, आमगाव, गोरेगाव येथील व्यापारी आणि काही सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक लांजी व किरणापुरे येथील व्यावसायिकांकडे केल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी कारवाई करताच लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सहा महिन्याच्या मुदतीचा धनादेश दिला जात होता आधीच

सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्यासाठी गुंतवणूकदारांनी रक्कम जमा केल्यानंतर संबंधित व्यावसायिकांकडून सहा महिन्याच्या मुदतीनंतर दुप्पट रक्कमेचा धनादेश गुंतवणूकदारांना दिला जात होता. यातून अनेकजण लखपती झाल्याची माहिती आहे.

आरोपींना ३० मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना बालाघाट येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या अटक केलेल्या आराेपींना न्यायालयाने ३० मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी केली आहे. तर या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.

गुंतवणूक नेमकी कुठे करायचे?

बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर येथे मागील सहा वर्षांपासून सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देण्याचा व्यवसाय सुरू होता. मागील सहा वर्षांपासून हा व्यवसाय सुरळीतपणे सुरू होता शिवाय कुणीही तक्रार केली नव्हती. मात्र, हे व्यावसायिक पैशांची नेमकी कुठे गुंतवणूक करून सहा महिन्यात रक्कम दुप्पट करून देत होते, हा पोलिसांसाठीही संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदियाfraudधोकेबाजीMONEYपैसा