शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मध्यान्ह आहाराचे काम स्वयंसहाय्य गटांकडेच : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 7:02 PM

मध्यान्ह आहार योजनेचे काम अक्षय पात्रकडे सोपविले जाणार नाही. ते काम राज्यातील महिलांकडे म्हणजेच स्वयंसहाय्य गटांकडेच असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले.

पणजी : मध्यान्ह आहार योजनेचे काम अक्षय पात्रकडे सोपविले जाणार नाही. ते काम राज्यातील महिलांकडे म्हणजेच स्वयंसहाय्य गटांकडेच असेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच ज्या स्वयंसहाय्य गटांची तीन महिन्यांची बिले सरकारकडे प्रलंबित उरली आहेत, ती बिले येत्या आठ दिवसांत फेडली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.प्रश्नोत्तराच्या तासावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मध्यान्ह आहार योजनेविषयीचा मूळ प्रश्न मांडला होता. राज्यातील गरीब महिलांकडून विद्याथ्र्याना मध्यान्ह आहार पुरविला जातो. स्वयंसहाय्य गटांना काही फार मोठा फायदा मिळत नाही. त्यांच्याकडून दुकानातून उधारीवर सामान आणले जाते. त्याना बिले सरकारने वेळेत दिली तरच स्वयंसहाय्य गट दुकानदारांना पैसे देऊ शकतात, असा मुद्दा कामत यांनी मांडला. अनेक महिने सरकार बिलेच फेडत नसल्याने अडचण होते असे कामत म्हणाले. एखाद्या स्वयंसहाय्य गटातील एक-दोन सदस्यांनी बँक खात्याविषयी तक्रार केली म्हणून त्या गटाचे बिल अडवून ठेवू नका, असाही सल्ला कामत यांनी दिला.सरकार अक्षय पात्रला मध्यान्ह आहाराचे काम देऊ पाहत आहे काय अशी विचारणा आमदार विजय सरदेसाई यांनी केली. अक्षय पात्रशी पूर्वी काररही झालेला आहे, असे ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित उत्तर दिले. करार जर झालेला असेल तर तो आपण रद्द करून घेईन. गोव्यातील स्वयंसहाय्य गट आता चांगल्या प्रकारे मध्यान्ह आहार पुरवितात. आहाराचा दर्जाही सुधारला आहे. हे काम गोव्यातील महिलांकडेच राहिल. एकूण 112 स्वयंसहाय्य गट या कामात गुंतलेले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विविध कारणास्तव काही स्वयंसहाय्य गटांना तीन महिन्यांची बिले मिळाली नाहीत पण आता ती लवकरच फेडली जातील,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तीन तरी स्वयंसहाय्य गटांतील काही सदस्यांची बँक खात्यांविषयी तक्रार होती. तुम्ही त्या खात्यात पैसे जमा करू नका असे आम्हाला सदस्यांनी सांगितले होते. आम्ही त्यांना बोलावून घेऊन तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला आहे. अंतर्गत वादामुळे त्यांचे बिल अडले होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक स्वयंसहाय्य गटांशी गेल्या जून-जुलैमध्ये जो करार व्हायला हवा होता, तोही वेळेत न झाल्याने बिले अडली होती असेही सावंत यांनी नमूद केले.1 लाख 61 हजार मुलांना आहारदरम्यान, किती विद्याथ्र्याना रोज सरकारकडून मध्यान्ह आहार पुरविला जातो अशी विचारणा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी केली होती. पाचवी ते आठवीर्पयतच्या एकूण 1 लाख 61 हजार 693 मुलांकडून मध्यान्ह आहाराचा लाभ घेतला जातो. त्यात सरकारी व अनुदानित अशा सर्वच विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत