शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिला आरक्षण ही नव्या युगाची नांदी; भाजप महिला मोर्चाकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:36 IST

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती.

पणजी : केंद्र सरकारने संमत केलेले महिला आरक्षण विधेयक म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे. यामुळे महिलांना राजकीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळणार आहे असे प्रतिपादन प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती. केंद्रातील भाजप सरकारने ती मान्य करुन महिलांना त्यांनी सन्मान दिला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असे त्या म्हणाल्या. सावंत म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला महिला आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. मात्र कॉंग्रेस तसेच काही पक्ष त्याला विरोध करीत आहेत. या आरक्षणाद्वारे महिलांना राजकारणात येण्याची संधी मिळणार आहे. लोकसभा निवडणूका जवळ आल्याने हे आरक्षण जाहीर केल्याची टीका विरोधक करीत आहेत. मात्र तसे नसून उलट भारत स्वतंत्र झाल्याच्या ७५ वर्षानंतर आरक्षणाच्या माध्यमातून भाजप सरकारने महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. आरक्षणामुळे महिला सशक्तीकरणाला अधिकच बळकटी मिळाल्याचे सावंत यांनी नमूद केले.

शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो म्हणाल्या, 'महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे ही अनेक वर्षापासूनची मागणी भाजप सरकारने पूर्ण केली आहे. यामुळे महिलांना राजकारणात येण्यासाठी अधिकच संधी मिळेल. त्यादृष्टीने महिला आरक्षण महत्वाचे आहे. विधानसभेच्या महिला आमदारांची संख्या २०२७ च्या निवडणूकीत १३ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर व अन्यउपस्थित होते.

विजयादेवी राणे यांच्याकडून स्वागत

महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्याने गोवा बाल भवनच्या माजी अध्यक्षा विजयादेवी राणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधानांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अनेक सरकारांच्या अनेक पंतप्रधानांनी हे विधेयक आणण्याचे प्रयत्न केले. परंतु ते अपुरे का पडले, हे अजून मला कळलेले नाही. परंतु केवळ पंतप्रधान मोदी यांनी हे काम करून दाखवले. हा लोकशाहीचा फार मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा देशातील सर्व महिलांचा विजय आहे असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

टॅग्स :goaगोवाWomen Reservationमहिला आरक्षण