शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

महिला आरक्षण ही नव्या युगाची नांदी; भाजप महिला मोर्चाकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 14:36 IST

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती.

पणजी : केंद्र सरकारने संमत केलेले महिला आरक्षण विधेयक म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे. यामुळे महिलांना राजकीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळणार आहे असे प्रतिपादन प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती. केंद्रातील भाजप सरकारने ती मान्य करुन महिलांना त्यांनी सन्मान दिला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असे त्या म्हणाल्या. सावंत म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला महिला आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. मात्र कॉंग्रेस तसेच काही पक्ष त्याला विरोध करीत आहेत. या आरक्षणाद्वारे महिलांना राजकारणात येण्याची संधी मिळणार आहे. लोकसभा निवडणूका जवळ आल्याने हे आरक्षण जाहीर केल्याची टीका विरोधक करीत आहेत. मात्र तसे नसून उलट भारत स्वतंत्र झाल्याच्या ७५ वर्षानंतर आरक्षणाच्या माध्यमातून भाजप सरकारने महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. आरक्षणामुळे महिला सशक्तीकरणाला अधिकच बळकटी मिळाल्याचे सावंत यांनी नमूद केले.

शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो म्हणाल्या, 'महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे ही अनेक वर्षापासूनची मागणी भाजप सरकारने पूर्ण केली आहे. यामुळे महिलांना राजकारणात येण्यासाठी अधिकच संधी मिळेल. त्यादृष्टीने महिला आरक्षण महत्वाचे आहे. विधानसभेच्या महिला आमदारांची संख्या २०२७ च्या निवडणूकीत १३ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर व अन्यउपस्थित होते.

विजयादेवी राणे यांच्याकडून स्वागत

महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्याने गोवा बाल भवनच्या माजी अध्यक्षा विजयादेवी राणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधानांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अनेक सरकारांच्या अनेक पंतप्रधानांनी हे विधेयक आणण्याचे प्रयत्न केले. परंतु ते अपुरे का पडले, हे अजून मला कळलेले नाही. परंतु केवळ पंतप्रधान मोदी यांनी हे काम करून दाखवले. हा लोकशाहीचा फार मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा देशातील सर्व महिलांचा विजय आहे असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

टॅग्स :goaगोवाWomen Reservationमहिला आरक्षण