शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

जिंकल्याने बळ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 14:44 IST

फोंडा व साखळी पालिकेच्या निवडणुकांचा निकाल कालच्या रविवारी लागला.

फोंडा व साखळी पालिकेच्या निवडणुकांचा निकाल कालच्या रविवारी लागला. भाजपने अपेक्षेहून जास्त यश मिळवत विरोधकांना चारीमुंड्या चित केले. पूर्ण गोव्याला भाजपने विस्मयचकित केले आहे. कर्नाटकात मतदान होण्यापूर्वीच गोव्यात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दोन पालिकांच्या निकालामुळे खूप वाढला आहे. या घवघवीत यशासाठी भाजपचे अभिनंदन करावेच लागेल. राज्यात टिकून राहण्यासाठी विरोधी काँग्रेस पक्षाला यापुढे खूप कष्ट घ्यावे लागतील, असा संदेश या निकालाने दिला आहे. काँग्रेसकडे राज्यस्तरीय असे प्रभावी नेतृत्वच नसल्याने स्थानिक स्तरावरीलच काँग्रेस समर्थक उमेदवारांना मर्यादित कुवतीनुसार पालिका निवडणुकीत लढावे लागले. ते हरतात की जिंकतात हेदेखील काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांनी निवडणूक काळात विचारले नसेल.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी साखळी व फोंडा पालिका निवडणूक प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. तानावडे यांच्यामुळेच भाजपची मते वाढली असे जरी म्हणता येत नसले, तरी प्रदेशाध्यक्ष प्रचारात स्वतःला झोकून देतात हे पाहूनच कार्यकर्त्यांचा हुरूप वाढतो. मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते होते तेव्हा तेही पालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी स्वतःला झोकून देत होते. काँग्रेसच्या युरी आलेमाव यांना हे कौशल्य कदाचित ठाऊकही नसेल. काँग्रेस पक्ष विरोधात असतो तेव्हा त्या पक्षाला पंचायत व पालिका निवडणुकांतही मोठासा रस नसतो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात येणाऱ्या साखळी नगरपालिकेची निवडणूक यावेळी जास्त चुरशीची ठरली. 

मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकारची रणनीती वापरली. त्यांच्या विरोधकांच्या हाती पालिका राहणे हे त्यांच्या पदाला कमीपणा आणणारे होते. धर्मेश सगलानी यांच्या गटाने कायम मुख्यमंत्री सावंत यांच्याशी संघर्ष केला. पालिका विरुद्ध मुख्यमंत्री असा संघर्ष साखळी शहराच्या विकासासाठी मारक ठरत होता. यावेळी सगलानी- प्रवीण ब्लेगन यांच्या गटाचा दारुण पराभव झालाच. शिवाय स्वतः सगलानीही 30 मतांनी पराभूत झाल्याने मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे बळ चारही बाजूंनी वाढले. सगलानी हेच सावंत यांना विधानसभा निवडणुकीतही आव्हान देत होते. सगलानी आता वॉर्डातही निवडून न आल्याने मुख्यमंत्र्यांची छाती फुलली असेलच. मंत्रिमंडळातही मुख्यमंत्र्यांचे वजन वाढले, असे एका मर्यादित अर्थाने म्हणता येईल. 

साखळी पालिका निवडणुकीत विरोधकांचा विजय झाला असता तर काही मंत्र्यांना सुप्त व छुपे समाधान वाटले असते हे वेगळे सांगायला नको. फोंडा पालिका निवडणुकीवेळी तुलनेने स्थिती वेगळी होती. कृषिमंत्री रवी नाईक गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये आल्याने फोंड्यात भाजपची शक्ती सर्व बाजूंनी वाढलीच होती. रवी नाईक काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर भाजपचे मूळ कार्यकर्ते व समर्थक आणि खींचे कार्यकर्ते व समर्थक यांचे बळ एकत्र आले. शक्तीचा गुणाकार झाला. काही मूळ कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांचे रुसवेफुगवे आहेतच, पण त्यामुळे रवींची हानी झाली नाही. रवी नाईक यांना मुस्लिम व ख्रिस्ती मतदारांमध्येही पाठिंबा आहे. भाजपला ज्या मुस्लिम धर्मीयांची मते मिळत नाहीत, ती मते रवी नाईक यांना फोंड्यात मिळतात. मडगावमध्ये दिगंबर कामत व फोंड्यात रवी नाईक यांनी अल्पसंख्याकांची मते भाजपकडे वळवली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत रवींसमोर मगो पक्षाचे केतन भाटीकर यांचे कडवे आव्हान होते. रवी त्यावेळी कसेबसे जिंकले. काही भाजपवाल्यांनी छुप्या पद्धतीनेरवींच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता, हा वेगळा विषय. 

साखळीत मुख्यमंत्री सावंत यांचे वजन कमी करण्याच्या हेतूने काँग्रेस समर्थकांनी आपले पॅनल उभे केले होते. सरकारने अगोदर पालिका प्रभागांची फेररचना व आरक्षण हे स्वतःला हवे तसे करून घेतले होतेच. विरोधकांचा पत्ता कापण्यासाठी भाजप सरकार दरवेळी पंचायत, झेडपी व पालिका निवडणुकांवेळी असा खेळ खेळतच असते. भाजपने पालिका निवडणुकीत सर्वच नीती वापरली. धमक्या दिल्याचेही आरोप झाले. सरकारी नोकऱ्या देण्याचीही आश्वासने दिली गेली. शेवटी जो जिता वही सिकंदर. फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र आता नगरसेवक झाले आहेत. दोन्ही पालिकांचा कारभार सुधारो एवढीच अपेक्षा.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा