शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू; मुख्यमंत्र्यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 10:03 IST

मतदारसंघनिहाय योजना, कामाचा घेतला आढावा.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपचे २८, मित्रपक्ष मगोपचे २ व अपक्ष ३ मिळून ३३ आमदारांच्या पाठिंब्यावर राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. दक्षिण गोव्याची जबाबदारी असलेले केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी सर्व आमदारांची बैठक घेतली. अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स गोव्याबाहेर असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीसाठी आता केवळ १६० दिवस राहिले आहेत. त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळाले. मतदारसंघनिहाय कशा पद्धतीने पुढे जाता येईल व दोन्ही मतदारसंघ कसे जिंकता येतील याबाबत चर्चा झाली.'

मुख्यमंत्री म्हणाले, 'गोव्यात केंद्र सरकारच्या योजना ९९ टक्के कुटुंबांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि लोकांचा भाजपला पाठिंबा आहे. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांच्या मतदारसंघात विविध कामे चालू आहेत. त्याचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या मदतीने आगामी दोन-तीन महिन्यांत हाती घ्यावयाच्या विकास प्रकल्पांवरही चर्चा झाली. गोवा देशातील पहिले डिजिटल राज्य बनविण्याचा आमचा मानस आहे. केंद्राकडे त्यासाठी वेगळा निधीही आम्ही मागितला आहे.'

निवडणुकीनंतर उमेदवारी : तानावडे

उमेदवार निश्चित झाले आहेत का, असे विचारले असता प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा भाजप खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले, भाजपची उमेदवार निवडीसाठी पद्धती आहे. त्यानुसार राज्य निवडणूक समिती नावांची शिफारस केंद्रीय संसदीय मंडळाकडे करील आणि नंतर उमेदवार निश्चित केला जाईल. हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर होणार आहे.' पत्रकार परिषदेस उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर हेही उपस्थित होते.

दहा वर्षात गोव्याचा कायापालट : चंद्रशेखर

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, 'डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास जलदगतीने होऊ लागला आहे. गोव्यात युवकांमध्ये कौशल्य विकासासाठी जो उपक्रम सरकारने चालवला आहे, तो उल्लेखनीय आहे. गेल्या दहा वर्षांत गोवा राज्यात आणि देशभरात कायापालट झालेला आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून जगभरातील पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये बसवण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. जनतेने भाजपचा विकास पाहिला आहे. त्यामुळे दोन्ही जागा भाजपलाच मिळतील, याबद्दल दुमत नाही.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाBJPभाजपा