शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

१०-१२ हजार नोकऱ्या देणारच: मुख्यमंत्री; येत्या दोन वर्षांसाठी लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:49 IST

कुंभारजुवेत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य सरकार १०-१२ हजार नोकऱ्या देणारच. मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे पुढील दोन वर्षात चार हजार नोकऱ्या दिल्या जातील. या नोकऱ्यांबाबत सुरक्षितता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात, ते सर्व फायदे या कर्मचाऱ्यांनाही मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कुंभारजुवें मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 'राष्ट्र प्रथम ही भावना ठेवून काम केले जात आहे. देशाच्या संरक्षण तसेच विकासासाठी भाजप सरकारच हवे' असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'पाकिस्तान दूर आहे, म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत असे होत आहे. आम्ही सुरक्षित आहोत, कारण भारतीय नौदल सक्षम आहे. देशाला पंतप्रधान नरेंद मोदी यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. भाजप सरकारने गोव्यातसुद्धा अनेक विकास प्रकल्प उभारले आहेत. राज्याच्या विकाला चालना दिली आहे. या प्रकल्पांना विकास म्हणता येईल. अशा प्रकारचा विकास केवळ भाजप सरकारच करू शकतो.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'काँग्रेस सरकारच्या काळात देशाने अपेक्षित विकास साधला नाही. महत्त्वाच्या अशा कोणत्याही योजना त्यांनी सुरू केल्या नाहीत. काँग्रेस पक्ष हा धर्माच्या आधारे विभाजन करू पहात आहे. मात्र, आम्ही तसे कधीच केलेले नाही. भाजप सरकार लोकांची सेवा करण्यासाठी आहे. ज्यांना काम करण्याची आवड आहे, त्यांनी भाजपमध्ये यावे.' यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कईकर यांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुंभारजुवे मतदारसंघाचा झपाट्याने विकास

आमदार राजेश फळदेसाई म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी करून दाखवले. जगात भारत देश हा पहिल्या क्रमांकावर आहे, कारण पंतप्रधान सर्वांना एकत्र घेऊन चालतात. गोव्यातील भाजप सरकार चांगले काम करीत आहे. राज्य सरकार रोजगार निर्मितीवर भर देत आहे. कुंभारजुवे मतदारसंघाचा भाजप सरकारच्या काळात झपाट्याने विकास सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कधीच विकासकामांसाठी नकार देत नाहीत. २०२७ मध्ये २७ हे ध्येय आम्ही पुढे नेणार आहोत.

भाजप सर्वांना सोबत नेणारा पक्ष : नाईक

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, भाजप पक्ष हा एक परिवार आहे. तो सर्वांना एकत्र घेऊ चालणारा पक्ष आहे. या कार्यकर्त्यांच्या पक्षाचे १४ कोटींहून अधिक सदस्य आहेत. अंत्योदय तत्त्वावर पक्ष चालतो. आमच्या सरकारने अनेक सामाजिक योजना राबविल्या आहेत. सर्वसामान्य घटकांपर्यंत त्या योजना पोहोचाव्यात यावर भर असतो. सामान्यांचा स्तर वाढावा यासाठी लाडली लक्ष्मी, गृहआधार, आरोग्य, शिक्षण योजना राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उच्च स्तरावर नेण्यासाठी काम करीत आहेत.

दहशतवाद्यांना चोख उत्तर : तानावडे

खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, 'पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले. मात्र, असे करताना त्यांनी सर्वसामान्यांना त्रास दिला नाही तर तेथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठलाही स्वार्थ न ठेवता देशासाठी काम करतात. भारत आज पायाभूत सुविधा, महिला सशक्तीकरण, शिक्षण, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रांत ताकदवान देश बनला आहे. मोदी यांचे सशक्त नेतृत्व देशाला लाभले आहे. २०४७ पर्यंत भारत देशाला महाशक्ती बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा