शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

१०-१२ हजार नोकऱ्या देणारच: मुख्यमंत्री; येत्या दोन वर्षांसाठी लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:49 IST

कुंभारजुवेत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य सरकार १०-१२ हजार नोकऱ्या देणारच. मनुष्यबळ विकास महामंडळातर्फे पुढील दोन वर्षात चार हजार नोकऱ्या दिल्या जातील. या नोकऱ्यांबाबत सुरक्षितता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात, ते सर्व फायदे या कर्मचाऱ्यांनाही मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. कुंभारजुवें मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 'राष्ट्र प्रथम ही भावना ठेवून काम केले जात आहे. देशाच्या संरक्षण तसेच विकासासाठी भाजप सरकारच हवे' असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'पाकिस्तान दूर आहे, म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत असे होत आहे. आम्ही सुरक्षित आहोत, कारण भारतीय नौदल सक्षम आहे. देशाला पंतप्रधान नरेंद मोदी यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. भाजप सरकारने गोव्यातसुद्धा अनेक विकास प्रकल्प उभारले आहेत. राज्याच्या विकाला चालना दिली आहे. या प्रकल्पांना विकास म्हणता येईल. अशा प्रकारचा विकास केवळ भाजप सरकारच करू शकतो.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'काँग्रेस सरकारच्या काळात देशाने अपेक्षित विकास साधला नाही. महत्त्वाच्या अशा कोणत्याही योजना त्यांनी सुरू केल्या नाहीत. काँग्रेस पक्ष हा धर्माच्या आधारे विभाजन करू पहात आहे. मात्र, आम्ही तसे कधीच केलेले नाही. भाजप सरकार लोकांची सेवा करण्यासाठी आहे. ज्यांना काम करण्याची आवड आहे, त्यांनी भाजपमध्ये यावे.' यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उस्कईकर यांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुंभारजुवे मतदारसंघाचा झपाट्याने विकास

आमदार राजेश फळदेसाई म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी करून दाखवले. जगात भारत देश हा पहिल्या क्रमांकावर आहे, कारण पंतप्रधान सर्वांना एकत्र घेऊन चालतात. गोव्यातील भाजप सरकार चांगले काम करीत आहे. राज्य सरकार रोजगार निर्मितीवर भर देत आहे. कुंभारजुवे मतदारसंघाचा भाजप सरकारच्या काळात झपाट्याने विकास सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कधीच विकासकामांसाठी नकार देत नाहीत. २०२७ मध्ये २७ हे ध्येय आम्ही पुढे नेणार आहोत.

भाजप सर्वांना सोबत नेणारा पक्ष : नाईक

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, भाजप पक्ष हा एक परिवार आहे. तो सर्वांना एकत्र घेऊ चालणारा पक्ष आहे. या कार्यकर्त्यांच्या पक्षाचे १४ कोटींहून अधिक सदस्य आहेत. अंत्योदय तत्त्वावर पक्ष चालतो. आमच्या सरकारने अनेक सामाजिक योजना राबविल्या आहेत. सर्वसामान्य घटकांपर्यंत त्या योजना पोहोचाव्यात यावर भर असतो. सामान्यांचा स्तर वाढावा यासाठी लाडली लक्ष्मी, गृहआधार, आरोग्य, शिक्षण योजना राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उच्च स्तरावर नेण्यासाठी काम करीत आहेत.

दहशतवाद्यांना चोख उत्तर : तानावडे

खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, 'पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले. मात्र, असे करताना त्यांनी सर्वसामान्यांना त्रास दिला नाही तर तेथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुठलाही स्वार्थ न ठेवता देशासाठी काम करतात. भारत आज पायाभूत सुविधा, महिला सशक्तीकरण, शिक्षण, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रांत ताकदवान देश बनला आहे. मोदी यांचे सशक्त नेतृत्व देशाला लाभले आहे. २०४७ पर्यंत भारत देशाला महाशक्ती बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपा