शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

शिक्षक क्रूर का बनतात? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2024 16:00 IST

शाळा व्यवस्थापनाने त्यांना निलंबित केले आहे. 

आज राज्यभरात शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र विद्यार्थी मारहाण प्रकरणाने गोवा सुन्न झाला आहे. बार्देशातील एका शाळेत सोमवारी घडलेली घटना भयानक, खूपच संतापजनक आहे. कोलवाळ पोलिसांत एफआयआर नोंद झाला आहे. चौथीत शिकणाऱ्या कोवळ्या मुलाला शिक्षिकेने खूप मारहाण केली. स्टीलच्या पट्टीने एवढे मारले की हाता- पायावर जखमा झाल्या, वळ उठले. हात-पाय काळेनिळे पडले. या प्रकरणी दोघा शिक्षिकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, शाळा व्यवस्थापनाने त्यांना निलंबित केले आहे. 

सोमवारच्या या घटनेबाबत मंगळवारी पोलिसांनी तक्रार नोंद करून चौकशी सुरू केली आहे. बुधवारी पत्रकारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारल्यानंतर त्यांनीही त्या शिक्षिकांच्या वर्तनाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. शिक्षण खाते व पोलिसही कारवाई करतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शिक्षिकांनी दुसऱ्या कुणावरचा राग कदाचित विद्यार्थ्यावर काढला असावा, आता शिक्षकांचेही समुपदेशन करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. लहान मुलांशी शिक्षक असे क्रूर वागू लागले तर मुले शाळेत जायला घाबरतील. शिक्षणाची प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनावी, असा काही चांगल्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा प्रयत्न असतो. मात्र काही शिक्षक किंवा शिक्षिकांची प्रवृत्तीच विचित्र असते. 

काही जण हिंस्रच असतात की काय अशी शंका येते. सत्तरी तालुक्यात एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेनेही एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची बातमी लोकमतमध्ये झळकली होती. त्याबाबत राज्यभर चर्चा सुरू असतानाच आता बार्देशातील प्रकरण उघड झाले. एका वहीची दोन पाने फाडल्याच्या कारणावरून मुलाला चक्क स्टीलच्या पट्टीने मारणे हे कोणत्याच नियमात बसत नाही. नैतिकतेतदेखील बसत नाही. काही वेळा मुले मस्ती करतात तेव्हा शिक्षकांनी रागावणे किंवा एखादा चिमटा काढणे असे पूर्वी चालायचे. आता कायदे खूप कडक झाले आहेत. तरीदेखील मुलांच्या अंगावर वळ येण्याएवढी किंवा त्यांना वेदना होण्याएवढी मारहाण शिक्षकांनी करावी, हे अत्यंत निषेधार्ह आहे. यापूर्वी सासष्टीतही अशी एक घटना घडली होती. 

२००० सालानंतर राज्यात काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. छोट्या विद्यार्थ्यांचाही विनयभंग शिक्षकांनी केल्याच्या घटना उत्तर व दक्षिण गोव्यातील काही तालुक्यांत घडल्या होत्या. तक्रार आल्यानंतर शिक्षकांची चौकशी व्हायची. निलंबनही व्हायचे. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) मनोहर पर्रीकर यांनी कडक भूमिका घेतली होती. माजी शिक्षण संचालक अशोक देसाई यांनीही काही प्रकरणी कडक भूमिका घेत कारवाई केली होती. त्यानंतर लैंगिक अत्याचारांचे, विनयभंगाचे आरोप तरी कमी झाले. मात्र काही शिक्षक किंवा शिक्षिका मुलांना अत्यंत अमानुष शिक्षा करतात, अशा घटना घडू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये अशा घटना दाबून टाकल्या जातात, पण आता अति झाल्याने लोकही संतापले आहेत. 

काही वेळा गरीब पालकांचे लक्ष शाळेत काय घडते याकडे नसते. काही पालक बिचारे कुटुंबाची दैनंदिन उपजीविका भागविण्यासाठीच खूप खपत असतात. त्यांना वेळ वेळ न नसतो. अशा वेळी त्यांचा सगळा विश्वास व सारी भिस्त शिक्षकांवरच असते. आपण मुलाला किंवा मुलीला शाळेत पाठविले म्हणजे आपले काम संपले, आता शिक्षकच काळजी घेतील, असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण गावांमध्ये काही पालक रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट, ट्रकचालक, बसचालक किंवा शेतमजूर असतात. शहरी पालकांची स्थिती जरा वेगळी असते. विद्यार्थी मारहाण घटना या प्रामुख्याने पंचायत क्षेत्रातील शाळांमध्येच घडत असतात. 

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे शिक्षण खाते आहे. त्यांनी एकदा राज्यभरातील सर्व शिक्षकांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. काही शिक्षकांना नीट धडे देण्याची गरज आहे. शिक्षकांना पालकांमध्ये असलेला मान कमी होऊ नये. त्यासाठी अमानुष वागणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षिकांना अगोदर रोखावे लागेल. बार्देशातील घटनेबाबत तर शिक्षिकांना अटक व्हायला हवी. एक-दोघांना अद्दल घडली की इतरांना धडा मिळेल. मुलाचे वळ आलेले फोटो सगळीकडे व्हायरल झाल्याने लोकांमध्ये शिक्षिकांबाबत संताप वाढला आहे. शिक्षण खात्याने हा विषय अधिक गंभीरपणे घ्यावा असे वाटते. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाTeacherशिक्षक