शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शिक्षक क्रूर का बनतात? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2024 16:00 IST

शाळा व्यवस्थापनाने त्यांना निलंबित केले आहे. 

आज राज्यभरात शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र विद्यार्थी मारहाण प्रकरणाने गोवा सुन्न झाला आहे. बार्देशातील एका शाळेत सोमवारी घडलेली घटना भयानक, खूपच संतापजनक आहे. कोलवाळ पोलिसांत एफआयआर नोंद झाला आहे. चौथीत शिकणाऱ्या कोवळ्या मुलाला शिक्षिकेने खूप मारहाण केली. स्टीलच्या पट्टीने एवढे मारले की हाता- पायावर जखमा झाल्या, वळ उठले. हात-पाय काळेनिळे पडले. या प्रकरणी दोघा शिक्षिकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, शाळा व्यवस्थापनाने त्यांना निलंबित केले आहे. 

सोमवारच्या या घटनेबाबत मंगळवारी पोलिसांनी तक्रार नोंद करून चौकशी सुरू केली आहे. बुधवारी पत्रकारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारल्यानंतर त्यांनीही त्या शिक्षिकांच्या वर्तनाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. शिक्षण खाते व पोलिसही कारवाई करतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शिक्षिकांनी दुसऱ्या कुणावरचा राग कदाचित विद्यार्थ्यावर काढला असावा, आता शिक्षकांचेही समुपदेशन करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. लहान मुलांशी शिक्षक असे क्रूर वागू लागले तर मुले शाळेत जायला घाबरतील. शिक्षणाची प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनावी, असा काही चांगल्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा प्रयत्न असतो. मात्र काही शिक्षक किंवा शिक्षिकांची प्रवृत्तीच विचित्र असते. 

काही जण हिंस्रच असतात की काय अशी शंका येते. सत्तरी तालुक्यात एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेनेही एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची बातमी लोकमतमध्ये झळकली होती. त्याबाबत राज्यभर चर्चा सुरू असतानाच आता बार्देशातील प्रकरण उघड झाले. एका वहीची दोन पाने फाडल्याच्या कारणावरून मुलाला चक्क स्टीलच्या पट्टीने मारणे हे कोणत्याच नियमात बसत नाही. नैतिकतेतदेखील बसत नाही. काही वेळा मुले मस्ती करतात तेव्हा शिक्षकांनी रागावणे किंवा एखादा चिमटा काढणे असे पूर्वी चालायचे. आता कायदे खूप कडक झाले आहेत. तरीदेखील मुलांच्या अंगावर वळ येण्याएवढी किंवा त्यांना वेदना होण्याएवढी मारहाण शिक्षकांनी करावी, हे अत्यंत निषेधार्ह आहे. यापूर्वी सासष्टीतही अशी एक घटना घडली होती. 

२००० सालानंतर राज्यात काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. छोट्या विद्यार्थ्यांचाही विनयभंग शिक्षकांनी केल्याच्या घटना उत्तर व दक्षिण गोव्यातील काही तालुक्यांत घडल्या होत्या. तक्रार आल्यानंतर शिक्षकांची चौकशी व्हायची. निलंबनही व्हायचे. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) मनोहर पर्रीकर यांनी कडक भूमिका घेतली होती. माजी शिक्षण संचालक अशोक देसाई यांनीही काही प्रकरणी कडक भूमिका घेत कारवाई केली होती. त्यानंतर लैंगिक अत्याचारांचे, विनयभंगाचे आरोप तरी कमी झाले. मात्र काही शिक्षक किंवा शिक्षिका मुलांना अत्यंत अमानुष शिक्षा करतात, अशा घटना घडू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये अशा घटना दाबून टाकल्या जातात, पण आता अति झाल्याने लोकही संतापले आहेत. 

काही वेळा गरीब पालकांचे लक्ष शाळेत काय घडते याकडे नसते. काही पालक बिचारे कुटुंबाची दैनंदिन उपजीविका भागविण्यासाठीच खूप खपत असतात. त्यांना वेळ वेळ न नसतो. अशा वेळी त्यांचा सगळा विश्वास व सारी भिस्त शिक्षकांवरच असते. आपण मुलाला किंवा मुलीला शाळेत पाठविले म्हणजे आपले काम संपले, आता शिक्षकच काळजी घेतील, असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण गावांमध्ये काही पालक रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट, ट्रकचालक, बसचालक किंवा शेतमजूर असतात. शहरी पालकांची स्थिती जरा वेगळी असते. विद्यार्थी मारहाण घटना या प्रामुख्याने पंचायत क्षेत्रातील शाळांमध्येच घडत असतात. 

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे शिक्षण खाते आहे. त्यांनी एकदा राज्यभरातील सर्व शिक्षकांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. काही शिक्षकांना नीट धडे देण्याची गरज आहे. शिक्षकांना पालकांमध्ये असलेला मान कमी होऊ नये. त्यासाठी अमानुष वागणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षिकांना अगोदर रोखावे लागेल. बार्देशातील घटनेबाबत तर शिक्षिकांना अटक व्हायला हवी. एक-दोघांना अद्दल घडली की इतरांना धडा मिळेल. मुलाचे वळ आलेले फोटो सगळीकडे व्हायरल झाल्याने लोकांमध्ये शिक्षिकांबाबत संताप वाढला आहे. शिक्षण खात्याने हा विषय अधिक गंभीरपणे घ्यावा असे वाटते. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाTeacherशिक्षक