शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक क्रूर का बनतात? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2024 16:00 IST

शाळा व्यवस्थापनाने त्यांना निलंबित केले आहे. 

आज राज्यभरात शिक्षक दिन साजरा होत आहे. मात्र विद्यार्थी मारहाण प्रकरणाने गोवा सुन्न झाला आहे. बार्देशातील एका शाळेत सोमवारी घडलेली घटना भयानक, खूपच संतापजनक आहे. कोलवाळ पोलिसांत एफआयआर नोंद झाला आहे. चौथीत शिकणाऱ्या कोवळ्या मुलाला शिक्षिकेने खूप मारहाण केली. स्टीलच्या पट्टीने एवढे मारले की हाता- पायावर जखमा झाल्या, वळ उठले. हात-पाय काळेनिळे पडले. या प्रकरणी दोघा शिक्षिकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, शाळा व्यवस्थापनाने त्यांना निलंबित केले आहे. 

सोमवारच्या या घटनेबाबत मंगळवारी पोलिसांनी तक्रार नोंद करून चौकशी सुरू केली आहे. बुधवारी पत्रकारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारल्यानंतर त्यांनीही त्या शिक्षिकांच्या वर्तनाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. शिक्षण खाते व पोलिसही कारवाई करतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शिक्षिकांनी दुसऱ्या कुणावरचा राग कदाचित विद्यार्थ्यावर काढला असावा, आता शिक्षकांचेही समुपदेशन करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. लहान मुलांशी शिक्षक असे क्रूर वागू लागले तर मुले शाळेत जायला घाबरतील. शिक्षणाची प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनावी, असा काही चांगल्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा प्रयत्न असतो. मात्र काही शिक्षक किंवा शिक्षिकांची प्रवृत्तीच विचित्र असते. 

काही जण हिंस्रच असतात की काय अशी शंका येते. सत्तरी तालुक्यात एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेनेही एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची बातमी लोकमतमध्ये झळकली होती. त्याबाबत राज्यभर चर्चा सुरू असतानाच आता बार्देशातील प्रकरण उघड झाले. एका वहीची दोन पाने फाडल्याच्या कारणावरून मुलाला चक्क स्टीलच्या पट्टीने मारणे हे कोणत्याच नियमात बसत नाही. नैतिकतेतदेखील बसत नाही. काही वेळा मुले मस्ती करतात तेव्हा शिक्षकांनी रागावणे किंवा एखादा चिमटा काढणे असे पूर्वी चालायचे. आता कायदे खूप कडक झाले आहेत. तरीदेखील मुलांच्या अंगावर वळ येण्याएवढी किंवा त्यांना वेदना होण्याएवढी मारहाण शिक्षकांनी करावी, हे अत्यंत निषेधार्ह आहे. यापूर्वी सासष्टीतही अशी एक घटना घडली होती. 

२००० सालानंतर राज्यात काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. छोट्या विद्यार्थ्यांचाही विनयभंग शिक्षकांनी केल्याच्या घटना उत्तर व दक्षिण गोव्यातील काही तालुक्यांत घडल्या होत्या. तक्रार आल्यानंतर शिक्षकांची चौकशी व्हायची. निलंबनही व्हायचे. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री (स्व.) मनोहर पर्रीकर यांनी कडक भूमिका घेतली होती. माजी शिक्षण संचालक अशोक देसाई यांनीही काही प्रकरणी कडक भूमिका घेत कारवाई केली होती. त्यानंतर लैंगिक अत्याचारांचे, विनयभंगाचे आरोप तरी कमी झाले. मात्र काही शिक्षक किंवा शिक्षिका मुलांना अत्यंत अमानुष शिक्षा करतात, अशा घटना घडू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये अशा घटना दाबून टाकल्या जातात, पण आता अति झाल्याने लोकही संतापले आहेत. 

काही वेळा गरीब पालकांचे लक्ष शाळेत काय घडते याकडे नसते. काही पालक बिचारे कुटुंबाची दैनंदिन उपजीविका भागविण्यासाठीच खूप खपत असतात. त्यांना वेळ वेळ न नसतो. अशा वेळी त्यांचा सगळा विश्वास व सारी भिस्त शिक्षकांवरच असते. आपण मुलाला किंवा मुलीला शाळेत पाठविले म्हणजे आपले काम संपले, आता शिक्षकच काळजी घेतील, असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण गावांमध्ये काही पालक रिक्षाचालक, मोटरसायकल पायलट, ट्रकचालक, बसचालक किंवा शेतमजूर असतात. शहरी पालकांची स्थिती जरा वेगळी असते. विद्यार्थी मारहाण घटना या प्रामुख्याने पंचायत क्षेत्रातील शाळांमध्येच घडत असतात. 

मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे शिक्षण खाते आहे. त्यांनी एकदा राज्यभरातील सर्व शिक्षकांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. काही शिक्षकांना नीट धडे देण्याची गरज आहे. शिक्षकांना पालकांमध्ये असलेला मान कमी होऊ नये. त्यासाठी अमानुष वागणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षिकांना अगोदर रोखावे लागेल. बार्देशातील घटनेबाबत तर शिक्षिकांना अटक व्हायला हवी. एक-दोघांना अद्दल घडली की इतरांना धडा मिळेल. मुलाचे वळ आलेले फोटो सगळीकडे व्हायरल झाल्याने लोकांमध्ये शिक्षिकांबाबत संताप वाढला आहे. शिक्षण खात्याने हा विषय अधिक गंभीरपणे घ्यावा असे वाटते. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाTeacherशिक्षक